शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

पुरात जाऊ शकते निम्मे खळद गाव

By admin | Updated: August 6, 2016 00:54 IST

नदीला ज्या-ज्या वेळी पूर येतो, अशा वेळी नदीचे पात्र हळूहळू गावाच्या बाजूला विस्तारत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

खळद : गावाच्या उत्तर बाजूने कऱ्हा नदी वाहते. या नदीला ज्या-ज्या वेळी पूर येतो, अशा वेळी नदीचे पात्र हळूहळू गावाच्या बाजूला विस्तारत असल्याचे पाहावयास मिळत आहे. आज रोजी कधीही एखादा मोठा पूर आला, तर गावाला मोठा धोका पोहचून निम्मे गाव वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या भागात गावालगत तातडीने संरक्षक भिंत होण्याची गरज आहे.गावातील हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आदी महत्त्वाच्या इमारतीही या नदीलगत आहेत. या नदीपासून या इमारतीमध्ये जवळपास शंभर ते दोनशे मीटरपर्यंत अंतर असल्याचे बोलले जाते. पण, आज रोजी हे अंतर फार कमी झाले असून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र धोक्याच्या क्षेत्रात आहे. पूर्वी गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ ब्राह्मणडोह प्रसिद्ध होता. गावातील २० ते २५ वर्षांपूर्वीच्या अगोदरच्या काळातील शेकडो नागरिक याच डोहावर पोहण्यास शिकले असल्याचे बोलले जाते; पण आता मात्र नदीच्या विस्तारात हा ब्राह्मणडोह अस्तित्वातच राहिला नसल्याचे दिसते. तर, याच परिसरात शाळेच्याच बाजूला असलेल्या अनेक जुन्या खुणाही नामशेष झाल्या आहेत. कऱ्हा नदीच्या पात्रातून पाहिले, तर हा भाग उंचवट्यावर दिसतो. पण, याच उंचवट्याचा पाया नदीने हळूहळू गिळंकृत केल्याचे पाहावयास मिळते. यामुळे सध्या येथे शाडो या चिकट मातीचा थर आहे; पण हा थर संपत पोकळ भाग लागला. तर, एखाद्या पत्याच्या बंगल्यासारखे हे गाव कऱ्हा नदीपात्रात कोसळेल. सर्व होत्याचे नव्हते होईल. अशी परिस्थिती ओढवली तर सर्वप्रथम नदीचे पाणी गावाच्या ईभाड आळीतून गावात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी प्रशासनाने या भागाची पाहणी करून संरक्षक भिंत बांधण्याची गरज असल्याची मागणी गावचे नागरिक करीत आहेत.(वार्ताहर)>याबाबत तीन ते चार वर्षांपूर्वी या भागाचे प्रतिनिधित्व करणारे तत्कालीन उपसरपंच गणेश खळदकर व त्यांचे सर्व सहकारी यांनी ग्रामपंचायतीमध्ये या भागात संरक्षक भिंत व्हावी यासाठी ठराव करून गटविकास अधिकारी, तहसीलदार या शासनाच्या प्रतिनिधींना सादर केला होता; पण त्यावर अंमलबजावणी तर दूरच; पण साधी या भागाची पाहणीदेखील झाली नसल्याने प्रशासनाच्या या उदासीनतेवर नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.या भागाचे प्रतिनिधित्व करणारे खासदास सुप्रिया सुळेव आमदार राज्याचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमत्री विजय शिवतारे यांनाही या धोक्याची कल्पना या नागरिकांनी दिली आहे; पण त्यांच्याकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे प्रशासन व लोकप्रतिधी यांना येथे माळीण, उत्तराखंडसारखी परिस्थिती पाहायची आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.