शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

गुजरातचे ‘ओझे’ मुंबईच्या खांद्यावर !

By admin | Updated: February 1, 2016 03:05 IST

कमी भाडे मिळत असल्याकारणाने बम्बार्डियर कंपनीच्या रेल्वे डब्यांची निर्यात करण्यास गुजरातमधील खासगी बंदरांनी नकार दिला. त्यामुळे आता हे ‘अवजड ओझे’ मुंबई पोर्ट ट्रस्टच्या खांद्यावर टाकण्यात आले आहे.

यदु जोशी, मुंबईकमी भाडे मिळत असल्याकारणाने बम्बार्डियर कंपनीच्या रेल्वे डब्यांची निर्यात करण्यास गुजरातमधील खासगी बंदरांनी नकार दिला. त्यामुळे आता हे ‘अवजड ओझे’ मुंबई पोर्ट ट्रस्टच्या खांद्यावर टाकण्यात आले आहे.नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न केला. त्याअंतर्गत बम्बार्डियर ट्रान्सपोर्टेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बडोदा येथे रेल्वे डब्यांच्या निर्मितीचा प्रकल्प उभारला.बम्बार्डियरच्या बडोदा येथील प्रकल्पात तयार करण्यात आलेले मेट्रो रेल्वेचे सहा डबे पाच दिवसांपूर्वी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या इंदिरा डॉकमधून आॅस्ट्रेलियाकडे रवाना करण्यात आले. एका डब्याची लांबी ७५ फूट असून, वजन ४६ टन इतके आहे. येत्या अडीच वर्षांत आॅस्ट्रेलिया सरकारला ४५० डबे निर्यात करण्यात येणार आहे़ त्याची सुरुवातही आहे. एक डबा जहाजावर चढविण्यासाठी पोर्टला १ लाख ८० हजार रुपये भाडे मिळते; मात्र त्यासाठी तब्बल दोन तासांचा अवधी लागतो. तितक्याच वजनाचा स्टील रोल चढविण्यासाठी केवळ पाच मिनिटे लागतात, पण भाडे मात्र जवळपास तेवढेच मिळते. त्यामुळे कमी भाड्याचा हा नसता उद्योग करण्यास गुजरातमधील बंदरांनी नकार दिल्याने रेल्वे डबे जहाजावर चढविण्याचे हे ‘जड ओझे’ मुंबई पोर्टच्या खांद्यावर येऊन पडले.> याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष रवी परमार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की गुजरातमधील बंदरे खासगी मालकीची आहेत आणि ती नफा-तोट्याचा विचार करतात. आमच्यासाठी पंतप्रधानांचा ‘मेक इन इंडिया’चा मंत्र महत्त्वाचा आहे. त्यामुळे देशहिताला आम्ही प्राधान्य देतो. शिवाय अशाप्रकारच्या अवजड वस्तू पाठविण्यासाठी आमचे इंदिरा डॉक आदर्श आहे. एकतर तेथील पाणी स्थिर आहे. त्यामुळे वस्तू चढविणे सोपे जाते. दुसरे म्हणजे त्यासाठीचे तांत्रिक ज्ञान असलेला प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आमच्याकडे आहे. त्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्टने विश्वासार्हता कमावलेली आहे. कार, बॉयलर आदी पाठविण्यासाठीही कंपन्या याच बंदराला प्राधान्य देतात. >मुंबई पोर्ट ट्रस्ट बंद करण्याचा केंद्र सरकारचा डाव असून, येथील कामकाज गुजरातमधील कांडला येथे हलविले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने गतवर्षी केला होता. मात्र त्या उलट गेल्या वर्षात पोर्ट ट्रस्टचा व्यवसाय वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्षात या बंदरातून ६१ दशलक्ष टन मालाची वाहतूक झाली होती. यंदाच्या आर्थिक वर्षात आताच हा आकडा ५० दशलक्ष टनावर गेला आहे. मात्र आता गुजरातमधील उद्योगांचे ओझे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या खांद्यावर टाकले जात असल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.