शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याच्या डिस्पोजलसाठी जीपीएसचा वापर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2023 09:48 IST

हवा आणि पाणी प्रदूषित करणाऱ्या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणे हा मंडळाचा मुख्य उद्देश आहे.

- अविनाश ढाकणे, सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची १९७७ साली स्थापना झाली. पाणी व हवा प्रदूषण नियंत्रणासाठी सर्वसाधारणपणे जलप्रदूषण आणि हवा प्रदूषण असे दोन कायदे आहेत. त्यानंतर जैव वैद्यकीय कचरा, घनकचरा व्यवस्थापन यावर कायदा आला. हवा आणि पाणी प्रदूषित करणाऱ्या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणे हा मंडळाचा मुख्य उद्देश आहे.  

प्रदूषण पातळी जास्त असणारे उद्योग समूह आहेत. त्यांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यांना वेळोवेळी नियमांचे मार्गदर्शन करणे आणि त्यांच्याकडून काम करून घेणे हा पहिला मार्ग आहे. जर त्यांनी नियमांचे पालन केले नाही तर कायद्याने दिलेल्या अधिकारांचा वापर केला जातो. नागरी वस्त्यांमध्ये बरेचशे सांडपाणी नद्यांमध्ये प्रक्रिया न करता जाते, त्यामुळे नद्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. ते कारखान्यांच्या तुलनेत जास्त आहे. कारण कारखान्यावर कारवाईचा धाक असल्याने ते पाण्यावर प्रक्रिया करतात. बहुतांश ठिकाणी आता नगरपालिका, महापालिकांनी मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पावर काम सुरू केले आहे. याबाबत त्यांच्यासोबत चर्चा सुरू असून ज्या नद्यांचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. त्यात प्रदूषण होऊ नये याबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याचे नियोजन सुरू आहे.

नद्यांच्या बाजूला असलेली मोठी लोकवस्ती आणि कारखाने यांना नदीत प्रदूषित पाणी सोडण्यासाठी प्रतिबंध होणे गरजेचे आहे. त्यावर काम करण्याची गरज मला वाटते. जैव वैद्यकीय कचऱ्यासाठी राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत ३० प्रकल्प तयार केले आहेत. 

दहा हजार बेडसाठी असे ७५ किमीच्या परिघात एक युनिट असावे. त्यांनी रुग्णालये, दवाखाने यांच्याकडून दर ४८ तासांच्या आत वेस्ट जमा करून कॉमन ट्रीटमेंट प्लांटवर नेऊन त्याचे डिस्पोजल करावे. हे वेळेत व्हावे यासाठी जीपीएसचा वापर करता येईल. त्यामुळे इतर ठिकाणी वैद्यकीय कचरा जाणार नाही. याबाबत आयआयटीसारख्या संस्थांच्या माध्यमातून काम सुरू आहे. 

जैव वैद्यकीय सुविधा आहेत, त्या ठिकाणी पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी आयआयटीला सांगितले आहे. प्लाटिक जमा कसे होईल आणि त्याचा पुनर्वापर कसा करता येईल, त्याचे उत्पादन होऊ नये किंवा ते येऊच नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्याचे प्रदूषण आपल्याला टाळता येईल.

दररोज मिळणार प्रदूषणाची माहिती

प्रदूषणाचे मॉनिटरिंग करतो, ते आम्ही संकेतस्थळावर प्रदर्शित करतो. परंतु मला असे वाटते की, वृत्तपत्रात ज्याप्रमाणे हवामानाची माहिती दिली जाते, त्याप्रमाणे जिल्ह्यानुसार प्रदूषण पातळीची माहिती माध्यमांना पाठविण्याचा विचार सुरू आहे. विशेषतः प्रदूषण पातळी ओलांडलेल्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना माहिती मिळायला हवी. त्यासोबत त्यांनी काय काळजी घ्यावी, याचीही माहिती दिली जाईल. याबाबत काम सुरू असून लवकरात लवकर ते लोकांपर्यंत पोहोचेल.

 

टॅग्स :pollutionप्रदूषण