शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

‘जीएसटीमुळे अर्थक्रांतीची सुरुवात’

By admin | Updated: July 15, 2017 03:21 IST

अर्थक्रांतीची सुरूवात झाल्याचे सांगून अशा प्रकारची करप्रणाली तयार करणारा भारत हा एकमेव देश असल्याचा दावा केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी केला

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जीएसटीमुळे देशात मोठ्या अर्थक्रांतीची सुरूवात झाल्याचे सांगून अशा प्रकारची करप्रणाली तयार करणारा भारत हा एकमेव देश असल्याचा दावा केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी केला. ते ठाण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी त्यांना हा दावा केला. तसेच भारताला क्रमांक एकचा देश बनवायचा असेल, तर आधी दोन नंबरचा व्यवसाय बंद करावा लागेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. टीपटॉप प्लाझा येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी, टीजेएसबी बँक आणि लेखापाल संघटनेच्यावतीने शुक्रवारी वस्तू व सेवाकरासंदर्भात कार्यक्रम झाला. जीएसटीमुळे आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे या कराच्या माध्यमातून देशामध्ये मोठ्या अर्थक्रांतीची सुरुवात झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. २२ राज्यांतील सीमातपासणीनाके बंद झाल्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या मालवाहू वाहनांचा ३० टक्के वेळ वाचत आहे. त्याचा फायदा विविध कंपन्यांना होऊ लागला आहे, असेही त्यांनी सांगितले. या कराची अंमलबजावणी केल्यानंतर नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतु, त्यावर मात करण्यासाठी केंद्राने सेवा केंद्र आणि कॉलसेंटर अशी यंत्रणा उभारली असल्याचे त्यांनी सांगितले . वस्तूव सेवाकराच्या अर्थक्रांतीमुळे देशातील गरीब हा गरीब राहणार नाही, मध्यमवर्गीय श्रीमंत होण्याच्या दिशेने वाटचाल करेल आणि श्रीमंतांचाही आर्थिक दर्जा आणखी उंचावेल, असा दावा राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी यावेळी बोलताना केला.... तर कर भरावा लागेलसध्या भारताचा विकासदर चीनपेक्षा चार टक्क्यांनी कमी आहे. भारत आणि चीनचे सैन्यदल एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे चीनसोबत दोन हात करायचे असतील, तर आपल्याला कराचा भरणा करून विकासदर वाढवणे गरजेचे असल्याचे राज्यमंत्री सिन्हा यांनी स्पष्ट केले.