शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कंत्रटी कामगारांना पालकमंत्र्यांचा दिलासा

By admin | Updated: August 5, 2014 00:11 IST

वर्षानुवर्षे ठेकेदारांमार्फत महापालिकेच्या सेवेत काम करणा:या कंत्रटी कामगारांना पालकमंत्री गणोश नाईक यांनी आज मोठा दिलासा दिला आहे.

नवी मुंबई : वर्षानुवर्षे ठेकेदारांमार्फत महापालिकेच्या सेवेत काम करणा:या कंत्रटी कामगारांना पालकमंत्री गणोश नाईक यांनी आज मोठा दिलासा दिला आहे. या सर्व कामगारांना सेवेत कायम करून घेण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या 8 ऑगस्ट रोजी होणा:या सर्वसाधारण सभेत ठराव मांडण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. 
पालकमंत्री नाईक यांनी कंत्रटी कामगारांना नेहमीच सामाजिक न्याय प्रदान केला आहे. या कामगारांना समान कामास समान वेतन मिळवून दिले आहे. त्यांच्याच प्रयत्नाने या कामगारांना पीएफ, बोनस, ग्रॅच्युईटी आदींचा लाभ  मिळतो आहे. मात्र गेली अनेक वष्रे कार्यरत असूनही हे कामगार कायम झालेले नाहीत. या पाश्र्वभूमीवर महापालिका सेवेतील कंत्रटी कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री नाईक यांनी आज एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला महापालिका आयुक्त  आबासाहेब ज:हाड, महापौर सागर नाईक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या सर्व कामागारांना सेवेत कायम करण्यासंदर्भात सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत आयुक्त व महापौरांना दिले. त्यानुसार येत्या 8 ऑगस्ट रोजी होणा:या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कंत्रटी कामागारांना दिलासा देणारा अशासकीय ठराव मांडण्यात येणार आहे. महापालिकेच्या विविध विभागात काम करणा:या 9500 कंत्रटी कामगारांना याचा लाभ होणार आहे.
विशेष म्हणजे  हा ठराव मंजूर होईर्पयत या कामगारांचा बेसिक पगार आणि भत्ते वाढविण्याची सूचना देखील पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. कंत्रटी कामगारांना कायम करण्याच्या पालिकेच्या ठरावास राज्य शासनाने तातडीने परवानगी द्यावी अशी मागणी माजी खासदार संजीव नाईक यांनी केली आहे. शासनाकडून ही मंजुरी न मिळाल्यास प्रसंगी कामगारहितास्तव राज्य शासनाविरोधात जनहित याचिका दाखल करण्याची भूमिका सुध्दा त्यांनी बोलून दाखविली आहे. 
कंत्रटी कामगारांना कायम करण्याचा पालकमंत्र्यांचा निर्णय म्हणजे सामाजिक क्रांतीच असल्याचे मत नवी मुंबई म्युनिसिपल युनियनचे  कार्याध्यक्ष रमाकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
 
महापालिकेच्या सफाई खात्यात 286क्, पाणीपुरवठा खात्यात 45क्, मलनि:सारण खात्यात 238, परिवहन उपक्रमात 969, उद्यान विभाग 415 इत्यादी सर्व खात्यात मिळून कंत्रटी कामगारांचा आकडा सुमारे 95क्क् इतका आहे.  या कामगारांचा रोजगार वाचला पाहिजे यासाठी ठेकेदार बदलला तरी कामगार बदलता कामा नये हे पालकमंत्री नाईक यांचे कामगारहिताचे धोरण पालिकेने अवलंबले आहे. 
 
आम्हाला नोकरीत कायम करण्याचा निर्णय होणार असल्याचे ऐकून आनंद झाला आहे. पालकमंत्री गणोश नाईक यांनी नेहमीच सर्व सामान्य कामगारांचे हित जोपासले आहे. नामदार नाईक आम्हाला कायम करून न्याय देतील असा विश्वास असल्याचे मत नरेंद्र वैराळ या कामगाराने व्यक्त केले आहे.
 
पालकमंत्री गणोश नाईक यांच्या कल्याणकारी धोरणानुसार समान कामास समान वेतन देणारी नवी मुंबई महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. आता कंत्रटी कामगारांना कायम करण्याचा आणखी एक क्रांतीकारी निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे कंत्रटी पध्दतीचे समूळ उच्चाटन होणार आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून प्रशासनाने त्यावर तातडीने कार्यवाही करणो गरजेचे आहे. 
-अॅड. सुरेश ठाकूर, 
सरचिटणीस, नवी मुंबई म्युन्सिपल 
मजदूर युनियन