शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

हरसूल दंगलीवरून विधानसभेत गदारोळ

By admin | Updated: July 17, 2015 23:54 IST

नाशिक जिल्ह्यातील हरसूल येथील जातीय दंगलीचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. या दंगलीवर सरकारने चर्चा करावी आणि तातडीने उपाययोजना कराव्यात

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील हरसूल येथील जातीय दंगलीचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. या दंगलीवर सरकारने चर्चा करावी आणि तातडीने उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्यामुळे आज विधानसभेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सरकारने चर्चेची मागणी फेटाळल्याच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वात विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. प्रश्नोत्तराच्या तासानंतर स्थगन प्रस्तावाच्या सूचना आल्या तेव्हा कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य जिवा पांडू गावित यांना हरसूलबाबत बोलायचे होते. मात्र पीठासीन अधिकारी चैनसुख संचेती यांनी सांगितले की, कालच तुम्ही यावर बोललेले आहात. मी यावर सरकारला निवेदन करायला सांगतो. अध्यक्षांनी पुढचा विषय पुकारला तेव्हा गावित यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शेकापचे गणपतराव देशमुख, दिलीप वळसे पाटील असे सारेच उभे राहिल्याने सभागृहात थोडा काळ गोंधळाची स्थिती झाली. सांसदीय कार्यमंत्री प्रकाश मेहता यांनी विनंती केल्यानंतर अध्यक्षांनी गावित यांना बोलण्याची संधी दिली. गावित म्हणाले, त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा सुरू झाला आहे व तेथून काही अंतरावर असणाऱ्या हरसूल गावी दंगल सुरू आहे. आजूबाजूच्या गावांत दंगल पसरण्याची शक्यता आहे. तीन दिवस दंगल सुरू होती. मुळात तेथील स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे लोक चिडले आणि त्यांनी हल्ला केला. एक खून झाला. तर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केल्याने लोक भडकले. यावर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन व महसूल मंत्री खडसे यांनी निवेदन केले. महाजन म्हणाले, मी तेथे दोनवेळा गेलो. स्थिती तणावाची होती, पण आता निवळली आहे. मी पुन्हा तिथे जात आहे व नंतर सोमवारी निवेदन करतो. तेव्हा गणपतराव देशमुख पुन्हा उभे राहिले. पोलीस गोळीबारात एक माणूस मरण पावला आहे. ही बाब गंभीर आहे. तीन दिवस तिथे दंगल आहे ती शमविण्यात सरकारचे अपयश आहे. तेव्हा ताबडतोब चर्चा करावी, असा आग्रह त्यांनी धरला. अध्यक्षांनी पुढचे कामकाज सुरू केले. तेंव्हा विरोधकांना बोलूच द्यायचे नाही ही कोणती पद्धत आहे, असे म्हणत त्यांनी सभात्याग केला.