शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘स्वरानंदवन’च्या माध्यमातून फुलणार आनंदवनात ‘हिंमतग्राम’!

By admin | Updated: December 24, 2014 00:02 IST

आदिवासींमधील कलागुणांचा त्यांच्या उन्नतीसाठी उपयोग करण्याच्या हेतुतून साकारले स्वरानंद, डॉ. प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन.

राम देशपांडे/ अकोला :स्वरानंदवनच्या माध्यमातून आनंदवनातील आदिवासींच्या जीवनात आनंद भरणारे हिंमतग्राम उभारण्यात येणार असल्याची माहिती स्वरानंदवनचे जनक डॉ. विकास आमटे यांनी दिली. आनंदवनातील अंध, अपंग आणि कुष्ठरोगमुक्त आदिवासी बांधवांचा स्वरानंदवन हा सूरमय संगीत कार्यक्रम नुकताच अकोल्यात झाला. याप्रसंगी डॉ. आमटे यांनी लोकमतशी बोलताना स्वरानंदवन मागील भूमिका विषद केली. आनंदवनातील दीड हजार कलाकारांना सोबत घेणे कसे शक्य झाले?डॉ. आमटे : अर्थातच यामागची सर्व प्रेरणा मला बाबांकडूनच मिळाली. लगतच्या गावांनी, जवळच्या नातेवाईकांनी नाकारलेल्या आणि हातापायांची बोटे गळालेल्या आदिवासी बांधवांना बाबांनी जवळ केलं. बाबांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले. आनंदवनात आज तिसरी पिढी राहत आहे. १९७0 मध्ये बाबा सोमनाथला गेल्यानंतर खरी जबाबदारी मी स्वीकारली. या लोकांमध्ये अगणित कला आहेत. त्यांच्या या कला गुणांचा त्यांच्या उन्नतीसाठी कसा उपयोग होऊ शकतो, या संकल्पनेतूनच ह्यस्वरानंदवनह्णची निर्मिती झाली.काय आहे स्वरानंदवन?डॉ. आमटे : आनंदवनातील अंध, अपंग, आणि कुष्ठरोगमुक्त आदिवासी बांधवांमध्ये असलेल्या कलागुणांचा आविष्कार म्हणजे स्वरानंदवन. प्रत्येकात कोणती ना कोणती कला दडलेली असते. ती कला सादर करण्यासाठी त्याला केवळ प्रोत्साहनाची गरज असते. मी तेच केलं. विविध कारणांमुळे नैराश्य आलेल्या या बांधवांमधील सुप्त गुणांचा संचार म्हणजेच स्वरानंदवन.हिंमतग्राम ही काय संकल्पना आहे?डॉ. आमटे : बाबांनी दिलेला वारसा आम्ही पुढे चालवित आहोत. या बांधवांना स्वत:च्या मेहनतीवर स्वत:चं अस्तित्व निर्माण करता आलं पाहिजे, यासाठी खरा अट्टाहास आहे. येथे राहणार्‍या सर्व आदिवासी बांधव आपापल्या परीने श्रमदान करून साहित्य निर्मिती करतात. त्यांची विक्री करून त्यापासून येणारा पैसा त्यांच्या उपयोगी आणला जातो. या बांधवांना आपल्या हक्काचं घर मिळावं. यासाठी त्यांनी सादर केलेल्या कलेतून जी आर्थिक प्राप्ती होईल, त्यातून त्यांच्यासाठी हिंमतग्राम वसविले जाणार आहे. यासाठी आजपर्यंत राज्यात स्वरानंदवनचे जवळपास ८५0 प्रयोग झाले. लवकरच आनंदवनात हिंमतग्राम फुलणार, यात शंका नाही.आजच्या तरुण पिढीला काय सांगाल?डॉ. आमटे : असे नाही की सर्वच तरुण स्वत:मध्ये व्यस्त आणि मग्न आहेत. आनंदवनात सेवा कार्य करणार्‍या राज्यातील विविध भागातील तरुण मंडळींचा आज मोठा सहभाग आहे. केवळ तरुणांनाच नव्हे, तर इतर सर्वांना मी या माध्यमातून आनंदवनाला भेट देण्याचं निमंत्रण देतो. एकदा तुम्ही अवश्य भेट द्या, तुमच्या जीवनाला नक्कीच नवी दिशा प्राप्त होईल.