शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वरानंदवन’च्या माध्यमातून फुलणार आनंदवनात ‘हिंमतग्राम’!

By admin | Updated: December 24, 2014 00:02 IST

आदिवासींमधील कलागुणांचा त्यांच्या उन्नतीसाठी उपयोग करण्याच्या हेतुतून साकारले स्वरानंद, डॉ. प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन.

राम देशपांडे/ अकोला :स्वरानंदवनच्या माध्यमातून आनंदवनातील आदिवासींच्या जीवनात आनंद भरणारे हिंमतग्राम उभारण्यात येणार असल्याची माहिती स्वरानंदवनचे जनक डॉ. विकास आमटे यांनी दिली. आनंदवनातील अंध, अपंग आणि कुष्ठरोगमुक्त आदिवासी बांधवांचा स्वरानंदवन हा सूरमय संगीत कार्यक्रम नुकताच अकोल्यात झाला. याप्रसंगी डॉ. आमटे यांनी लोकमतशी बोलताना स्वरानंदवन मागील भूमिका विषद केली. आनंदवनातील दीड हजार कलाकारांना सोबत घेणे कसे शक्य झाले?डॉ. आमटे : अर्थातच यामागची सर्व प्रेरणा मला बाबांकडूनच मिळाली. लगतच्या गावांनी, जवळच्या नातेवाईकांनी नाकारलेल्या आणि हातापायांची बोटे गळालेल्या आदिवासी बांधवांना बाबांनी जवळ केलं. बाबांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले. आनंदवनात आज तिसरी पिढी राहत आहे. १९७0 मध्ये बाबा सोमनाथला गेल्यानंतर खरी जबाबदारी मी स्वीकारली. या लोकांमध्ये अगणित कला आहेत. त्यांच्या या कला गुणांचा त्यांच्या उन्नतीसाठी कसा उपयोग होऊ शकतो, या संकल्पनेतूनच ह्यस्वरानंदवनह्णची निर्मिती झाली.काय आहे स्वरानंदवन?डॉ. आमटे : आनंदवनातील अंध, अपंग, आणि कुष्ठरोगमुक्त आदिवासी बांधवांमध्ये असलेल्या कलागुणांचा आविष्कार म्हणजे स्वरानंदवन. प्रत्येकात कोणती ना कोणती कला दडलेली असते. ती कला सादर करण्यासाठी त्याला केवळ प्रोत्साहनाची गरज असते. मी तेच केलं. विविध कारणांमुळे नैराश्य आलेल्या या बांधवांमधील सुप्त गुणांचा संचार म्हणजेच स्वरानंदवन.हिंमतग्राम ही काय संकल्पना आहे?डॉ. आमटे : बाबांनी दिलेला वारसा आम्ही पुढे चालवित आहोत. या बांधवांना स्वत:च्या मेहनतीवर स्वत:चं अस्तित्व निर्माण करता आलं पाहिजे, यासाठी खरा अट्टाहास आहे. येथे राहणार्‍या सर्व आदिवासी बांधव आपापल्या परीने श्रमदान करून साहित्य निर्मिती करतात. त्यांची विक्री करून त्यापासून येणारा पैसा त्यांच्या उपयोगी आणला जातो. या बांधवांना आपल्या हक्काचं घर मिळावं. यासाठी त्यांनी सादर केलेल्या कलेतून जी आर्थिक प्राप्ती होईल, त्यातून त्यांच्यासाठी हिंमतग्राम वसविले जाणार आहे. यासाठी आजपर्यंत राज्यात स्वरानंदवनचे जवळपास ८५0 प्रयोग झाले. लवकरच आनंदवनात हिंमतग्राम फुलणार, यात शंका नाही.आजच्या तरुण पिढीला काय सांगाल?डॉ. आमटे : असे नाही की सर्वच तरुण स्वत:मध्ये व्यस्त आणि मग्न आहेत. आनंदवनात सेवा कार्य करणार्‍या राज्यातील विविध भागातील तरुण मंडळींचा आज मोठा सहभाग आहे. केवळ तरुणांनाच नव्हे, तर इतर सर्वांना मी या माध्यमातून आनंदवनाला भेट देण्याचं निमंत्रण देतो. एकदा तुम्ही अवश्य भेट द्या, तुमच्या जीवनाला नक्कीच नवी दिशा प्राप्त होईल.