शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

"आता राज ठाकरे यांची सटकली का? हेच जर एकाद्या मुस्लीम व्यक्तीकडून घडलं असतं तर...!" गुणरत्न सदावर्ते स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 19:22 IST

गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. ही गोष्ट जर चुकूण एखाद्या अल्पसंख्यक मुस्लीमाच्या हातून झाली असती, तर किती तिळपापड झाला असता, असे म्हणत, आता राज ठाकरे यांची सटकली का? असा सवालही गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी केला.  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १९वा वर्धापन दिवस आज रविवारी पुण्यात पार पडला. या कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंगा नदीच्या पाण्यासंदर्भात भाष्य केले. "बाळा नांदगावकर माझ्यासाठी गंगेचे पाणी घेऊन आले होते. पण, मी म्हणालो हड, मी नाही पिणार. पूर्वीच्या काळी ठीक होतं. आता सोशल मीडियावर बघितलं. लोक त्यात अंग घासून अंघोळ करताहेत. कोण पिणार ते पाणी? डोकी हलवा, जरा अंधश्रद्धेतून बाहेर या", असे म्हणत, राज ठाकरे यांनी गंगेतील दूषित पाण्यासंदर्भात भाष्य केले. यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. ही गोष्ट जर चुकूण एखाद्या अल्पसंख्यक मुस्लीमाच्या हातून झाली असती, तर किती तिळपापड झाला असता, असे म्हणत, आता राज ठाकरे यांची सटकली का? असा सवालही गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी केला. काय म्हणाले सदावर्ते? -राज ठाकरे यांच्या विधानावर बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, "मला असे वाटते की, आता राज ठाकरे यांना जहीर करावे लागेल की, त्यांचा पक्ष हिंदुत्ववादी आहे की नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता त्यांन जाऊन विचारायला हवे, जे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यावर टीका करत असतात त्यांनी. त्यांनी आता स्वतःच विचार करायला हवा की, राज ठाकरे यांची भूमिका, आता कशा प्रकारची आहे? कारण राज ठाकरे यांना श्रद्धा हा भारतीय संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार समजत नसेल, त्यातल्या त्यात, या देशात, या राज्यात, बहुसंख्य हिंदू आहेत आणि त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी संविधानाने संरक्षण दिले आहे. असे असताना, गंगा हा विषय एका अस्थेसोबत जोडला गेला आहे. त्या एकूण गंगांचाही त्यांनी अपमान केला आहे." सदावर्ते टीव्ही९ सोबत बोलत होते. 

"राज ठाकरे तीर्थ पिण्याची सक्ती नाही, पण..." -सदावर्ते पुढे म्हणाले, "याच बरोबर, बाळा नांदगावकर यांच्यासारख्या व्यक्तींने अत्यंत श्रद्धेने जर गंगा मातेचे तीर्थ आणलेले असेल आणि त्या तीर्थाची अवहेलना, त्या तीर्थाची हेटाळणी, स्वतःच्या आयुष्यातही केली, ठेवरे तिकडे, मी नाही पिणार म्हणून. राज ठाकरे पिण्याची सक्ती नाही. परंतु सार्वजनिक जीवनात कसे वागावे, कसे वर्तन करावे, इतरांच्या भावना दुखावणार नाहीत, हे बघायला हवे."

"आता राज ठाकरे यांची सटकली का?" -"ही गोष्ट जर चुकूण एखाद्या अल्पसंख्यक मुस्लीमाच्या हातून झाली असती, तर किती तिळपापड झाला असता, हे लक्षात घ्यायला हवे राज ठाकरे," असेही सदावर्ते म्हणाले. तसेच, "आता राज ठाकरे यांची सटकली का?" असा सवालही गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Gunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेRaj Thackerayराज ठाकरे