शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

निवडणूक कर्तव्यावरील जखमी, मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 06:23 IST

राज्य शासनाचा निर्णय : मृतासाठी १५ लाख तर जखमीसाठी साडेसात लाख

पुसद (यवतमाळ) : निवडणूक कर्तव्य ही शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण कर्तव्यापेक्षा वेगळ्या प्र्रकारची असतात. ही कर्तव्ये पार पाडताना निवडणूक कर्मचाºयांना जोखीम अथवा धोका यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे निवडणूक कर्तव्य बजावताना जखमी अथवा मृत झालेल्या अधिकारी, कर्मचाºयांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

निवडणूक कामासाठी दिल्या जाणाºया प्रशिक्षणासह कर्मचारी आपल्या घरातून बाहेर पडल्यापासून ते निवडणुकीशी संबंधित कर्तव्य पार पाडून आपल्या कार्यालयात किंवा घरी परत येईपर्यंतचा कालावधी या अनुदानासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या किंवा राज्याच्या बाबतीत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या एक किंवा अनेक जागा भरण्यासाठी घेण्यात येणाºया निवडणुका म्हणजेच राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद, विधानसभेच्या सार्वजनिक व पोटनिवडणुकांसाठी हा नियम लागू होणार आहे.

निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना मृत पावलेल्या अधिकारी व कर्मचाºयांच्या वारसांना आता १५ लाख रुपये, अतिरेकी अथवा नक्षलवाद्यांच्या कारवाईत बॉम्बस्फोट, सुरुंग अथवा शस्त्रांचा हल्ला होऊन मृत पावलेल्या अधिकारी व कर्मचाºयांच्या वारसांना ३० लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व (हात, पाय, डोळे, गमावणे) आदींसाठी सात लाख ५० हजार रुपये, तर अतिरेकी कारवायांमध्ये कर्मचाºयांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनाचे उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी अ.ना. वळवी यांच्या स्वाक्षरीने पारित करण्यात आलेल्या आदेशात ११ एप्रिल २०१९ रोजी घेण्यात आला. निवडणूक घोषित झाल्याच्या तारखेपासून हा निर्णय लागू होणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक