शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राज्यपालांकडून केंद्र सरकारचे गुणगान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 17:22 IST

७० वर्षात जी कामे झाली नाहीत ती कामे केल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणातून केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे गुणगाण केले. विकास करण्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते,केंद्र सरकारने हीच इच्छाशक्ती दाखवत ७० वर्षात जी कामे झाली नाहीत ती कामे केल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बुधवारी अकोला येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात केले.डॉ.पंदेकृविच्या दीक्षांत सभागृहात आयोजित समारंभाला कृषीमंत्री दादाजी भूसे यांची प्रमुख उपस्थिती होती. एखाद्या क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करण्यासाठी त्याग,साधना,तपस्या करावी लागते तसेच विकासासाठी इच्छाशक्ती असवी लागते.७० वर्षात लोकांना बँक माहिती नव्हती,त्याचे खातेदेखील उघडलेले नव्हते,पंतप्रधान नरेंद्र मोदी यां एकाच वर्षात देशातील ३३ टक्के लोकांची बँक खाते उघडून त्यांना मुख्यप्रवाहात आणले. लोक उघड्यावर शौचास जायचे,याच सरकारने देशात अल्पावधीतच १० कोटी शौचालये उभारून, खेड्यापाड्यातील विशेषत: महिलांना दिलासा दिला आहे. हे सर्व करण्यासाठी साधनेचीही गरज आहे. साधना,तपस्येच्या बळावरच हे सर्व शक्य असल्याचे त्यांनी अधोेरेखित केले. देशाच नाव जगात उज्वल करायचे असेल तर साधना, तपस्यशिवाय पर्याय नाही. ही क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्ये असल्याचे नावाचा उल्लेख न करता राज्यपाल यांनी अधोरेखित केले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ