शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

टिवटिव करण्यातच सरकारची आघाडी

By admin | Updated: October 9, 2015 01:33 IST

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला येत्या ३१ आॅक्टोंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभराच्या काळातील सरकारचा कारभार दृष्टिहीन असल्याचेच दिसून आले. केवळ

मुंबई : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला येत्या ३१ आॅक्टोंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभराच्या काळातील सरकारचा कारभार दृष्टिहीन असल्याचेच दिसून आले. केवळ टिष्ट्वटरवर टिवटिव करण्यातच सरकारने पहिले वर्ष घालविल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. तटकरे म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा शब्द देऊनही मागच्या रब्बी व खरीप हंगामासाठी सरकारने नुकसानभरपाई दिली नाही. मुख्यमंत्र्यांकडे वारंवार विनंती करूनही मदत केली नाही. मागच्या वर्षभरात किमान आधारभूत किमतीवर सरकारने किती खरेदी केली, हे सरकारने सांगावे,’ असा सवाल करतानाच ‘दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना जुन्या रोजगार योजनेच्या अंतर्गत मागेल त्याला काम देण्यात यावे,’ असेही तटकरे म्हणाले. पेट्रोल, डिझेलपासून ते तुरडाळीपर्यंतच्या सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. तुरडाळीचा तुटवडा झाला असताना आम्ही १५० रूपयापर्यंत भाव रोखले होते. युती सरकारने मात्र भाव दोनशेपर्यंत नेऊन ठेवले. इतर राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरात कमालीची घट झाली असताना महाराष्ट्रात उलटे घडत आहे. सणासुदीच्या तोंडावर जनतेला महागाईला तोंड द्यावे लागणार आहे. जाहिरनाम्यात विकासाचे दृष्टिपत्र मांडणाऱ्या सरकारने दृष्टिहीन कारभार केल्याची टीका तटकरेंनी केली.राज्यभर करणार आंदोलने वर्षभरात युती सरकारचे अनेक घोटाळे, गैरव्यवहार चव्हाट्यावर आले. या सर्वांचा निषेध म्हणून राष्ट्रवादी २५ ते ३० आॅक्टोबर दरम्यान राज्याच्या सर्व जिल्हा, तालुका स्तरावर आंदोलने करणार आहे, तर ३१ आॅक्टोबर रोजी पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली वरळी येथील जांबोरी मैदानावर सरकारच्या गैरकारभाराचा पंचनामा करण्यात येणार आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली.