शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

‘जीएसटीमुळे अर्थक्रांतीची सुरुवात’

By admin | Updated: July 15, 2017 03:21 IST

अर्थक्रांतीची सुरूवात झाल्याचे सांगून अशा प्रकारची करप्रणाली तयार करणारा भारत हा एकमेव देश असल्याचा दावा केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी केला

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जीएसटीमुळे देशात मोठ्या अर्थक्रांतीची सुरूवात झाल्याचे सांगून अशा प्रकारची करप्रणाली तयार करणारा भारत हा एकमेव देश असल्याचा दावा केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी केला. ते ठाण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी त्यांना हा दावा केला. तसेच भारताला क्रमांक एकचा देश बनवायचा असेल, तर आधी दोन नंबरचा व्यवसाय बंद करावा लागेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. टीपटॉप प्लाझा येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी, टीजेएसबी बँक आणि लेखापाल संघटनेच्यावतीने शुक्रवारी वस्तू व सेवाकरासंदर्भात कार्यक्रम झाला. जीएसटीमुळे आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे या कराच्या माध्यमातून देशामध्ये मोठ्या अर्थक्रांतीची सुरुवात झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. २२ राज्यांतील सीमातपासणीनाके बंद झाल्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या मालवाहू वाहनांचा ३० टक्के वेळ वाचत आहे. त्याचा फायदा विविध कंपन्यांना होऊ लागला आहे, असेही त्यांनी सांगितले. या कराची अंमलबजावणी केल्यानंतर नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतु, त्यावर मात करण्यासाठी केंद्राने सेवा केंद्र आणि कॉलसेंटर अशी यंत्रणा उभारली असल्याचे त्यांनी सांगितले . वस्तूव सेवाकराच्या अर्थक्रांतीमुळे देशातील गरीब हा गरीब राहणार नाही, मध्यमवर्गीय श्रीमंत होण्याच्या दिशेने वाटचाल करेल आणि श्रीमंतांचाही आर्थिक दर्जा आणखी उंचावेल, असा दावा राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी यावेळी बोलताना केला.... तर कर भरावा लागेलसध्या भारताचा विकासदर चीनपेक्षा चार टक्क्यांनी कमी आहे. भारत आणि चीनचे सैन्यदल एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे चीनसोबत दोन हात करायचे असतील, तर आपल्याला कराचा भरणा करून विकासदर वाढवणे गरजेचे असल्याचे राज्यमंत्री सिन्हा यांनी स्पष्ट केले.