शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

‘जीएसटीमुळे अर्थक्रांतीची सुरुवात’

By admin | Updated: July 15, 2017 03:21 IST

अर्थक्रांतीची सुरूवात झाल्याचे सांगून अशा प्रकारची करप्रणाली तयार करणारा भारत हा एकमेव देश असल्याचा दावा केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी केला

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जीएसटीमुळे देशात मोठ्या अर्थक्रांतीची सुरूवात झाल्याचे सांगून अशा प्रकारची करप्रणाली तयार करणारा भारत हा एकमेव देश असल्याचा दावा केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी केला. ते ठाण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी त्यांना हा दावा केला. तसेच भारताला क्रमांक एकचा देश बनवायचा असेल, तर आधी दोन नंबरचा व्यवसाय बंद करावा लागेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. टीपटॉप प्लाझा येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी, टीजेएसबी बँक आणि लेखापाल संघटनेच्यावतीने शुक्रवारी वस्तू व सेवाकरासंदर्भात कार्यक्रम झाला. जीएसटीमुळे आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे या कराच्या माध्यमातून देशामध्ये मोठ्या अर्थक्रांतीची सुरुवात झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. २२ राज्यांतील सीमातपासणीनाके बंद झाल्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या मालवाहू वाहनांचा ३० टक्के वेळ वाचत आहे. त्याचा फायदा विविध कंपन्यांना होऊ लागला आहे, असेही त्यांनी सांगितले. या कराची अंमलबजावणी केल्यानंतर नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतु, त्यावर मात करण्यासाठी केंद्राने सेवा केंद्र आणि कॉलसेंटर अशी यंत्रणा उभारली असल्याचे त्यांनी सांगितले . वस्तूव सेवाकराच्या अर्थक्रांतीमुळे देशातील गरीब हा गरीब राहणार नाही, मध्यमवर्गीय श्रीमंत होण्याच्या दिशेने वाटचाल करेल आणि श्रीमंतांचाही आर्थिक दर्जा आणखी उंचावेल, असा दावा राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी यावेळी बोलताना केला.... तर कर भरावा लागेलसध्या भारताचा विकासदर चीनपेक्षा चार टक्क्यांनी कमी आहे. भारत आणि चीनचे सैन्यदल एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे चीनसोबत दोन हात करायचे असतील, तर आपल्याला कराचा भरणा करून विकासदर वाढवणे गरजेचे असल्याचे राज्यमंत्री सिन्हा यांनी स्पष्ट केले.