शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

कॉर्पोरेट्सच्या साथीने होणार ग्राम - सामाजिक परिवर्तन! रामनाथ सुब्रमण्यम यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 05:41 IST

महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांचा चेहरामोहरा पालटावा, तेथे आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि सामाजिक समस्यांचाही निपटारा व्हावा, यासाठी राज्य शासनाने आॅगस्ट २०१६मध्ये ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाला सुरुवात केली.

मुंबई: महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांचा चेहरामोहरा पालटावा, तेथे आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि सामाजिक समस्यांचाही निपटारा व्हावा, यासाठी राज्य शासनाने आॅगस्ट २०१६मध्ये ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाला सुरुवात केली. या अभियानात अनेक बड्या उद्योग समूहांनी सहभाग नोंदविला असून हिंदुस्थान युनिलिव्हरनेही (एचयुएल) त्यात आघाडी घेतली आहे. अभियानासाठी एचयुएलने तब्बल दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रमण्यम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.राज्य शासनाच्या या अभियानात तब्बल १७ प्रमुख उद्योगांना सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यापैकी टाटा समूह कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधीबाबत काम करीत आहे. तसेच ओला या अ‍ॅपआधिरत टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीशी यासंदर्भात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार, ही कंपनी गावातील सुशिक्षित बेरोजगारांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणार असून इच्छुकांना त्यांचा कंपनीत वाहन चालक म्हणून नोकरीही मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचेही सुब्रमण्यम यांनी सांगितले.गावागावांमधील विविध समस्या जाणून घेण्यासाठी, तसेच शासनाच्या योजना संभाव्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या अभियानाअंतर्गत २४० कंत्राटी ग्राम परिवर्तक सुमारे ६०० गावांमध्ये नेमण्यात आले आहेत.हे परिवर्तक गावातच राहून, तसेच घरोघरीफिरून, स्थानिकांशी संवाद साधून गावातील समस्या आणि गरजा जाणून घेतात. त्यानंतर या समस्या सोडविण्यासाठीचा कृती आराखडा तयार करून तो संबंधित जिल्हाधिकाºयाला सादर करतात.या आराखड्याच्या आधारे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे प्रशासनाला सोपे होते. शासनाच्यावतीने प्रधानमंत्री आवास, जलयुक्त शिवार आदी योजना राबविल्या जातात, मात्र त्याचा लाभ कसा घ्यायचा याची माहिती नसल्यामुळे अनेक पात्र लाभार्थी त्यापासून वंचित राहतात. आता अभियानाअंतर्गत करण्यात येत असलेल्या विशेष प्रयत्नांमुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तब्बल सहा हजार नवीन घरांचे बांधकाम सुरू झाले आहे,अशीही माहिती सुब्रमण्यम यांनी दिली.या अभियानात सहभागी असलेले विविध उद्योग समूह त्यांच्या धोरणानुसार, ग्रामविकासासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यापैकी एचयुएलच्यावतीने ‘वॉश’ नावाचा स्वच्छता आणि आरोग्यसंबंधीचा उपक्रम राबविण्यात येत आहे.त्याअंतर्गत एचयुएलने विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘स्वच्छ आदत’ हा विशेष अभ्यासक्रम तयार केला असून तो संबंधित गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकविण्यात येत आहे. तसेच यासंदर्भात पुस्तिकाही छापण्यात आल्या असून त्या गावात, शाळांत वितरित करण्यात येत आहेत. तोंड-हात धुण्याचे महत्त्व, पाणंदमुक्ती, शौचालयाची स्वच्छता, सांडपाण्याची आणि कचºयाची योग्य विल्हेवाट आदी गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून एचयुएल ग्राम परिवर्तनात वाटा उचलत आहे.- वेळोवेळी हात न धुतल्याने किंवा साबणाचा वापर न केल्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढून आरोग्यासाठी किती मोठा धोका उद्भवतो, याबाबतची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात येते. तसेच याबाबत त्यांच्यात किती जागरूकता निर्माण झाली, हे जाणून घेण्यासाठी विविध प्रश्न संचांद्वारे त्यांची नियमित चाचणी घेण्यात येते. चुकीच्या सवयी जाऊन आरोग्य आणि स्वच्छतेच्या चांगल्या सवयी विद्यार्थ्यांना लागाव्यात. तसेच त्यांच्या माध्यमातून या गोष्टी त्यांच्या कुटुंबापर्यंत आणि पर्यायाने समाजापर्यंत पोहोचाव्यात, हा या अभ्यासक्रमामागील मूळ उद्देश आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र