शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

ग्रीन गणेशा

By admin | Updated: September 18, 2016 02:51 IST

लोकमान्य टिळकांनी घरगुती गणेशोत्सव सार्वजनिक केला, त्याचीही शताब्दी झाली.

लोकमान्य टिळकांनी घरगुती गणेशोत्सव सार्वजनिक केला, त्याचीही शताब्दी झाली. त्या काळात उत्सवाचे स्वरूप बदलत गेले. पण, गेल्या दोन दशकांत त्यात अनेक बदल झाले. वाढत्या नागरीकरणामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले. मनोरंजनाच्या वाढत्या प्रभावाच्या रेट्यात उत्सवातील रंजन-प्रबोधनाला नवा पर्याय मिळाला, आयाम मिळाला. त्यातच, माहिती-तंत्रज्ञानातील क्रांतीच्या देखाव्यांतील तंत्रसज्जतेवर परिणाम झाला. देखावे तयार करण्यातील मेहनत तशीच राहिली, पण त्यातील सुबकतेला तंत्राची जोड मिळाली. त्याच वेळी त्यातील चळवळीच्या प्रभावापेक्षा आश्रयदात्या राजकीय नेत्यांचा प्रभाव वाढत गेला. त्यातील अनेक गोष्टींवर दरवर्षी चर्चा होत गेली, पण सर्वाधिक चर्चा झडली ती पर्यावरणपूरकतेवर, त्यासाठीच्या प्रयोगांवर. नवनव्या कल्पना राबवण्यावर.कागदाच्या लगद्यापासून मूर्ती, शाडूची मूर्ती, दरवर्षी नवी पार्थिव मूर्ती न आणता पंचधातूच्या मूर्तीचा वापर, असे अनेकानेक ट्रेण्ड गेल्या दीड दशकात भक्तांमध्ये रुजत गेले. म्हणजे, घरगुती-सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रमाण वाढले, पण त्याच वेळी मूर्तींतील पर्यावरणपूरकताही वाढत गेली. प्लास्टिकचा कमी झालेला वापर, थर्माकोलवर आलेली बंधने, रंगांच्या वापरातील जागरूकता, आवाजाबद्दल वाढलेल्या जाणिवा यातून ग्रीन गणेशा असा नवा शब्द रूढ झाला. उत्सवाच्या कॉर्पोरेटीकरणात तो फिट्ट बसला. उत्तरपूजा केल्यानंतर मूर्तीचे विसर्जन न करता मूर्तिदान करणे, धातूच्या त्याच मूर्तीचा फेरवापर, फायबरच्या मूर्तीची उचलून धरलेली संकल्पना, विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा किंवा घरातील पिंपांचा वापर करणे... अशा अनेक संकल्पना सुरुवातीला जेव्हा मांडल्या गेल्या, तेव्हा त्या सहज स्वीकारल्या गेल्या नाहीत. उलट, श्रद्धेचा विचार करता त्यांना प्रारंभी विरोध झाला. मात्र, कालांतराने एकेका टप्प्यावर जागृती वाढताच त्यांचा सहज स्वीकार झाला. त्या कल्पना रुजल्या. अगदी ‘एक गाव-एक गणपती’प्रमाणेच ‘एक सोसायटी-एक गणपती’ची संकल्पनाही स्वीकारली गेली. वेगवेगळ्या महापालिका, नगरपालिका, स्वयंसेवी संस्थांनी उत्सवाच्या पर्यावरणपूरकतेला हातभार लागावा म्हणून अनेक उपक्रम राबवले. एनजीओंनी जरी त्यांच्या योजनांचे मार्के र्टिंग केले असले, तरी पर्यावरणाचा मुद्दा अर्धवट स्वीकारल्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. त्यामुळे पर्यावरण जपण्याचा उद्देश खरेच सफल होतो आहे का, याबाबत शंका निर्माण होण्याजोगी स्थिती आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या परिसरांत फेरफटका मारल्यावर तेच दिसून येते. पालिकांतील पर्यावरणाचा विचार, कृती अर्धवट असल्याचे दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. निर्माल्य गोळा केले जाते, पण त्याचे खत करण्याची प्रक्रियाच पुरेशी नसल्याने त्यातील बहुतांश कचऱ्यात जाते. मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात झाले, तरी नंतर त्या तलावातील मूर्तींचे पुढे काय करावे, याबाबत जागृती नसल्याने तलावातील ते पाणी तसेच पुन्हा नदी, खाडी किंवा समुद्रात टाकले जाते किंवा मूर्तींचे फेरविसर्जन केले जाते. आवाजाचे प्रदूषण मोजण्याची यंत्रणाही प्रभावी नाही. त्यामुळे पर्यावरणाचा जप करत हवी ती व्यवस्था करून देणे, पर्यावरणाच्या नावाने तेवढ्यापुरते गळे काढणे एवढेच कार्य केले जाते. नंतर, धरसोड वृत्तीमुळे पर्यावरणाचा शिमगा कसा केला जातो, त्याचे प्रत्यंतर येते आहे. जागृती झाली आहे, पण गरज आहे अखेरपर्यंत विषय मार्गी लावण्याची. त्याचीच कमतरता सध्या जाणवते आहे. त्यावर नीट भर दिला, तर पर्यावरणाभिमुख उत्सवाचे स्वरूप अधिक नेमके, नेटके, देखणे होईल. त्यासाठीच्याच जागृतीची सध्या गरज आहे. >थर्माकोलचा वापर कमीगणेशोत्सवाच्या मखरातील थर्माकोलचा वाढता वापर कमी व्हावा, यासाठी सुरुवातीला प्रयत्न झाले. त्यातूनच पुढे पुठ्ठा, कागदांचा वापर वाढला. फुलांनी सुशोभित केलेली मखरे आली. काही ठिकाणी त्याचा विपरीत परिणाम झाला आणि प्लास्टिकचा वापर वाढला. प्लास्टिकची फुले, पाने, रेडिमेड मखरे, फायबरचे देव्हारे यांचा वापर वाढत गेला. रोषणाईचे साहित्यही सर्वाधिक प्लास्टिकचेच असते. >रंगांचा वापर : मूर्तींच्या रंगकामासाठी वापरले जाणारे रासायनिक रंग टाळण्याची अणखी एक मोहीम राबवली गेली. मात्र, पेण-हमरापूरहून कच्ची मूर्ती आणून त्यावर रंगकाम करताना मूर्तीचे शरीर, मुकुट, दागिने, वस्त्रे यांना स्प्रे पेंटिंग पद्धतीने रंग दिला जातो. त्यात नैसर्गिक रंगांपेक्षा रासायनिक रंगांचा वापर अधिक होतो. अशा रंगांच्या वापरामुळे आणि स्प्रे पद्धतीने दिलेल्या रंगांतून येणाऱ्या शेडमुळे मूर्ती अधिक उठावदार होते, तिच्यात जिवंतपणा येतो. भाव अधिक गहिरे होतात. त्यामुळे त्यांचा वापर कमी झालेला नाही.