शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

कृषीला गती देणारा लोकमत अ‍ॅग्रोत्सव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 04:43 IST

सिंधूच्या खोऱ्यापासून भरभराटीला आलेली कृषी संस्कृती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा झाली.

सिंधूच्या खोऱ्यापासून भरभराटीला आलेली कृषी संस्कृती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा झाली. काळाच्या ओघात कृृषी क्षेत्रात अनेक बदल झाले. तरीही देशाच्या विकासात भरीव योगदान देत कृषी क्षेत्राचा जीडीपी जगात दुसºया स्थानी आहे. वर्षाला ४०० अब्ज उत्पादन असलेले कृषी क्षेत्र विज्ञान तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांवर मात करून एकेक पाऊल पुढे जात आहे. कृषी क्षेत्राच्या वाटचालीला गती देण्याचा भरीव प्रयत्न म्हणजे ‘लोकमत’चा अ‍ॅग्रोत्सव!लोकमत अ‍ॅग्रोत्सवाचा केंद्रबिंदू आहे तो शेती आणि शेतकरी. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील विदर्भ, खान्देश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या चार विभागांतील नागपूर, जळगाव, औरंगाबाद आणि पंढरपूर या शहरांत प्रत्येकी चार दिवस हा कृषी पंढरीचा उत्सव होणार आहे. लोकमत अ‍ॅग्रोत्सवात दीडशेहून अधिक स्टॉल्स लावण्यात येणार असून, दोन लाखांहून अधिक लोक भेट देणार आहेत.मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे त्या त्या विभागातील एक पीक निवडण्यात आले आहे. यात संत्रा (नागपूर), केळी (जळगाव), कापूस (औरंगाबाद), डाळिंब (पंढरपूर) यांचा समावेश आहे. प्रदर्शनात त्या त्या विभागातील निवडलेल्या पिकांच्या उत्पादनवाढीसाठी धोरणे आणि आव्हाने यावर चर्चा केली जाणार आहे.प्रत्येक विभागातील चारदिवसीय अ‍ॅग्रोत्सव शेतकरी आणि शेतीशी संबंधित सर्वांसाठी वाटसरूच ठरणार आहे. शासनाची कृषी धोरणे, मुख्य पिकांचे मूल्य, शाश्वत शेती, पाण्याचे नियोजन आणि सिंचन तंत्रज्ञान, कृषी क्षेत्राच्या वाढीत शासकीय संस्थांची भूमिका, शेतीतील तांत्रिक सुधारणा आणि आधुनिक साहित्य, कृषी विमा यासह एकूण कृषी क्षेत्रातील सुधारणांवर कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि शेतकरी यांच्यात चर्चा घडवून आणली जाणार आहे.एकीकडे कृषी क्षेत्राला दिशा दाखवणाºया आणि नव्याचा शोध घेणाºया यशोगाथा झळकत आहेत, तर दुसरीकडे नैसर्गिक साधनांचा तुटवडा, ग्रामीण आणि शहरी उत्पन्नातील वाढती दरी यामुळे शेतकरी आत्महत्यांसारखा प्रश्न उग्र झाला आहे. सुदैवाने यात नव्याने पाऊल ठेवणाºया सुशिक्षित पिढीने आशावाद वाढवला आहे. या पिढीने पारंपरिक पद्धतीला नवशोधांची जोड देत शेतीला उद्योगाचे स्वरूप देण्यात यश मिळवीत आहे. कृषी क्षेत्राच्या वाढीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. शेती क्षेत्रातील बदलांसाठी धडपडणाºया. तसेच शेतकºयांना प्रेरणा देणाºया, शेतीत नवतंत्रज्ञान विकसित करणाºया आणि शोध लावलेल्या शेतकरी, संशोधकांच्या गौरवाने प्रत्येक अ‍ॅग्रोत्सवाचा समारोप होणार आहे. देशातील सर्वात मोठा कृषी पुरस्कार असलेल्या अ‍ॅग्रोत्सवात चार विभागांतील जवळपास दहा हजार शेतकरी सहभागी होणार आहेत. नामांकित ज्युरी वीस श्रेणीतील वीस पुरस्कारांसाठी विजेत्यांची निवड करणार आहेत.>पूर्वी कधी न झालेला उत्सव!शेती येणाºया नव्या पिढीला आणि कृषी क्षेत्राला अधिक सशक्त करण्यासाठी होत असलेला उत्सव म्हणजे अ‍ॅॅग्रोत्सव २०१८-१९. या माध्यमातून दोन लाखांहून अधिक शेतकरी जोडले जाणार आहेत. त्याचबरोबर मुद्रित आणि डिजिटल माध्यमातून कृषी क्षेत्राचा विस्तारीकरण करण्याचा प्रयत्न होणार आहे. कृषी क्षेत्रातील विशिष्ट समूहांशी थेट संपर्क करण्याची सुवर्र्णसंधी अ‍ॅग्रोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. या अग्रोत्सवाच्या अधिक माहितीसाठी मोविन मेन्झेस (मो.नं. ७४००१९९९३९) आणि प्रशांत पाटील (मो.नं. ९७६६९२८६८७) यांच्याशी संपर्क साधावा. लोकमत अ‍ॅग्रोत्सवाचा नियोजित कार्यक्रम असा : नागपूर - १९ ते २१ जानेवारी २०१८ (रेशीम बाग). औरंगाबाद- २५ ते २८ जानेवारी २०१९ (कासलीवाल तापडिया मैदान). जळगाव - २ ते ५ फेबु्रवारी २०१९ (जी.एस.मैदान/सागर पार्क). पंढरपूर - १३ ते १६ फेब्रुवारी २०१९ (कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान).