शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

हा तर सरकारने केलेला सदोष मनुष्यवध - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 12, 2017 07:56 IST

काश्मीर खो-यात पसरलेल्या अशांततेवर बोट ठेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला आहे

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12 -  दक्षिण काश्मीरच्या सोपियान जिल्ह्यात उमर फैयाज या तरुण लष्करी अधिकाऱ्याचे सहा दहशतवाद्यांनी अपहरण करुन हत्या केली. काश्मीर खो-यात पसरलेल्या अशांततेवर बोट ठेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.  
 
उमर फय्याज हा कश्मीरातील राष्ट्रभक्त तरुणांच्या आशा-आकांक्षेची ज्वाला होता. या ज्वालेवर फुंकर मारणाऱ्यांना आपण कोणते शासन करणार आहोत?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.  शिवाय, देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री सापडू नये हा राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबाच म्हणायला हवा, असा टोलाही त्यांनी हाणला आहे. 
 
तर दुसरीकडे रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांची अवहेलना करणारे वक्तव्याचाही सामना संपादकीयमधून समाचार घेण्यात आला आहे.  सरकार पक्षाचे लोक ज्या ढिलाईने आणि मस्तवालपणे किसानांच्या व जवानांच्या बाबतीत वागत आहेत तो सर्व प्रकार पाहता या देशात राज्यकर्त्यांचा मानसिक घोटाळा झाला आहे व त्या घोटाळ्य़ात देश पूर्ण फसला आहे, असे सांगत उद्धव यांनी "वर्षभरात कित्येक सैनिकांना द्यावे लागलेले बलिदान हा सरकारने केलेला सदोष मनुष्यवध आहे", अशी बोचरी टीकाही केली आहे.  
 
काय आहे सामना संपादकीय?
कश्मीर खो-यात सध्या जे सुरू आहे ते आपल्या देशाच्या सार्वभौमतेला काळिमा फासणारे आहे. कश्मीरचेच सुपुत्र असलेल्या उमर फय्याज या लष्करी अधिकाऱ्याचे अपहरण करून हत्या करणा-या दहशतवाद्यांनी हिंदुस्थानच्या लष्करालाच आव्हान दिले आहे. काही दिवसांपूर्वीच आमच्या दोन जवानांची मुंडकी पाकड्डा सैनिकांनी उडवून देशाची बेअब्रू केली. सैनिकांच्या शिरच्छेदाचा बदला घेऊ हे इशारे हवेत विरण्याआधीच बुधवारी लेफ्टनंट उमर फय्याज यांचे अपहरण व नंतर हत्या करून त्यांचा छिन्नविच्छिन्न देह फेकून देण्यात आला. नेहमीप्रमाणेच सरकारने या हत्येचा निषेध केला आहे. हे कृत्य भ्याडपणाचे असून त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे नक्राश्रू ढाळले गेले आहेत. उमर फय्याज हा तरुण लष्करी अधिकारी कुटुंबातील एका विवाह सोहळ्यासाठी रजेवर आला होता. अतिरेक्यांनी या निःशस्त्र लष्करी अधिकाऱ्याचे लग्नमंडपातूनच अपहरण केले आणि थंड डोक्याने डोक्यात, पोटात आणि छातीत गोळ्या घालून त्याची क्रूर हत्या केली आहे. कारण केवळ एकच. उमर फय्याज हिंदुस्थानी लष्करात सामील झाला होता. कश्मीरातील तरुणांनी हिंदुस्थानी लष्कराशी लढायचे, हिंदुस्थानी जवानांचे प्राण घ्यायचे,
हिंदुस्थानी लष्करावर दगडफेक करायची
हे पाकिस्तानचे जेहादी तत्त्वज्ञान अलीकडच्या काळात कश्मीरात पुन्हा वेगाने फोफावू लागले आहे. उमर फय्याजने हा चुकीचा मार्ग तर निवडला नाहीच, उलट दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठीच तो लष्करात दाखल झाला. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी लेफ्टनंट झाला. कश्मीरातील देशद्रोह्यांना हेच सहन झाले नाही. कश्मीर खोऱ्यातील तरुणांचे ‘रोल मॉडेल’ म्हणून उमर फय्याज यांची ओळख होती. एका बाजूला तरुणवर्ग माथेफिरू बनून हिंसाचार करीत आहे. दहशतवाद्यांच्या टोळीत शिरून सैनिकांवर हल्ला करीत आहे. अशा वातावरणात उमर फय्याज हा तरुण लष्करात भरती होऊन राष्ट्रीय कार्यासाठी त्याच दहशतवादाविरुद्ध जंग पुकारतो हे चित्र आशादायक वाटत असतानाच अतिरेक्यांनी उमरची हत्या केली आहे. सरकारने एका चकमकीत अश्रफ वाणीसारख्या हिजबुल कमांडरला खतम केले. त्या चकमकीचे पडसाद कश्मीर खोऱयात आजही उमटत आहेत. अश्रफ वाणी हा बहकलेल्या तरुणाचा पोस्टरबॉय होता. पण उमर फय्याज हा कश्मीरातील राष्ट्रभक्त तरुणांच्या आशा-आकांक्षेची ज्वाला होता. या ज्वालेवर फुंकर मारणाऱ्यांना आपण कोणते शासन करणार आहोत? संरक्षणमंत्री पदाचा खांदेपालट होऊन तीन महिन्यांचा कालखंड लोटला आहे. पण
देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री
अद्याप तरी मिळाला आहे काय? याबाबत जनतेच्या मनात शंका आहे. अरुण जेटली हे आजही देशाचे अर्थमंत्री व संरक्षणमंत्री आहेत. इतक्या मोठय़ा देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री सापडू नये हा राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबाच म्हणायला हवा. अर्थात हे कर्म जनतेचेच आहे व त्या कर्माचे फळ आमच्या सैनिकांना भोगावे लागत आहे. सरकार पक्षाचे लोक ज्या ढिलाईने आणि मस्तवालपणे किसानांच्या व जवानांच्या बाबतीत वागत आहेत तो सर्व प्रकार पाहता या देशात राज्यकर्त्यांचा मानसिक घोटाळा झाला आहे व त्या घोटाळय़ात देश पूर्ण फसला आहे. देशाच्या तारणहारांच्या भूमिकेत आज जे वावरत आहेत त्यांना शेतकऱयांचा आक्रोश ऐकू येत नाही व जवानांच्या हत्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दबलेल्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत. वर्षभरात कित्येक सैनिकांना द्यावे लागलेले बलिदान हा सरकारने केलेला सदोष मनुष्यवध आहे. या मनुष्यवधाची वेदना ज्यांना बोचत नाही त्यांचे मानसिक संतुलन कोलकाता न्यायालयाच्या न्या. करननप्रमाणे बिघडले आहे काय? वेड्यांनाही वाटते की मी सोडून सारे जग म्हणजे वेडय़ांचा बाजार आहे. सध्या तसे काही घडत असेल तर रावसाहेब दानव्यांप्रमाणे ‘साले’ वगैरे शिव्या देऊनही गप्प बसता येणार नाही. या मानसिक घोटाळय़ांतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा लागेल!