शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पाण्याचा अर्धा ग्लास शेअर केला नाही म्हणून पाच वेळा चाकूने भोसकलं

By admin | Updated: April 19, 2017 11:11 IST

पिण्यासाठी पाणी मागितल्यावर नकार दिल्याने संतापलेल्या व्यक्तीने पाच वेळा चाकूने भोसकलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - पाणी म्हणजे जीवन असं म्हणतात. पण याच पाण्यामुळे एका व्यक्तीवर आपला जीव गमावण्याची वेळ आली. पिण्यासाठी पाणी मागितल्यावर नकार दिल्याने संतापलेल्या व्यक्तीने पाच वेळा चाकूने भोसकलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे येथे एका हॉटेलबाहेर ही घटना घडली. पीडित व्यक्तीला एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर आरोपी अफरोज खान (37) याला पोलिसांनी अटक केली आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "रात्री 10.30 वाजता वांद्रे येथील वरोडा रोडवर ही घटना घडली. पीडित व्यक्ती ग्लासने पाणी पित असताना अफरोज खान तिथे पोहोचला, आणि ग्लासमधील अर्ध पाणी पिण्यासाठी मागू लागला. पीडित व्यक्ती अफरोजला ओळखत नसल्याने त्याने सरळ नकार दिला. मात्र त्याने उद्धटपणे दिलेला नकार अफरोज खानच्या संतापाचं कारण ठरलं. त्याने हॉटेलच्या आत जाऊन चाकू बाहेर आणला आणि सरळ हल्ला करण्यास सुरुवात केली. अफोरजने पाच वेळा चाकूने वार केले, ज्यामध्ये पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत". 
 
पोलिसांनी कलम 326 अंतर्गत (धोकादायक शस्त्र किंवा साधनाच्या माध्यमातून स्वच्छेने गंभीर जखम पोहोचवणे) गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अफरोज खान बेघर असल्याने त्याला शोधणं पोलिसांसाठी सोपं नव्हतं. मात्र पोलिसांनी खब-यांच्या सहाय्याने अफरोजचा शोध लावून त्याला अटक केली आहे.