शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
2
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
3
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; महिलांनी केला छांगुर गँगचा पर्दाफाश
4
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
5
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
6
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
7
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
8
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर १५० देश..; इतके टक्के शुल्क लादण्याची तयारी, भारतावर किती?
10
लव्ह मॅरेज केलं अन् कंगाल झाला; पैसा मिळवण्यासाठी तरुणाने 'असा' मार्ग निवडला, जो थेट तुरुंगात घेऊन गेला!
11
'मुंबईत मराठीतून नमाज पठण करा'; नितेश राणेंवर असदुद्दीन ओवेसींचा पलटवार; म्हणाले...
12
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
13
मार्क झुकरबर्गविरोधात खटला सुरू; ८ अब्ज डॉलर्सचं आहे प्रकरण, काय आहे कारण?
14
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
15
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
16
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
17
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
18
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
19
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
20
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'

यश-अपयशाचा आलेख

By admin | Updated: September 29, 2014 06:52 IST

१९६२ साली विधानसभेची निवडणूक झाली. यात काँग्रेसने ५१.२२ टक्क्यांसह २१५ जागा जिंकत राज्यावरील आपली पकड मजबूत असल्याचे दर्शविले

१९६२ साली विधानसभेची निवडणूक झाली. यात काँग्रेसने ५१.२२ टक्क्यांसह २१५ जागा जिंकत राज्यावरील आपली पकड मजबूत असल्याचे दर्शविले. यशवंतराव चव्हाण यांच्या जागी मारुतराव कन्नमवार यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. १९६७दुसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक झाली. एकूण २७० जागांपैकी २०३ जागा जिंकत पुन्हा काँग्रेस सत्तेवर आली. काँग्रेसला यावेळी वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्रीपदी फेरनिवड करण्यात आली.१९७२ ला झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने २२२ जागा जिंकत आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले. वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्रीपदी पुन्हा निवड करण्यात आली.१९७८ प्रथमच महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही एका पक्षाला संपूर्ण बहुमत मिळाले नाही. आणिबाणीमुळे इंदिरा गांधी यांची लोकप्रियता कमी झाल्याने याच काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (अर्स) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) अशी दोन शकले झाली. शरद पवार हे मुख्यमंत्री झाले आणि नासिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री झाले. १९८०पुन्हा निवडणुका झाल्या. केंद्रात इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर ४४.५० टक्के मते मिळविताना २८८ जागांपैकी काँग्रेसने १८६ जागा मिळविल्या. अब्दुल रहिमान अंतुले हे १९८२ पर्यंत मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील आणि शिवाजीराव निलंगेकर हे या काळात मुख्यमंत्री राहिले. १९८५ काँग्रेसने ४३.४१ टक्के मते मिळविताना २८८ पैकी १६१ जागा मिळविल्या. शिवाजीराव निलंगेकर हे पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यांना दूर करत शंकरराव चव्हाण दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. शरद पवार यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर १९८८ साली चव्हाण यांच्या जागी शरद पवार यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. १९९० काँग्रेसने १४१ जागा मिळविल्या. ३८.१७ टक्के मते मिळाली तरी काँग्रेसच्या २० जागा कमी झाल्या. १९९५ साली युतीने पहिल्यांदा राज्यात सत्ता खेचून आणण्यात यश मिळविले. ३१ टक्के मते मिळवित काँग्रेसने ८० जागा मिळविल्या. १९९९काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. यावेळी काँग्रेसने २७.२ टक्के मत मिळविताना ७५ जागा मिळविल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापना केली. २००४ २१.०६ टक्के मतांसह काँग्रेसने ६९ जागा मिळविल्या. २००९ काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली. काँग्रेसने ८२ तर राष्ट्रवादीने ६२ जागा मिळवित पुन्हा सत्ता खेचून आणली. यावेळी काँग्रेसला ३६.५१ टक्के मते मिळाली.