शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शिवसेनेवर शेतक-यांचा वाढता विश्वास ही विरोधी पक्षाची खंत- आ. डॉ. नीलम गो-हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 18:17 IST

नागपूर : शिवसेनेमुळेच ज्यांना व त्यांच्या पिताश्रींनादेखील मंत्रिपदे मिळाली, त्यांनी शिवसेनेवर अशा पद्धतीने मते मांडणे म्हणजे खालच्या पातळीला जाऊन राजकारण करणे आहे.

नागपूर : शिवसेनेमुळेच ज्यांना व त्यांच्या पिताश्रींनादेखील मंत्रिपदे मिळाली, त्यांनी शिवसेनेवर अशा पद्धतीने मते मांडणे म्हणजे खालच्या पातळीला जाऊन राजकारण करणे आहे. शेतक-यांच्या संपाला मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करणारे विखे-पाटील यांना शेतक-यांबद्दल कितपत जाणीव आहे हे जनता जाणतेच. त्यांची आजची शिवसेना पक्षाबाबतची भूमिका म्हणजे विषारी कीटकनाशकाप्रमाणे आहेत.पुणतांब्यात झालेला शेतकरी संप फोडू पाहणा-या या संपफोड्य‍ा विखे-पाटलांना जनताच त्यांची जाणीव करून देईल. त्यामुळे त्यांना शेतक-यांबाबत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. ज्यांच्यामुळे विदर्भ व राज्यात शेतक-यांच्या जीवनाचा अंतही झाला आहे. यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे कुशल नेतृत्व व संवेदनशील विचारांमुळे राज्यात शेतक-यांसाठी होत असलेले यशदायी प्रयत्न, त्यामुळे त्यांच्या पक्षातील कमी झालेली आमदाराची संख्या यामुळे त्यांना आलेल्या वैफल्यातून ते असे बोलू लागले आहेत.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी सुयोग्यरीत्या झाली पाहिजे, याचा आग्रह शिवसेनेने पूर्वीपासूनच धरला आहे. त्यामुळे राज्यातील शेतक-यांचा शिवसेनेवरील विश्वास वाढला आहे. वेळोवेळी शिवसेनेने मांडलेली आश्वासक व मदतीची भूमिका ही जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ नये यामुळे केल्या जाणा-या सर्वसमावेशक प्रयत्नांतून एकंदर राज्यातच सेनेची परिणामकारकता वाढताना दिसत आहे. विरोधी पक्षातील काही जण मात्र विनाकारणच राज्य सरकारमधून कोण कधी बाहेर पडेल, यासाठी आशाळभूतप्रमाणे पाहात आहे.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे