शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

कॉर्पोरेट्सच्या साथीने होणार ग्राम - सामाजिक परिवर्तन! रामनाथ सुब्रमण्यम यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 05:41 IST

महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांचा चेहरामोहरा पालटावा, तेथे आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि सामाजिक समस्यांचाही निपटारा व्हावा, यासाठी राज्य शासनाने आॅगस्ट २०१६मध्ये ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाला सुरुवात केली.

मुंबई: महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांचा चेहरामोहरा पालटावा, तेथे आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि सामाजिक समस्यांचाही निपटारा व्हावा, यासाठी राज्य शासनाने आॅगस्ट २०१६मध्ये ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाला सुरुवात केली. या अभियानात अनेक बड्या उद्योग समूहांनी सहभाग नोंदविला असून हिंदुस्थान युनिलिव्हरनेही (एचयुएल) त्यात आघाडी घेतली आहे. अभियानासाठी एचयुएलने तब्बल दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रमण्यम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.राज्य शासनाच्या या अभियानात तब्बल १७ प्रमुख उद्योगांना सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यापैकी टाटा समूह कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधीबाबत काम करीत आहे. तसेच ओला या अ‍ॅपआधिरत टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीशी यासंदर्भात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार, ही कंपनी गावातील सुशिक्षित बेरोजगारांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणार असून इच्छुकांना त्यांचा कंपनीत वाहन चालक म्हणून नोकरीही मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचेही सुब्रमण्यम यांनी सांगितले.गावागावांमधील विविध समस्या जाणून घेण्यासाठी, तसेच शासनाच्या योजना संभाव्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या अभियानाअंतर्गत २४० कंत्राटी ग्राम परिवर्तक सुमारे ६०० गावांमध्ये नेमण्यात आले आहेत.हे परिवर्तक गावातच राहून, तसेच घरोघरीफिरून, स्थानिकांशी संवाद साधून गावातील समस्या आणि गरजा जाणून घेतात. त्यानंतर या समस्या सोडविण्यासाठीचा कृती आराखडा तयार करून तो संबंधित जिल्हाधिकाºयाला सादर करतात.या आराखड्याच्या आधारे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे प्रशासनाला सोपे होते. शासनाच्यावतीने प्रधानमंत्री आवास, जलयुक्त शिवार आदी योजना राबविल्या जातात, मात्र त्याचा लाभ कसा घ्यायचा याची माहिती नसल्यामुळे अनेक पात्र लाभार्थी त्यापासून वंचित राहतात. आता अभियानाअंतर्गत करण्यात येत असलेल्या विशेष प्रयत्नांमुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तब्बल सहा हजार नवीन घरांचे बांधकाम सुरू झाले आहे,अशीही माहिती सुब्रमण्यम यांनी दिली.या अभियानात सहभागी असलेले विविध उद्योग समूह त्यांच्या धोरणानुसार, ग्रामविकासासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यापैकी एचयुएलच्यावतीने ‘वॉश’ नावाचा स्वच्छता आणि आरोग्यसंबंधीचा उपक्रम राबविण्यात येत आहे.त्याअंतर्गत एचयुएलने विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘स्वच्छ आदत’ हा विशेष अभ्यासक्रम तयार केला असून तो संबंधित गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकविण्यात येत आहे. तसेच यासंदर्भात पुस्तिकाही छापण्यात आल्या असून त्या गावात, शाळांत वितरित करण्यात येत आहेत. तोंड-हात धुण्याचे महत्त्व, पाणंदमुक्ती, शौचालयाची स्वच्छता, सांडपाण्याची आणि कचºयाची योग्य विल्हेवाट आदी गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून एचयुएल ग्राम परिवर्तनात वाटा उचलत आहे.- वेळोवेळी हात न धुतल्याने किंवा साबणाचा वापर न केल्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढून आरोग्यासाठी किती मोठा धोका उद्भवतो, याबाबतची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात येते. तसेच याबाबत त्यांच्यात किती जागरूकता निर्माण झाली, हे जाणून घेण्यासाठी विविध प्रश्न संचांद्वारे त्यांची नियमित चाचणी घेण्यात येते. चुकीच्या सवयी जाऊन आरोग्य आणि स्वच्छतेच्या चांगल्या सवयी विद्यार्थ्यांना लागाव्यात. तसेच त्यांच्या माध्यमातून या गोष्टी त्यांच्या कुटुंबापर्यंत आणि पर्यायाने समाजापर्यंत पोहोचाव्यात, हा या अभ्यासक्रमामागील मूळ उद्देश आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र