शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

कचऱ्याच्या डिस्पोजलसाठी जीपीएसचा वापर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2023 09:48 IST

हवा आणि पाणी प्रदूषित करणाऱ्या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणे हा मंडळाचा मुख्य उद्देश आहे.

- अविनाश ढाकणे, सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची १९७७ साली स्थापना झाली. पाणी व हवा प्रदूषण नियंत्रणासाठी सर्वसाधारणपणे जलप्रदूषण आणि हवा प्रदूषण असे दोन कायदे आहेत. त्यानंतर जैव वैद्यकीय कचरा, घनकचरा व्यवस्थापन यावर कायदा आला. हवा आणि पाणी प्रदूषित करणाऱ्या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणे हा मंडळाचा मुख्य उद्देश आहे.  

प्रदूषण पातळी जास्त असणारे उद्योग समूह आहेत. त्यांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यांना वेळोवेळी नियमांचे मार्गदर्शन करणे आणि त्यांच्याकडून काम करून घेणे हा पहिला मार्ग आहे. जर त्यांनी नियमांचे पालन केले नाही तर कायद्याने दिलेल्या अधिकारांचा वापर केला जातो. नागरी वस्त्यांमध्ये बरेचशे सांडपाणी नद्यांमध्ये प्रक्रिया न करता जाते, त्यामुळे नद्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. ते कारखान्यांच्या तुलनेत जास्त आहे. कारण कारखान्यावर कारवाईचा धाक असल्याने ते पाण्यावर प्रक्रिया करतात. बहुतांश ठिकाणी आता नगरपालिका, महापालिकांनी मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पावर काम सुरू केले आहे. याबाबत त्यांच्यासोबत चर्चा सुरू असून ज्या नद्यांचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. त्यात प्रदूषण होऊ नये याबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याचे नियोजन सुरू आहे.

नद्यांच्या बाजूला असलेली मोठी लोकवस्ती आणि कारखाने यांना नदीत प्रदूषित पाणी सोडण्यासाठी प्रतिबंध होणे गरजेचे आहे. त्यावर काम करण्याची गरज मला वाटते. जैव वैद्यकीय कचऱ्यासाठी राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत ३० प्रकल्प तयार केले आहेत. 

दहा हजार बेडसाठी असे ७५ किमीच्या परिघात एक युनिट असावे. त्यांनी रुग्णालये, दवाखाने यांच्याकडून दर ४८ तासांच्या आत वेस्ट जमा करून कॉमन ट्रीटमेंट प्लांटवर नेऊन त्याचे डिस्पोजल करावे. हे वेळेत व्हावे यासाठी जीपीएसचा वापर करता येईल. त्यामुळे इतर ठिकाणी वैद्यकीय कचरा जाणार नाही. याबाबत आयआयटीसारख्या संस्थांच्या माध्यमातून काम सुरू आहे. 

जैव वैद्यकीय सुविधा आहेत, त्या ठिकाणी पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी आयआयटीला सांगितले आहे. प्लाटिक जमा कसे होईल आणि त्याचा पुनर्वापर कसा करता येईल, त्याचे उत्पादन होऊ नये किंवा ते येऊच नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्याचे प्रदूषण आपल्याला टाळता येईल.

दररोज मिळणार प्रदूषणाची माहिती

प्रदूषणाचे मॉनिटरिंग करतो, ते आम्ही संकेतस्थळावर प्रदर्शित करतो. परंतु मला असे वाटते की, वृत्तपत्रात ज्याप्रमाणे हवामानाची माहिती दिली जाते, त्याप्रमाणे जिल्ह्यानुसार प्रदूषण पातळीची माहिती माध्यमांना पाठविण्याचा विचार सुरू आहे. विशेषतः प्रदूषण पातळी ओलांडलेल्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना माहिती मिळायला हवी. त्यासोबत त्यांनी काय काळजी घ्यावी, याचीही माहिती दिली जाईल. याबाबत काम सुरू असून लवकरात लवकर ते लोकांपर्यंत पोहोचेल.

 

टॅग्स :pollutionप्रदूषण