शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

टिवटिव करण्यातच सरकारची आघाडी

By admin | Updated: October 9, 2015 01:33 IST

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला येत्या ३१ आॅक्टोंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभराच्या काळातील सरकारचा कारभार दृष्टिहीन असल्याचेच दिसून आले. केवळ

मुंबई : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला येत्या ३१ आॅक्टोंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभराच्या काळातील सरकारचा कारभार दृष्टिहीन असल्याचेच दिसून आले. केवळ टिष्ट्वटरवर टिवटिव करण्यातच सरकारने पहिले वर्ष घालविल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. तटकरे म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा शब्द देऊनही मागच्या रब्बी व खरीप हंगामासाठी सरकारने नुकसानभरपाई दिली नाही. मुख्यमंत्र्यांकडे वारंवार विनंती करूनही मदत केली नाही. मागच्या वर्षभरात किमान आधारभूत किमतीवर सरकारने किती खरेदी केली, हे सरकारने सांगावे,’ असा सवाल करतानाच ‘दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना जुन्या रोजगार योजनेच्या अंतर्गत मागेल त्याला काम देण्यात यावे,’ असेही तटकरे म्हणाले. पेट्रोल, डिझेलपासून ते तुरडाळीपर्यंतच्या सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. तुरडाळीचा तुटवडा झाला असताना आम्ही १५० रूपयापर्यंत भाव रोखले होते. युती सरकारने मात्र भाव दोनशेपर्यंत नेऊन ठेवले. इतर राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरात कमालीची घट झाली असताना महाराष्ट्रात उलटे घडत आहे. सणासुदीच्या तोंडावर जनतेला महागाईला तोंड द्यावे लागणार आहे. जाहिरनाम्यात विकासाचे दृष्टिपत्र मांडणाऱ्या सरकारने दृष्टिहीन कारभार केल्याची टीका तटकरेंनी केली.राज्यभर करणार आंदोलने वर्षभरात युती सरकारचे अनेक घोटाळे, गैरव्यवहार चव्हाट्यावर आले. या सर्वांचा निषेध म्हणून राष्ट्रवादी २५ ते ३० आॅक्टोबर दरम्यान राज्याच्या सर्व जिल्हा, तालुका स्तरावर आंदोलने करणार आहे, तर ३१ आॅक्टोबर रोजी पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली वरळी येथील जांबोरी मैदानावर सरकारच्या गैरकारभाराचा पंचनामा करण्यात येणार आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली.