शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

‘शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष’

By admin | Updated: April 20, 2015 03:09 IST

केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार केवळ घोषणा करीत असून, अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे

मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार केवळ घोषणा करीत असून, अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी केला़ खासदार चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यात दुष्काळ आणि गारपिटीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना २ टक्क्यांपेक्षा जास्त मदत करता येणार नसल्याचे वक्तव्य केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपुरात केले होते़ त्यांची ही भाषा म्हणजे शेतकऱ्यांप्रती भाजपा सरकारच्या अनास्थेचा पुरावाच आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी त्यांनी पत्रकात केली आहे़ राज्यातील नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाल्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत. अशावेळी शेतकऱ्याला भरीव आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी देण्याऐवजी केवळ २ टक्के मदत दिली जाईल, असे सांगणे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच म्हणावी लागेल. केंद्र आणि राज्यात नवे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांना मदतीचा हात तर सोडाच पण नैसर्गिक आपत्तीतून बचावलेल्या शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळणेही कठीण झाल्याचा आरोप खासदार चव्हाण यांनी पत्रकात केला आहे़