शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

पुरात जाऊ शकते निम्मे खळद गाव

By admin | Updated: August 6, 2016 00:54 IST

नदीला ज्या-ज्या वेळी पूर येतो, अशा वेळी नदीचे पात्र हळूहळू गावाच्या बाजूला विस्तारत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

खळद : गावाच्या उत्तर बाजूने कऱ्हा नदी वाहते. या नदीला ज्या-ज्या वेळी पूर येतो, अशा वेळी नदीचे पात्र हळूहळू गावाच्या बाजूला विस्तारत असल्याचे पाहावयास मिळत आहे. आज रोजी कधीही एखादा मोठा पूर आला, तर गावाला मोठा धोका पोहचून निम्मे गाव वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या भागात गावालगत तातडीने संरक्षक भिंत होण्याची गरज आहे.गावातील हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आदी महत्त्वाच्या इमारतीही या नदीलगत आहेत. या नदीपासून या इमारतीमध्ये जवळपास शंभर ते दोनशे मीटरपर्यंत अंतर असल्याचे बोलले जाते. पण, आज रोजी हे अंतर फार कमी झाले असून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र धोक्याच्या क्षेत्रात आहे. पूर्वी गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ ब्राह्मणडोह प्रसिद्ध होता. गावातील २० ते २५ वर्षांपूर्वीच्या अगोदरच्या काळातील शेकडो नागरिक याच डोहावर पोहण्यास शिकले असल्याचे बोलले जाते; पण आता मात्र नदीच्या विस्तारात हा ब्राह्मणडोह अस्तित्वातच राहिला नसल्याचे दिसते. तर, याच परिसरात शाळेच्याच बाजूला असलेल्या अनेक जुन्या खुणाही नामशेष झाल्या आहेत. कऱ्हा नदीच्या पात्रातून पाहिले, तर हा भाग उंचवट्यावर दिसतो. पण, याच उंचवट्याचा पाया नदीने हळूहळू गिळंकृत केल्याचे पाहावयास मिळते. यामुळे सध्या येथे शाडो या चिकट मातीचा थर आहे; पण हा थर संपत पोकळ भाग लागला. तर, एखाद्या पत्याच्या बंगल्यासारखे हे गाव कऱ्हा नदीपात्रात कोसळेल. सर्व होत्याचे नव्हते होईल. अशी परिस्थिती ओढवली तर सर्वप्रथम नदीचे पाणी गावाच्या ईभाड आळीतून गावात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी प्रशासनाने या भागाची पाहणी करून संरक्षक भिंत बांधण्याची गरज असल्याची मागणी गावचे नागरिक करीत आहेत.(वार्ताहर)>याबाबत तीन ते चार वर्षांपूर्वी या भागाचे प्रतिनिधित्व करणारे तत्कालीन उपसरपंच गणेश खळदकर व त्यांचे सर्व सहकारी यांनी ग्रामपंचायतीमध्ये या भागात संरक्षक भिंत व्हावी यासाठी ठराव करून गटविकास अधिकारी, तहसीलदार या शासनाच्या प्रतिनिधींना सादर केला होता; पण त्यावर अंमलबजावणी तर दूरच; पण साधी या भागाची पाहणीदेखील झाली नसल्याने प्रशासनाच्या या उदासीनतेवर नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.या भागाचे प्रतिनिधित्व करणारे खासदास सुप्रिया सुळेव आमदार राज्याचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमत्री विजय शिवतारे यांनाही या धोक्याची कल्पना या नागरिकांनी दिली आहे; पण त्यांच्याकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे प्रशासन व लोकप्रतिधी यांना येथे माळीण, उत्तराखंडसारखी परिस्थिती पाहायची आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.