शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

अर्ध्या तासात पावसाने शहराला झोडपले; गारव्याने दिलासा चाकरमान्यांची त्रेधातिरपीट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 20:04 IST

तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात असतानाच अखेर मंगळवारी संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली: तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात असतानाच अखेर मंगळवारी संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या अर्धा तासात पावसाने शहराला झोडपून काढले. ऐनवेळी आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांसह पादचाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली होती. राज्य शासनाच्या कडक निर्बंध संदर्भातील बदलांमुळे शहरातील दुकाने दुपारी दोन वाजल्यानंतर बंद करण्यात आली होती, त्यामुळे शहरातील प्रमुख हमरस्त्यांवर संध्याकाळी पावसाचा अंदाज घेत तुलनेने शुकशुकाट पसरला होता.

कामावर गेलेले चाकरमानी घरी परतत असताना त्यांचे मात्र हाल झाले. पावसाचा जोर खूप असल्याने नागरिकांनी रिक्षेचा पर्याय स्वीकारला होता, मात्र काही वेळाने रिक्षादेखील उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी आडोसा शोधत एका ठिकाणी थांबणे पसंत केले. रस्त्यांवर किरकोळ चीजवस्तू विक्रेत्यांची देखील गौरसोय झाली होती. पूर्वेकडील, पश्चिमेकडे रेल्वे स्थानक परिसरात अनेकांनी फलाटात प्रतीक्षा करणे पसंत केले. अर्धा तासांहून अधिक वेळ पावसाचा जोर।कमी झाला नव्हता. पावसामुळे काही वेळात वातावरणात गारवा निर्माण झाल्याने प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

वीज पुरवठा खंडित 

महावितरणच्या मुख्य विजवाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने शहरातील काही भागात दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला होता. काही भागात वीज प्रवाह डिम देखील झाला होता. संध्याकाळच्या पावसात मात्र शहरातील वीज पुरवठा सुरळीत असल्याचे निदर्शनास आले. 

टॅग्स :Rainपाऊसkalyanकल्याणthaneठाणेdombivaliडोंबिवली