शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

यश-अपयशाचा आलेख

By admin | Updated: September 29, 2014 06:52 IST

१९६२ साली विधानसभेची निवडणूक झाली. यात काँग्रेसने ५१.२२ टक्क्यांसह २१५ जागा जिंकत राज्यावरील आपली पकड मजबूत असल्याचे दर्शविले

१९६२ साली विधानसभेची निवडणूक झाली. यात काँग्रेसने ५१.२२ टक्क्यांसह २१५ जागा जिंकत राज्यावरील आपली पकड मजबूत असल्याचे दर्शविले. यशवंतराव चव्हाण यांच्या जागी मारुतराव कन्नमवार यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. १९६७दुसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक झाली. एकूण २७० जागांपैकी २०३ जागा जिंकत पुन्हा काँग्रेस सत्तेवर आली. काँग्रेसला यावेळी वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्रीपदी फेरनिवड करण्यात आली.१९७२ ला झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने २२२ जागा जिंकत आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले. वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्रीपदी पुन्हा निवड करण्यात आली.१९७८ प्रथमच महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही एका पक्षाला संपूर्ण बहुमत मिळाले नाही. आणिबाणीमुळे इंदिरा गांधी यांची लोकप्रियता कमी झाल्याने याच काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (अर्स) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) अशी दोन शकले झाली. शरद पवार हे मुख्यमंत्री झाले आणि नासिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री झाले. १९८०पुन्हा निवडणुका झाल्या. केंद्रात इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर ४४.५० टक्के मते मिळविताना २८८ जागांपैकी काँग्रेसने १८६ जागा मिळविल्या. अब्दुल रहिमान अंतुले हे १९८२ पर्यंत मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील आणि शिवाजीराव निलंगेकर हे या काळात मुख्यमंत्री राहिले. १९८५ काँग्रेसने ४३.४१ टक्के मते मिळविताना २८८ पैकी १६१ जागा मिळविल्या. शिवाजीराव निलंगेकर हे पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यांना दूर करत शंकरराव चव्हाण दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. शरद पवार यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर १९८८ साली चव्हाण यांच्या जागी शरद पवार यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. १९९० काँग्रेसने १४१ जागा मिळविल्या. ३८.१७ टक्के मते मिळाली तरी काँग्रेसच्या २० जागा कमी झाल्या. १९९५ साली युतीने पहिल्यांदा राज्यात सत्ता खेचून आणण्यात यश मिळविले. ३१ टक्के मते मिळवित काँग्रेसने ८० जागा मिळविल्या. १९९९काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. यावेळी काँग्रेसने २७.२ टक्के मत मिळविताना ७५ जागा मिळविल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापना केली. २००४ २१.०६ टक्के मतांसह काँग्रेसने ६९ जागा मिळविल्या. २००९ काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली. काँग्रेसने ८२ तर राष्ट्रवादीने ६२ जागा मिळवित पुन्हा सत्ता खेचून आणली. यावेळी काँग्रेसला ३६.५१ टक्के मते मिळाली.