शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा अर्धा ग्लास शेअर केला नाही म्हणून पाच वेळा चाकूने भोसकलं

By admin | Updated: April 19, 2017 11:11 IST

पिण्यासाठी पाणी मागितल्यावर नकार दिल्याने संतापलेल्या व्यक्तीने पाच वेळा चाकूने भोसकलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - पाणी म्हणजे जीवन असं म्हणतात. पण याच पाण्यामुळे एका व्यक्तीवर आपला जीव गमावण्याची वेळ आली. पिण्यासाठी पाणी मागितल्यावर नकार दिल्याने संतापलेल्या व्यक्तीने पाच वेळा चाकूने भोसकलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे येथे एका हॉटेलबाहेर ही घटना घडली. पीडित व्यक्तीला एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर आरोपी अफरोज खान (37) याला पोलिसांनी अटक केली आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "रात्री 10.30 वाजता वांद्रे येथील वरोडा रोडवर ही घटना घडली. पीडित व्यक्ती ग्लासने पाणी पित असताना अफरोज खान तिथे पोहोचला, आणि ग्लासमधील अर्ध पाणी पिण्यासाठी मागू लागला. पीडित व्यक्ती अफरोजला ओळखत नसल्याने त्याने सरळ नकार दिला. मात्र त्याने उद्धटपणे दिलेला नकार अफरोज खानच्या संतापाचं कारण ठरलं. त्याने हॉटेलच्या आत जाऊन चाकू बाहेर आणला आणि सरळ हल्ला करण्यास सुरुवात केली. अफोरजने पाच वेळा चाकूने वार केले, ज्यामध्ये पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत". 
 
पोलिसांनी कलम 326 अंतर्गत (धोकादायक शस्त्र किंवा साधनाच्या माध्यमातून स्वच्छेने गंभीर जखम पोहोचवणे) गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अफरोज खान बेघर असल्याने त्याला शोधणं पोलिसांसाठी सोपं नव्हतं. मात्र पोलिसांनी खब-यांच्या सहाय्याने अफरोजचा शोध लावून त्याला अटक केली आहे.