शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

उद्योगांच्या वीज सबसिडीचा फायदा मूठभर कंपन्यांनाच; १५ उद्योगांनी घेतले ४,०४९ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 07:36 IST

महाविकास आघाडी सरकारने २०२०-२१ मध्ये १,२०० कोटी रुपयांची सबसिडी दिली. त्यातील ७५० कोटी रुपयांचा लाभ या १५ कारखान्यांना झाला. त्यात सर्व स्टील उद्योग आहेत. 

मुंबई : राज्य शासन १,२०० कोटी रुपयांची वीज सबसिडी मराठवाडा, विदर्भ व इतर मागासलेल्या जिल्ह्यांमधील कारखान्यांना देते, पण त्याचा फायदा केवळ १५ उद्योग उचलत असल्याची बाब समोर आली आहे.या भागातील उद्योगांना साडेचार रुपये युनिट दराने वीज देण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने घेतला होता व त्याची अंमलबजावणीही केली. अन्य जिल्ह्यांमध्ये हा दर आठ रुपये इतका आहे. ही सबसिडी देताना अशा अटी घालण्यात आल्या की, सबसिडीचा फायदा केवळ बड्या उद्योगांनाच होईल व लघू व मध्यम उद्योग वंचित राहतील. एकूण ७,५०० कारखान्यांपैकी १५ कारखान्यांनी ६५ टक्के सबसिडी उचलली, अशी आकडेवारी समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारने २०२०-२१ मध्ये १,२०० कोटी रुपयांची सबसिडी दिली. त्यातील ७५० कोटी रुपयांचा लाभ या १५ कारखान्यांना झाला. त्यात सर्व स्टील उद्योग आहेत. वर्धेतील एका कंपनीला १२० कोटी रुपयांची सबसिडी मिळाली. ही बाब समोर आल्यानंतर आता या सबसिडीचा फेरआढावाराज्य शासन घेणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी त्याबाबतची माहिती मागविली असल्याचे सूत्रांनी सांगितले.२०१६-१७ पासून आतापर्यंत ६२०० कोटी रुपयांची वीज सबसिडी देण्यात आली. त्यातील तब्बल ४०४९ कोटींची सबसिडी ही केवळ १५ उद्योगांना मिळाली.उद्योगांना वीज सबसिडीचे नवे धोरण आणले जाईल. विशिष्ट उद्योगांना ही सबसिडी मिळण्याऐवजी ती इतरांनाही मिळेल. शिवाय सबसिडीच्या रकमेला मर्यादा टाकण्यात येईल.- नितीन राऊत, ऊर्जामंत्री