शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भूकरमापकांमुळे रोहेकर हैराण

By admin | Updated: July 23, 2016 03:04 IST

रोहा तालुक्यातील तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालय म्हणजे बेभरवसी भूकरमापकांचा अड्डा बनला आहे.

मिलिंद अष्टीवकर,

रोहा- रोहा तालुक्यातील तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालय म्हणजे बेभरवसी भूकरमापकांचा अड्डा बनला आहे. या कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने जमीन मोजणीच्या कामासाठी येणारे नागरिक वारंवार खेटे घालून हैराण होत आहेत. अपुऱ्या संख्येने कर्मचारी असल्याने या कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना भूकरमापकांच्या मिजासखोरीचा त्रास मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे. खातेदारांना अनेक वेळा गट स्कीम नकाशा, गट बुकाचा उतारा, सिटी सर्व्हे नकाशा व उतारा मिळविण्यासाठी चिरीमिरी देऊन सुद्धा अनेक फेऱ्या माराव्या लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.रायगड जिल्ह्यासह तालुक्यात जमीन खरेदी-विक्र ीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. परंतु रोहा तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी संख्या मात्र दिवसेंदिवस रोडावत आहे. ७६ भूकरमापकांच्या जागा रिक्त असून भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रमुख असलेले उपअधीक्षक पदच रिक्त आहे. सध्या या कार्यालयाची सूत्रे पनवेल येथील भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक एस. टी. घुले यांच्याकडे प्रभारी देण्यात आलेली आहेत. त्यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते आठवड्यातून केवळ मंगळवार आणि शुक्र वार असे दोन दिवस रोहा येथे येतात असे त्यांनी सांगितले. या सर्वचा गैरफायदा येथील भूकरमापकांनी घेतलेला दिसून येतो. मोजणीसाठी आलेल्या नागरिकांकडे मोजणीच्या जागेवर जाण्यासाठी गाडी किंवा रिक्षा, दारू, मटणाचे जेवण तसेच पैशांची मागणी करत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले आहे. मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर लगतच्या कब्जेदारांना मोजणीच्या वेळी हजर राहण्यासाठी द्यावयाच्या नोटिसा भूमी अभिलेख कार्यालयामार्फत संबंधितांना टपालाद्वारे न पाठवता संबंधित नागरिकालाच कब्जेदारांना नोटिसा बजावण्यास भूकरमापकांकडून सांगितले जाते. मोजणीसाठी भूकरमापकांना निशाणदार, चार मजूर, चुना, उंच काठ्या, छत्री या गोष्टी ज्या व्यक्तीला मोजणी करावयाची आहे त्यालाच पुरवाव्या लागतात. >नागरिकांच्या तक्रारीभूकरमापकांची सरबराई न केल्यास संबंधित खातेदाराला मोजणी नकाशा उपलब्ध करून न देणे, हिश्शाच्या खुणांबाबत माहिती न देणे, काम अर्धवट ठेवणे अशा प्रकारे त्रास दिला जातो. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याने अनेक जण या भूकरमापकांची सरबराई करण्यातच धन्यता मानतात. सरबराई न केल्यास संबंधित खातेदाराचा वेळ व पैसा दोन्ही वाया जाऊन मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्र ारी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जोशी यांच्याकडे आल्या आहेत.