शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

ऊस कामगारांचा संप तीव्र करणार - ढाकणे

By admin | Updated: November 4, 2015 02:32 IST

राज्यातील ऊस तोडणी कामगारांना २० टक्के अंतरिम वाढ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, या घोषणेला एक वर्ष उटल्यानंतरही त्याची पूर्तता झालेली नाही.

पुणे : राज्यातील ऊस तोडणी कामगारांना २० टक्के अंतरिम वाढ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, या घोषणेला एक वर्ष उटल्यानंतरही त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी संघटनेचे अध्यक्ष बबनराव ढाकणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.ढाकणे म्हणाले, राज्यात तब्ब्बल १२ ते १५ लाख उसतोडणी कामगार आहेत. शासनाने मजुरी वाढीचा करार २००५मध्ये केला होता. त्यानंतर कोणताही करार झालेला नाही. त्यामुळे मागील वर्षी संघटनेने बेमुदत संप पुकारला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपामुळे राज्याचे नुकसान होत असून, कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही देत, २० टक्के अंतरिम दरवाढ देत असल्याची घोषणा केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या कामगारांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप त्यांनी केला.गेल्या दोन महिन्यांपासून कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. मात्र, शासन तसेच खासगी कारखानदारांकडून साखर संघाच्या कराराचे कारण देत हा संप मोडून काढण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. संघटनेच्या मागण्यांबाबत येत्या तीन दिवसात शासनाने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देतानाच ऐन दिवाळीत शासनाने या कामगारांना उपाशी ठेऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)