शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

शिवसेनेवर शेतक-यांचा वाढता विश्वास ही विरोधी पक्षाची खंत- आ. डॉ. नीलम गो-हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 18:17 IST

नागपूर : शिवसेनेमुळेच ज्यांना व त्यांच्या पिताश्रींनादेखील मंत्रिपदे मिळाली, त्यांनी शिवसेनेवर अशा पद्धतीने मते मांडणे म्हणजे खालच्या पातळीला जाऊन राजकारण करणे आहे.

नागपूर : शिवसेनेमुळेच ज्यांना व त्यांच्या पिताश्रींनादेखील मंत्रिपदे मिळाली, त्यांनी शिवसेनेवर अशा पद्धतीने मते मांडणे म्हणजे खालच्या पातळीला जाऊन राजकारण करणे आहे. शेतक-यांच्या संपाला मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करणारे विखे-पाटील यांना शेतक-यांबद्दल कितपत जाणीव आहे हे जनता जाणतेच. त्यांची आजची शिवसेना पक्षाबाबतची भूमिका म्हणजे विषारी कीटकनाशकाप्रमाणे आहेत.पुणतांब्यात झालेला शेतकरी संप फोडू पाहणा-या या संपफोड्य‍ा विखे-पाटलांना जनताच त्यांची जाणीव करून देईल. त्यामुळे त्यांना शेतक-यांबाबत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. ज्यांच्यामुळे विदर्भ व राज्यात शेतक-यांच्या जीवनाचा अंतही झाला आहे. यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे कुशल नेतृत्व व संवेदनशील विचारांमुळे राज्यात शेतक-यांसाठी होत असलेले यशदायी प्रयत्न, त्यामुळे त्यांच्या पक्षातील कमी झालेली आमदाराची संख्या यामुळे त्यांना आलेल्या वैफल्यातून ते असे बोलू लागले आहेत.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी सुयोग्यरीत्या झाली पाहिजे, याचा आग्रह शिवसेनेने पूर्वीपासूनच धरला आहे. त्यामुळे राज्यातील शेतक-यांचा शिवसेनेवरील विश्वास वाढला आहे. वेळोवेळी शिवसेनेने मांडलेली आश्वासक व मदतीची भूमिका ही जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ नये यामुळे केल्या जाणा-या सर्वसमावेशक प्रयत्नांतून एकंदर राज्यातच सेनेची परिणामकारकता वाढताना दिसत आहे. विरोधी पक्षातील काही जण मात्र विनाकारणच राज्य सरकारमधून कोण कधी बाहेर पडेल, यासाठी आशाळभूतप्रमाणे पाहात आहे.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे