शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर पडेल : जयंत पाटील

By admin | Updated: May 24, 2017 21:00 IST

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) दीर्घकालीन फायदे आहेत. देशभरात एकसमान दराने बाजार चालेल.

ऑनलाइन लोकमत
इस्लामपूर,(सांगली) दि. 24  : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) दीर्घकालीन फायदे आहेत. देशभरात एकसमान दराने बाजार चालेल. मात्र वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी करणारी सक्षम अशी यंत्रणा सक्रिय नाही. त्यामुळे जीएसटीची अंमलबजावणी पुढे ढकलली जाईल, असे सुतोवाच राज्याचे माजी अर्थमंत्री, आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केले.
 
जीएसटीला मंजुरी देण्याच्या मुंबईतील विशेष अधिवेशनानंतर इस्लामपूरला परतलेल्या पाटील यांनी पत्रकारांशी जीएसटी, शेतक-यांची कर्जमाफी, राज्याची आर्थिक परिस्थिती अशा विविध विषयांवर चर्चा केली.
 
यावेळी ते म्हणाले की, वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी करण्यासाठीच्या सर्व चाचण्या अद्याप पूर्ण व्हावयाच्या आहेत. त्यासाठीच्या स्वॉफ्टवेअरचा वापर करणारी यंत्रणा सक्रिय नाही. देशाच्या सर्व राज्यातून एकाचवेळी जीएसटीची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मात्र तसे होईल, असे वाटत नाही. जीएसटीचे दीर्घकालीन फायदे आहेत. देशभरात एकसमान दराने बाजार व्यवस्था चालेल. व्यापाºयांनाही एकाच करप्रणालीमुळे व्यवहार करताना सुलभता मिळेल. या कायद्याचा धाक जरुर असावा, मात्र व्यापाºयांना थेट अटक करण्याची तरतूद ही कायद्याबाबत दहशत निर्माण करणारी आहे. जीएसटीमधून जीवनावश्यक वस्तू वगळाव्यात, अशी आम्ही मागणी केली आहे.
 
राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचे फलित काय, या प्रश्नावर आमदार पाटील म्हणाले की, भाजप सरकार कर्जमाफी करेल, अशी अपेक्षा आहे. मात्र निवडणुकीतील मतांवर डोळा ठेवूनच ते हा निर्णय घेतील. कर्जमाफीच्या प्रश्नावरून सेनेला सत्ता सोडायची नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपर्यंत भाजपकडून शिवसेनेला गोंजारले जाईल. त्यांच्या मतांचे मूल्य २५ हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरील मते ते बाहेर जाऊ देणार नाहीत. या निवडणुकीत भाजपकडून जातीय समीकरण साधले जाण्याची शक्यता आहे.
 
आरएसएसची तत्त्वे सोडून सत्तेची तत्त्वे काय आहेत, हे भाजपला चांगले कळले आहे, असेही ते म्हणाले.राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत ते म्हणाले की, अबकारी कर, मुद्रांक शुल्क, विक्री कर यामध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. अर्थसंकल्पात जेवढी वाढ अपेक्षित धरली आहे, तेवढा महसूल मिळेल, अशी परिस्थिती नाही. यंदाचा अर्थसंकल्प तुटीचा आहे. त्यातच महसुलात घट झाल्याने त्याचा विपरित परिणाम राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर झाला आहे. नोटाबंदी, दारू बंदीचाही महसुलाला फटका बसला आहे. शेतमालाचे दर वाढले तर, महागाई वाढेल, अशी भाजप सरकारची धारणा आहे. त्यामुळे शेतीमालाला दीडपट वाढ देण्याचे आश्वासन ते पाळतील, असे वाटत नाही. यंदा उसाचा हमी भाव वाढेल, अशी परिस्थिती आहे.