शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

भूकरमापकांमुळे रोहेकर हैराण

By admin | Updated: July 23, 2016 03:04 IST

रोहा तालुक्यातील तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालय म्हणजे बेभरवसी भूकरमापकांचा अड्डा बनला आहे.

मिलिंद अष्टीवकर,

रोहा- रोहा तालुक्यातील तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालय म्हणजे बेभरवसी भूकरमापकांचा अड्डा बनला आहे. या कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने जमीन मोजणीच्या कामासाठी येणारे नागरिक वारंवार खेटे घालून हैराण होत आहेत. अपुऱ्या संख्येने कर्मचारी असल्याने या कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना भूकरमापकांच्या मिजासखोरीचा त्रास मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे. खातेदारांना अनेक वेळा गट स्कीम नकाशा, गट बुकाचा उतारा, सिटी सर्व्हे नकाशा व उतारा मिळविण्यासाठी चिरीमिरी देऊन सुद्धा अनेक फेऱ्या माराव्या लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.रायगड जिल्ह्यासह तालुक्यात जमीन खरेदी-विक्र ीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. परंतु रोहा तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी संख्या मात्र दिवसेंदिवस रोडावत आहे. ७६ भूकरमापकांच्या जागा रिक्त असून भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रमुख असलेले उपअधीक्षक पदच रिक्त आहे. सध्या या कार्यालयाची सूत्रे पनवेल येथील भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक एस. टी. घुले यांच्याकडे प्रभारी देण्यात आलेली आहेत. त्यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते आठवड्यातून केवळ मंगळवार आणि शुक्र वार असे दोन दिवस रोहा येथे येतात असे त्यांनी सांगितले. या सर्वचा गैरफायदा येथील भूकरमापकांनी घेतलेला दिसून येतो. मोजणीसाठी आलेल्या नागरिकांकडे मोजणीच्या जागेवर जाण्यासाठी गाडी किंवा रिक्षा, दारू, मटणाचे जेवण तसेच पैशांची मागणी करत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले आहे. मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर लगतच्या कब्जेदारांना मोजणीच्या वेळी हजर राहण्यासाठी द्यावयाच्या नोटिसा भूमी अभिलेख कार्यालयामार्फत संबंधितांना टपालाद्वारे न पाठवता संबंधित नागरिकालाच कब्जेदारांना नोटिसा बजावण्यास भूकरमापकांकडून सांगितले जाते. मोजणीसाठी भूकरमापकांना निशाणदार, चार मजूर, चुना, उंच काठ्या, छत्री या गोष्टी ज्या व्यक्तीला मोजणी करावयाची आहे त्यालाच पुरवाव्या लागतात. >नागरिकांच्या तक्रारीभूकरमापकांची सरबराई न केल्यास संबंधित खातेदाराला मोजणी नकाशा उपलब्ध करून न देणे, हिश्शाच्या खुणांबाबत माहिती न देणे, काम अर्धवट ठेवणे अशा प्रकारे त्रास दिला जातो. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याने अनेक जण या भूकरमापकांची सरबराई करण्यातच धन्यता मानतात. सरबराई न केल्यास संबंधित खातेदाराचा वेळ व पैसा दोन्ही वाया जाऊन मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्र ारी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जोशी यांच्याकडे आल्या आहेत.