शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शासनाचा नवा प्रस्ताव : प्रकल्प अधिकारीपदावर आता एमबीबीएस डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:39 IST

बालकांचे कुपोषण निर्मूलन करण्यात राज्य शासन कमी पडत असल्याने महिला बालकल्याण विभागात बालविकास प्रकल्प अधिकारी पदावर आता थेट एमबीबीएस व बीएएमएस डॉक्टरांचीच नियुक्ती करण्याचा विचार राज्य शासनाने सुरू केला आहे.

सुधीर लंके अहमदनगर : बालकांचे कुपोषण निर्मूलन करण्यात राज्य शासन कमी पडत असल्याने महिला बालकल्याण विभागात बालविकास प्रकल्प अधिकारी पदावर आता थेट एमबीबीएस व बीएएमएस डॉक्टरांचीच नियुक्ती करण्याचा विचार राज्य शासनाने सुरू केला आहे.सेवा नियमात सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात अंगणवाड्या चालविल्या जातात. अंगणवाडीत आहार व अनौपचारिक शिक्षण देणे, तसेच बालमृत्यू, मातामृत्यू नियंत्रित ठेवण्याचे काम हा विभाग करतो. सेविका व मदतनीस, त्यांच्यावर देखरेखीसाठी पर्यवेक्षकीय यंत्रणा, बालविकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा परिषद स्तरावर महिला व बालविकास अधिकारी अशी त्याची रचना आहे. बालविकास प्रकल्प अधिका-यांच्या अखत्यारित किमान १५० अंगणवाड्या असतात.पूर्वी प्रकल्प अधिकारी पद ग्रामविकास विभागाच्या अखत्यारित होते. आता ते महिला बालकल्याणकडे वर्ग झाले आहे. त्यामुळे सरळसेवेची ५० टक्के पदे राजपत्रित अधिकाºयांऐवजी थेट लोकसेवा आयोगाकडून भरण्यास सुरुवात झाली आहे.मात्र, बालकांचे आरोग्य व कुपोषण हाताळण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती हवी म्हणून या पदावर एमबीबीएस किंवा बीएएमएसधारकांना नियुक्ती देण्याचा विचार आहे. त्यासाठी सेवा नियमात सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव तीन महिन्यांत सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. महिला व बालविकास आयुक्त (पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती त्यासाठी गठीत करण्यात आली असून समितीची पहिली बैठक गुरुवारी होत आहे.