शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

यश-अपयशाचा आलेख

By admin | Updated: September 29, 2014 06:52 IST

१९६२ साली विधानसभेची निवडणूक झाली. यात काँग्रेसने ५१.२२ टक्क्यांसह २१५ जागा जिंकत राज्यावरील आपली पकड मजबूत असल्याचे दर्शविले

१९६२ साली विधानसभेची निवडणूक झाली. यात काँग्रेसने ५१.२२ टक्क्यांसह २१५ जागा जिंकत राज्यावरील आपली पकड मजबूत असल्याचे दर्शविले. यशवंतराव चव्हाण यांच्या जागी मारुतराव कन्नमवार यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. १९६७दुसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक झाली. एकूण २७० जागांपैकी २०३ जागा जिंकत पुन्हा काँग्रेस सत्तेवर आली. काँग्रेसला यावेळी वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्रीपदी फेरनिवड करण्यात आली.१९७२ ला झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने २२२ जागा जिंकत आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले. वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्रीपदी पुन्हा निवड करण्यात आली.१९७८ प्रथमच महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही एका पक्षाला संपूर्ण बहुमत मिळाले नाही. आणिबाणीमुळे इंदिरा गांधी यांची लोकप्रियता कमी झाल्याने याच काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (अर्स) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) अशी दोन शकले झाली. शरद पवार हे मुख्यमंत्री झाले आणि नासिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री झाले. १९८०पुन्हा निवडणुका झाल्या. केंद्रात इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर ४४.५० टक्के मते मिळविताना २८८ जागांपैकी काँग्रेसने १८६ जागा मिळविल्या. अब्दुल रहिमान अंतुले हे १९८२ पर्यंत मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील आणि शिवाजीराव निलंगेकर हे या काळात मुख्यमंत्री राहिले. १९८५ काँग्रेसने ४३.४१ टक्के मते मिळविताना २८८ पैकी १६१ जागा मिळविल्या. शिवाजीराव निलंगेकर हे पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यांना दूर करत शंकरराव चव्हाण दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. शरद पवार यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर १९८८ साली चव्हाण यांच्या जागी शरद पवार यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. १९९० काँग्रेसने १४१ जागा मिळविल्या. ३८.१७ टक्के मते मिळाली तरी काँग्रेसच्या २० जागा कमी झाल्या. १९९५ साली युतीने पहिल्यांदा राज्यात सत्ता खेचून आणण्यात यश मिळविले. ३१ टक्के मते मिळवित काँग्रेसने ८० जागा मिळविल्या. १९९९काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. यावेळी काँग्रेसने २७.२ टक्के मत मिळविताना ७५ जागा मिळविल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापना केली. २००४ २१.०६ टक्के मतांसह काँग्रेसने ६९ जागा मिळविल्या. २००९ काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली. काँग्रेसने ८२ तर राष्ट्रवादीने ६२ जागा मिळवित पुन्हा सत्ता खेचून आणली. यावेळी काँग्रेसला ३६.५१ टक्के मते मिळाली.