शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अल्पावधीतच ग्रामगीता पोहोचली देश-विदेशात

By admin | Updated: December 14, 2015 02:19 IST

विचार साहित्य संमेलनाचा समारोपीय कार्यक्रमात वेरूळकर गुरुजींचे प्रतिपादन.

अकोला : जगातील सर्वच धर्मग्रंथांच्या तुलनेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता काही वर्षांतच देश-विदेशात पोहोचली असून, विविध भाषांमध्ये भाषांतरही झाल्याचे प्रतिपादन आचार्य वेरूळकर गुरुजी यांनी केले. तिसर्‍या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज केवळ एक व्यक्ती नसून, ते सर्व धर्मातील संतांचे एकरूपी मिश्रण आहेत आणि त्याचेच नाव त्यांनी ह्यग्रामगीताह्ण असे दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ज्याप्रमाणे म्हातार्‍या व्यक्तीच्या खांद्यावर बसलेलं लहान मूल त्याला मार्गदर्शक ठरते, त्याचप्रमाणे ह्यग्रामगीताह्ण हे ह्यज्ञानेश्‍वरीह्णच्या खांद्यावर बसलेले मार्गदर्शक वाड्मय आहे. जगाच्या इतिहासात ग्रामगीता ही एकमेव आहे, जी अत्यल्प वेळेत देश-विदेशात पोहोचली आहे. येशू ख्रिस्त यांच्या मृत्यूनंतर काही दिवसातच त्यांची समाधी उघडल्यावर ते कोणालाच दिसले नाही. अवघ्या २0 वर्षांनी भक्तांना त्यांचा प्रत्यय आला. दरम्यानच्या काळात ते कुठे होते याबाबत कोणालाच सांगता आले नाही, ते स्वामी विवेकानंदांनी सांगितले. मोहम्मद पैगंबर यांच्या कार्यकाळानंतर कित्येक वर्षांनी त्यांचे विचार जगासमोर आले. ज्ञानेश्‍वरांची समाधी झाल्यावर २00 वर्षांनी एकनाथ महाराजांनी त्यांच्या समाधीचे संशोधन केले आणि ज्ञानेश्‍वरी सर्वांसमोर आली. त्या तुलनेत ग्रामगीता ही अल्पकाळातच जगासमोर आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तुकडोजी महाराजांना जाऊन आज ४७ वर्ष झालीत, या कालावधीत त्यांचे वाड्मय देश-विदेशात गेले असून, त्याचे विविध भाषेत भाषांतर झाले. एवढय़ा अल्प कालावधीत सर्वदूर गेलेल्या राष्ट्रसंतांच्या वाङ्याला तोड नसल्याचे वेरूळकर गुरुजींनी विचार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात सांगितले.