शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष’

By admin | Updated: April 20, 2015 03:09 IST

केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार केवळ घोषणा करीत असून, अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे

मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार केवळ घोषणा करीत असून, अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी केला़ खासदार चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यात दुष्काळ आणि गारपिटीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना २ टक्क्यांपेक्षा जास्त मदत करता येणार नसल्याचे वक्तव्य केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपुरात केले होते़ त्यांची ही भाषा म्हणजे शेतकऱ्यांप्रती भाजपा सरकारच्या अनास्थेचा पुरावाच आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी त्यांनी पत्रकात केली आहे़ राज्यातील नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाल्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत. अशावेळी शेतकऱ्याला भरीव आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी देण्याऐवजी केवळ २ टक्के मदत दिली जाईल, असे सांगणे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच म्हणावी लागेल. केंद्र आणि राज्यात नवे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांना मदतीचा हात तर सोडाच पण नैसर्गिक आपत्तीतून बचावलेल्या शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळणेही कठीण झाल्याचा आरोप खासदार चव्हाण यांनी पत्रकात केला आहे़