शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

जीएसटीच्या आडून सरकारवर टीकास्त्र

By admin | Updated: May 22, 2017 00:43 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचा कारभार उत्तम चालू असल्याच्या ‘परसेप्शन’ला छेद देण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी रविवारी

अतुल कुलकर्णी  लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचा कारभार उत्तम चालू असल्याच्या ‘परसेप्शन’ला छेद देण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी रविवारी तडाखेबाज भाषणातून केले. राज्य सरकारच्या अडीच वर्षाच्या कारभाराची चिरफाड करत त्यांनी जीएसटीसाठीच्या विशेष अधिवेशनाचा राजकीय फायदा उठवला. भाजपामधील काही अस्वस्थ सदस्यांनी पाटील यांच्या भाषणाला जोरदार दाद दिली, तर शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी जोरदार भाषण होत असल्याचे इशारे विरोधी बाकावरील सदस्यांना केल्याने तर सत्ताधारी सदस्य त्रस्त झाले.जयंत पाटील यांनी तब्बल ३ तास भाषण केले. या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते परवा भाजपात आलेल्या रामकृष्ण बोर्डीकर यांच्यासह अनेकांना फटके लगावले. जयंतरावांना भाषणासाठी ‘ओपनिंग’ला पाठविणे, ही विरोधकांची रणनिती होती. ‘जीएसटी’साठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाची संधी साधून सरकारवर हल्लाबोल करायचा, असा डावपेच आखून ही फटकेबाजी केली गेली.विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे सोमवारी सरकारवर तुटून पडणार आहेत. एका दिवशी, एकाच नेत्याने सरकारवर हल्ला चढवायचा, असे ठरवून विरोधक अधिवेशनात या उतरले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वक्तृत्व गुण नसलेल्या विधानसभेतील एका ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कामकाजावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध करत सरकारच्या विरोधात बोलण्याची चालून आलेली संधी सोडायची नाही. असे सांगत तो प्रस्ताव बाजूला ठेवला. मुख्यमंत्र्यांनी राम शिंदे यांच्याकडे जलसंधारण खाते दिल्यानंतरही त्यांनी ते कसे स्वीकारले, मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्रामुळे राज्यात एकही मोठा प्रकल्प सुरु झालेला नाही. मुख्यमंत्री गाळ काढण्याचे कामे पाहात फिरत आहेत. ज्या बोर्डीकर यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांनी गंभीर आरोप केले होते, त्यांना पक्षात प्रवेश कसा दिला? अशा एक ना अनेक विषयावरून पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.हे तर खर्चमंत्री!केंद्राने नियोजन आयोग संपवला व नीती आयोग आणला. राज्याने प्लॅन, नॉनप्लॅन असे दोन्ही बजेट एकच करुन टाकले व नियोजन विभाग संपवला. त्यामुळे अर्थ व नियोजन असे मंत्रीपद सांभाळणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्याकडचे नियोजन खाते संपुष्टात आले. आता जीएसटीमुळे कर लावण्याचे अधिकारही संपल्यामुळे त्यांच्याकडील अर्थ खात्यातही काही अर्थ उरला नाही. त्यामुळे आता ते फक्त खर्च करणारे ‘खर्चमंत्री’ राहिलेत! जयंत पाटलांच्या या कोपरखळीला सत्ताधारी बाकावरूनही दाद मिळाली.श्रेय मनमोहन सिंग यांचेचजीएसटी, कर्जमाफी, आधार कार्ड, स्मार्ट सीटी, लाभार्थ्यांना थेट लाभ देणे, इस्त्रोमध्ये गुंतवणूक अशा सगळ्या योजना तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याच काळातील. मोदी सरकार फक्त श्रेय घेण्याचे काम करत आहे, असे सांगत पाटील यांनी कोण-कोणत्या योजना मनमोहनसिंग यांच्या काळात झाल्या त्याची यादीच वाचून दाखवली.