शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

पुरात जाऊ शकते निम्मे खळद गाव

By admin | Updated: August 6, 2016 00:54 IST

नदीला ज्या-ज्या वेळी पूर येतो, अशा वेळी नदीचे पात्र हळूहळू गावाच्या बाजूला विस्तारत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

खळद : गावाच्या उत्तर बाजूने कऱ्हा नदी वाहते. या नदीला ज्या-ज्या वेळी पूर येतो, अशा वेळी नदीचे पात्र हळूहळू गावाच्या बाजूला विस्तारत असल्याचे पाहावयास मिळत आहे. आज रोजी कधीही एखादा मोठा पूर आला, तर गावाला मोठा धोका पोहचून निम्मे गाव वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या भागात गावालगत तातडीने संरक्षक भिंत होण्याची गरज आहे.गावातील हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आदी महत्त्वाच्या इमारतीही या नदीलगत आहेत. या नदीपासून या इमारतीमध्ये जवळपास शंभर ते दोनशे मीटरपर्यंत अंतर असल्याचे बोलले जाते. पण, आज रोजी हे अंतर फार कमी झाले असून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र धोक्याच्या क्षेत्रात आहे. पूर्वी गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ ब्राह्मणडोह प्रसिद्ध होता. गावातील २० ते २५ वर्षांपूर्वीच्या अगोदरच्या काळातील शेकडो नागरिक याच डोहावर पोहण्यास शिकले असल्याचे बोलले जाते; पण आता मात्र नदीच्या विस्तारात हा ब्राह्मणडोह अस्तित्वातच राहिला नसल्याचे दिसते. तर, याच परिसरात शाळेच्याच बाजूला असलेल्या अनेक जुन्या खुणाही नामशेष झाल्या आहेत. कऱ्हा नदीच्या पात्रातून पाहिले, तर हा भाग उंचवट्यावर दिसतो. पण, याच उंचवट्याचा पाया नदीने हळूहळू गिळंकृत केल्याचे पाहावयास मिळते. यामुळे सध्या येथे शाडो या चिकट मातीचा थर आहे; पण हा थर संपत पोकळ भाग लागला. तर, एखाद्या पत्याच्या बंगल्यासारखे हे गाव कऱ्हा नदीपात्रात कोसळेल. सर्व होत्याचे नव्हते होईल. अशी परिस्थिती ओढवली तर सर्वप्रथम नदीचे पाणी गावाच्या ईभाड आळीतून गावात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी प्रशासनाने या भागाची पाहणी करून संरक्षक भिंत बांधण्याची गरज असल्याची मागणी गावचे नागरिक करीत आहेत.(वार्ताहर)>याबाबत तीन ते चार वर्षांपूर्वी या भागाचे प्रतिनिधित्व करणारे तत्कालीन उपसरपंच गणेश खळदकर व त्यांचे सर्व सहकारी यांनी ग्रामपंचायतीमध्ये या भागात संरक्षक भिंत व्हावी यासाठी ठराव करून गटविकास अधिकारी, तहसीलदार या शासनाच्या प्रतिनिधींना सादर केला होता; पण त्यावर अंमलबजावणी तर दूरच; पण साधी या भागाची पाहणीदेखील झाली नसल्याने प्रशासनाच्या या उदासीनतेवर नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.या भागाचे प्रतिनिधित्व करणारे खासदास सुप्रिया सुळेव आमदार राज्याचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमत्री विजय शिवतारे यांनाही या धोक्याची कल्पना या नागरिकांनी दिली आहे; पण त्यांच्याकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे प्रशासन व लोकप्रतिधी यांना येथे माळीण, उत्तराखंडसारखी परिस्थिती पाहायची आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.