शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

अल्पावधीतच ग्रामगीता पोहोचली देश-विदेशात

By admin | Updated: December 14, 2015 02:19 IST

विचार साहित्य संमेलनाचा समारोपीय कार्यक्रमात वेरूळकर गुरुजींचे प्रतिपादन.

अकोला : जगातील सर्वच धर्मग्रंथांच्या तुलनेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता काही वर्षांतच देश-विदेशात पोहोचली असून, विविध भाषांमध्ये भाषांतरही झाल्याचे प्रतिपादन आचार्य वेरूळकर गुरुजी यांनी केले. तिसर्‍या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज केवळ एक व्यक्ती नसून, ते सर्व धर्मातील संतांचे एकरूपी मिश्रण आहेत आणि त्याचेच नाव त्यांनी ह्यग्रामगीताह्ण असे दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ज्याप्रमाणे म्हातार्‍या व्यक्तीच्या खांद्यावर बसलेलं लहान मूल त्याला मार्गदर्शक ठरते, त्याचप्रमाणे ह्यग्रामगीताह्ण हे ह्यज्ञानेश्‍वरीह्णच्या खांद्यावर बसलेले मार्गदर्शक वाड्मय आहे. जगाच्या इतिहासात ग्रामगीता ही एकमेव आहे, जी अत्यल्प वेळेत देश-विदेशात पोहोचली आहे. येशू ख्रिस्त यांच्या मृत्यूनंतर काही दिवसातच त्यांची समाधी उघडल्यावर ते कोणालाच दिसले नाही. अवघ्या २0 वर्षांनी भक्तांना त्यांचा प्रत्यय आला. दरम्यानच्या काळात ते कुठे होते याबाबत कोणालाच सांगता आले नाही, ते स्वामी विवेकानंदांनी सांगितले. मोहम्मद पैगंबर यांच्या कार्यकाळानंतर कित्येक वर्षांनी त्यांचे विचार जगासमोर आले. ज्ञानेश्‍वरांची समाधी झाल्यावर २00 वर्षांनी एकनाथ महाराजांनी त्यांच्या समाधीचे संशोधन केले आणि ज्ञानेश्‍वरी सर्वांसमोर आली. त्या तुलनेत ग्रामगीता ही अल्पकाळातच जगासमोर आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तुकडोजी महाराजांना जाऊन आज ४७ वर्ष झालीत, या कालावधीत त्यांचे वाड्मय देश-विदेशात गेले असून, त्याचे विविध भाषेत भाषांतर झाले. एवढय़ा अल्प कालावधीत सर्वदूर गेलेल्या राष्ट्रसंतांच्या वाङ्याला तोड नसल्याचे वेरूळकर गुरुजींनी विचार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात सांगितले.