शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

सत्ताधारी अन् विरोधकांनी समाजाच्या जिवाशी खेळू नये, पश्चात्ताप होईल; मनोज जरांगे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 05:26 IST

२९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुढील आंदोलनाचा प्लॅन आणि उमेदवार उभे करायचे अथवा पाडायचे याचा निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : सत्ताधारी आणि विरोधकांनी समाजाच्या जिवाशी खेळू नये, अन्यथा खूप नुकसान होईल आणि पश्चात्ताप करायलाही वेळ मिळणार नाही, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी सरकारला दिला. 

पाच दिवसांच्या उपोषणामुळे प्रकृती ढासळल्याने जरांगे हे शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. रविवारी सकाळी त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेत अंतरवाली सराटीला मुक्काम हलविला. 

ते म्हणाले की, मराठा आरक्षण हा मुद्दा सरकार आणि विरोधक हे एकमेकांकडे ढकलत आहेत. त्यांनी आता मराठा समाजाच्या जिवाशी खेळू नये, समाजाची ताकद मोठी असते. 

मुंबईत बसूनही मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करता येतो. येथे येता कशाला, तुम्हाला मराठा समाजाचा आक्रोश, संतापाची लाट दिसत नाही का, असा सवालही त्यांनी केला. परिस्थिती आटोक्यात ठेवायची असेल तर मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करणे हाच पर्याय असल्याचे ते म्हणाले.   

२९ ऑगस्ट रोजी बैठक

७ ते १४ ऑगस्टदरम्यान महासंवाद यात्रा, २० ते २७ ऑगस्टदरम्यान सकल मराठा समाजातील प्रमुख नेत्यांशी चर्चा आणि २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुढील आंदोलनाचा प्लॅन आणि उमेदवार उभे करायचे अथवा पाडायचे याचा निर्णय घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण