शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

कागदावरच्या योजनेवर दीड कोटी खर्च

By admin | Updated: August 20, 2014 01:00 IST

सातही दिवस २४ तास पाणी देण्याच्या योजनेखाली प्राधिकरणने तब्बल दीड कोटी रुपयांची वाट लावली. ‘२४ बाय सात’ असे गोंडस नाव देवून योजना जाहीर केली. मात्र गत तीन वर्षांपासून यवतमाळकर या

जीवन प्राधिकरण : तीन वर्षांपासून २४ तास पाण्याची प्रतीक्षाचविलास गावंडे - यवतमाळसातही दिवस २४ तास पाणी देण्याच्या योजनेखाली प्राधिकरणने तब्बल दीड कोटी रुपयांची वाट लावली. ‘२४ बाय सात’ असे गोंडस नाव देवून योजना जाहीर केली. मात्र गत तीन वर्षांपासून यवतमाळकर या योजनेच्या प्रतिक्षेतच आहेत. ही रक्कम नेमकी कशावर खर्च झाली हा मात्र आता संशोधनाचा विषय झाला आहे. आर्थिक डबघाईस आलेल्या या विभागाने कागदावरच असलेल्या या योजनेवर इतका खर्च कसा केला, हा प्रश्न आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने एक मॉडेल म्हणून ‘२४ बाय सात’ योजना जाहीर केली. सुजल निर्मल अभियानांतर्गत योजनेला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यानुसार अमरावती येथे चार झोनमध्ये सुमारे आठ कोठी ७४ लाख रुपये खर्च करून योजनेला मूर्त रूप देण्यात आले. ही योजना यशस्वी झाल्याचा दावा करतानाच यवतमाळ शहरासाठीही योजना आखण्यात आली. तीन वर्षांपूर्वी यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला. शहराची पाण्याची गरज आणि आवश्यक पाणीसाठा याचा कुठलाही विचार न करता योजनेला हात घालण्यात आला. आजच्या स्थितीत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. ‘२४ बाय सात’ची घोषणा आणि कारवाई करतानाही हीच परिस्थिती होती. तरीही प्राधिकरणने या योजनेचा बिगुल फुंकला. यवतमाळ शहरासाठी ही योजना यशस्वी होणार की नाही याचा कुठलाही विचार न करता खर्चाचा सपाटा सुरु ठेवला. योजनेसाठी ३ मार्च २०१४ पर्यंत एक कोटी ४३ लाख २३ हजार रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. हा खर्च नेमका कुठल्या कामासाठी झाला, याचा हिशेबही अतिशय तकलादू आहे. केवळ टेबल-खुर्च्या, लॅपटॉप यावरच एवढा खर्च झाला असावा काय, याविषयी साधार शंका व्यक्त केली जात आहे.‘२४ बाय सात’ पद्धतीने पाणीपुरवठ्यासाठी सद्यस्थितीतील जलवाहिन्या बदलणे किंवा नवीन जलवाहिण्या टाकणे, तांत्रिकदृष्टया परिपूर्ण नकाशे अशी कामे सुचविण्यात आली होती. या कामांसाठी दोन कोटी २८ लाख २८ हजार रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र सुचविलेल्यापैकी वास्तवात किती कामे झाली हे सांगण्यासाठी कुण्या तज्ज्ञाची गरज नाही. तथापि, या योजनेवर १ कोटी ४३ लाख २३ हजार रुपयांचा खर्च मार्च २०१४ पर्यंत दाखविण्यात आला आहे. ही रक्कम नेमकी कशावर खर्च करण्यात आली, हा संशोधनाचा विषय आहे. प्राधिकरण आर्थिक अडचणीत असताना जनतेचा पैसा पाण्यासारखा वापरण्यात आला. या प्रकाराला जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.