शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

आधे इधरवाले, आधे उधरवाले

By admin | Updated: February 27, 2017 03:35 IST

३३ पैकी १० प्रभागात दोन शिवसेना, दोन भाजपा, तर काही ठिकाणी दोन राष्ट्रवादी, दोन काँग्रेस, दोन एमआयएम असे नगरसेवक निवडून आले आहेत

ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागले असून ३३ पैकी १० प्रभागात दोन शिवसेना, दोन भाजपा, तर काही ठिकाणी दोन राष्ट्रवादी, दोन काँग्रेस, दोन एमआयएम असे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे या प्रभागातील नागरिकांना आता आपल्या समस्या सोडविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत ३३ प्रभागातून १३१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ८०५ उमेदवारांपैकी १३१ उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये चार प्रभागांचा एक पॅनल अशा पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. २०१२ मध्ये द्विपॅनल पद्धत होती, परंतु,त्यावेळेस अनेक प्रभागात एक काँग्रेस तर दुसरा राष्ट्रवादीचा, एक शिवसेनेचा तर दुसरा राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा अशी काहीशी परिस्थिती होती. त्यामुळे प्रभागातील समस्या पाच वर्षे सुटूच शकल्या नाहीत. एका नगरसेवकाकडे गेले तर तुम्ही आम्हाला मतच दिले नाही तर मग आम्ही तुमचे काम कशाला करायचे अशी उत्तरे नागरिकांना मिळत होती. आता तर चार प्रभागांचा एक पॅनल झाल्याने चार नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये तब्बल १३ पॅनलमध्ये सर्वाधिक शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले आहेत. तर तीन पॅनलमध्ये भाजपा, तर सात पॅनलमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले आहेत. परंतु या ३३ प्रभागांमध्ये १० पॅनल असे आहेत, की ज्या ठिकाणी आता द्विधामनस्थिती निर्माण झाली आहे. याठिकाणी आता नागरिकांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी या नगरसेवकाकडून त्या नगरसेवकाकडे वारंवार फेऱ्या माराव्या लागणार असल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपाचे तीन नगरसेवक निवडून आले असून एक नगरसेवक हा शिवसेनेचा आहे. (प्रतिनिधी)>मतांची गणिते बाजूला सारणार का?प्रभाग क्रमांक ७ मध्ये तीन शिवसेना वएक काँग्रेस, १२ मध्ये दोन भाजपा दोन शिवसेना, १५ मध्ये तीन भाजपा एक शिवसेना, २० मध्ये तीन शिवसेना एक भाजपा, २२ मध्ये दोन भाजपा दोन शिवसेना, २४ मध्ये दोन शिवसेना, एक राष्ट्रवादी आणि एक अपक्ष, २५ मध्ये तीन राष्ट्रवादी आणि एक शिवसेना, २६ मध्ये एक राष्ट्रवादी, दोन काँग्रेस आणि एक अपक्ष तर प्रभाग क्रमांक ३३ मध्ये दोन राष्ट्रवादी आणि दोन एमआयएमचे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आता या प्रभागातील नागरिकांच्या समस्या हे नगरसेवक मतांची गणिते बाजूला सारुन सोडविणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.