शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

सिंधुदुर्गचे पालकमंत्री केसरकर अकार्यक्षम

By admin | Updated: May 25, 2017 21:39 IST

सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या अडीच वर्षात "चांदा ते बांदा "ही योजना राबवून त्यासाठी अनेक बैठका घेतल्या आहेत.

ऑनलाइन लोकमतकणकवली, दि. 25 - सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या अडीच वर्षात "चांदा ते बांदा "ही योजना राबवून त्यासाठी अनेक बैठका घेतल्या आहेत. मात्र, या योजनेतून विकास झालेला काही दिसत नाही. त्यामुळे त्यांचा अधिकाऱ्यांवर अंकुश नसल्याचेच सिध्द होत आहे. प्रशासनावर त्यांचा कोणताही वचक राहिलेला नाही, त्यामुळे पालकमंत्री अकार्यक्षम ठरले आहेत.अशी टिका राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे केली. येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सतीश सावंत म्हणाले, जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी नसल्याने पाटबंधारे प्रकल्पांची कामे ठप्प झाली आहेत. तर धरणाची कामे कूर्म गतीने चालु आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी करोड़ो रुपयांचा निधी आणला अशा वल्गना पालकमंत्री तसेच शासन करीत आहे. ही जनतेची दिशाभूल आहे. पालकमंत्री फक्त थापा मारित आहेत.एमआरजीएसच्या माध्यमातून जिल्ह्यात करोड़ो रुपयांचा निधी येऊ शकतो. मात्र, या योजनेची प्रभाविपणे अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. पालकमंत्री प्रभावी यंत्रणा उभी करु शकलेले नाहीत. त्याचप्रमाणे महिलांसाठी जिल्ह्यात एकही योजना परिणामकारकपणे राबविली गेलेली नाही. त्यामुळे महिलांचे दरडोई उत्पन्न वाढलेले नाही. शिवसेना - भाजप युतीच्या शासनाने फक्त अच्छे दिन चे स्वप्न जनतेला दाखविले. मात्र त्या दिशेने शासनाचे पाऊल पडत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा शासनाकडून केली जाते. परंतु असलेले उत्पन्न ते टिकवू शकत नाहीत. तर दुप्पट उत्पन्न काय करणार ? गोदामामध्ये भात साठा पडून आहे. त्याची उचल होत नाही. नवीन भात खरेदी केली जात नाही. शेतकऱ्यांच्या हिताशी पालकमंत्र्यांचे काही देणे घेणे लागत नाही. त्यामुळे त्यांना त्यांची चिंता नाही. सिंधुदुर्गात जलयुक्त शिवार योजना राबविली जात असून विहीर, नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी या योजनेतून जी गावे प्रशासनाने निवडली आहेत. त्या गावातील विहिरी व नदीपात्रातील गाळ उपसा करण्यासाठी या यंत्रणेकडे मशीन उपलब्ध नाही. त्यामुळे गाळ उउपसण्याचे काम ठप्प आहे.ऑनलाइन सातबारा उताऱ्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारली नसल्याने सातबारा मिळत नाही. तलाठ्यांकडे वारस नोंद , वारस तपासणी साठी ग्रामस्थाना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास पालकमंत्री अपयशी ठरले असून त्यांचा कोणत्याही प्रकारचा वचक प्रशासनावर नाही. हेच यातून सिध्द होत असल्याचेही सतीश सावंत यावेळी म्हणाले.