शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

लाकडांची विना हॅमर वाहतूक

By admin | Updated: November 15, 2015 02:35 IST

बाभूळ, निलगिरी, निंब, सुबाभूळ या सारख्या आडजात वृक्षांची सर्रास कत्तल करून, त्यातील २00घनमीटर लाकडांची दरवर्षी विना हॅमर वाहतूक केली जात आहे.

राजेश निस्ताने, यवतमाळबाभूळ, निलगिरी, निंब, सुबाभूळ या सारख्या आडजात वृक्षांची सर्रास कत्तल करून, त्यातील २00घनमीटर लाकडांची दरवर्षी विना हॅमर वाहतूक केली जात आहे. एवढेच नव्हे, तर या लाकडांची कटाईही केली जात असल्याने, राज्यातील चार हजार आरागिरण्या संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) नागपूर यांच्या २९ आॅक्टोबर २0१५ च्या पत्राच्या अनुषंगाने ही बाब उघड झाली आहे. राज्यात पूर्वीच्या मुंबई वननियम १९४२ मधील नियम क्र. ८२नुसार आणि आताच्या महाराष्ट्र वन नियमावली २0१४ च्या नियम ४७ नुसार लाकडावर निर्गत शिक्का (ट्रान्झिट हॅमर) उमटविणे बंधनकारक आहे, तसेच नियम ३१, ३२, ३३ नुसार लॉगिंग यादी (इमारती लाकडाची गोलाई-लांबी) गरजेचे आहे. मात्र, त्याचे पालन होत नसल्याचे आढळून आले आहे.बाभूळ, सुबाभूळ, निलगिरी व इतर प्रजातींच्या वृक्षांना तोडण्यासाठी परवानगीची गरज नाही. परंतु महाराष्ट्र महसूल संहिता १९६६च्या नियम २५ नुसार स्वामित्वाचे प्रमाणपत्र तहसीलदार-एसडीओंकडून प्राप्त करून घेण्याचे बंधन आहे, परंतु त्याकडेही दुर्लक्ष होत आहे. आरागिरण्यांमध्ये सापडलेल्या आठ लक्ष घनमीटर लाकडाच्या स्वामित्वाचे दाखले उपलब्ध नाही. भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम ६९ नुसार, जोपर्यंत वनोपजाची मालकी सिद्ध होत नाही, तोपर्यंत तो शासन मालकीचा राहील, असे नमूद आहे. अशा लाखो घनमीटर लाकडांची मालकी सिद्ध करणारे अभिलेखेच आरागिरणी मालकाकडे उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यास, मोठे घबाड उघड होईल आणि शासनाच्या महसुलातही कोट्यवधी रुपयांची भर पडण्यास मदत होईल. तलाठ्याने गाव नमुना ११ मध्ये प्रत्येक झाडाची नोंद घेणे बंधनकारक आहे. मात्र, खासगी क्षेत्रातील वृक्षांची नोंद न तपासता, अवैध वृक्षतोडीला महसूल व वन खात्याचा हातभार लागतो आहे.मालेगावातील आरागिरण्यांच्या तपासणीत फुटले बिंग नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरातील आरागिरण्यांच्या १00 टक्के तपासणीदरम्यान आडजात वृक्षांच्या विना हॅमर प्रवासाचा गंभीर प्रकार उघड झाला. ठाणे, औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी, धुळे, यावल, नंदूरबार, जळगाव, अमरावती, बुलडाणा या भागातून वाहतूक परवान्यावर मोठ्या प्रमाणात लाकडे मालेगाव शहरात पाठविली जातात. मात्र, सदर वाहतूक परवान्यावर व लाकडावर हॅमर उमटविलेला नसतो. शिवाय लॉगिंग लिस्टही जोडलेली राहत नसल्याचे आढळून आले. मालेगावातील या प्रकारानंतर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी (संरक्षण) राज्यातील प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांना अहवाल मागितले होते. मात्र, अद्यापही या संबंधीचे अहवाल नागपूरच्या वन भवनात पोहोचलेले नाहीत. २) राज्यातील चार हजार आरागिरण्यांमध्ये दरवर्षी सरासरी २00घनमीटर बाभूळ, निंब या सारख्या आडजात प्रजातीच्या इमारती लाकडांची कटाई केली जाते.३) एका ट्रकमध्ये किमान २0 घनमीटर लाकूड एकावेळी आणले जाते. प्रत्येक आरागिरणीवर दहा ट्रक आडजात लाकूड उतरते. चार हजार आरागिरण्यांचा हा हिशेब ४0 हजार ट्रक लाकडावर जातो.४) या लाकडावर वनखात्याकडून परवाना शुल्क वसूल केले जात नाही. ही रक्कम चार कोटींच्या घरात जाते.५) लाकडावर हॅमर आणि यादी नसल्यास ट्रक चालकाकडून प्रत्येक फेरीला दोन हजार रुपये वसूल करणे बंधनकारक आहे, पण हे शुल्कसुद्धा बुडते. ही रक्कम दरवर्षी ८0 कोटींच्या घरात जाते.६) गेल्या २५ वर्षांतील हा आकडा पाहता तो दोन हजार कोटींपेक्षा अधिक असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला.