शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

‘शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष’

By admin | Updated: April 20, 2015 03:09 IST

केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार केवळ घोषणा करीत असून, अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे

मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार केवळ घोषणा करीत असून, अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी केला़ खासदार चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यात दुष्काळ आणि गारपिटीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना २ टक्क्यांपेक्षा जास्त मदत करता येणार नसल्याचे वक्तव्य केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपुरात केले होते़ त्यांची ही भाषा म्हणजे शेतकऱ्यांप्रती भाजपा सरकारच्या अनास्थेचा पुरावाच आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी त्यांनी पत्रकात केली आहे़ राज्यातील नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाल्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत. अशावेळी शेतकऱ्याला भरीव आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी देण्याऐवजी केवळ २ टक्के मदत दिली जाईल, असे सांगणे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच म्हणावी लागेल. केंद्र आणि राज्यात नवे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांना मदतीचा हात तर सोडाच पण नैसर्गिक आपत्तीतून बचावलेल्या शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळणेही कठीण झाल्याचा आरोप खासदार चव्हाण यांनी पत्रकात केला आहे़