शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत फटका बसल्यावर सरकारला जाग; ७५ हजार नोकरभरतीचे काय झाले? मागविली माहिती

By विकास राऊत | Updated: June 7, 2024 10:09 IST

सरकारने छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, नाशिक या विभागातून किती नोकरभरती झाली, याची माहिती विभागनिहाय मागविली आहे. 

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, कांदा, सोयाबीनसह मराठा आरक्षणाच्या मुद्याने जमिनीवर आणले. निवडणुकीत फटका बसल्यानंतर आता सरकार खडबडून जागे झाले असून, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार नोकरभरतीच्या  घोषणेवर काय काम केले, याची माहिती सरकारने विविध विभागांकडून शुक्रवारी  सकाळी ११:०० वाजेपर्यंत मागविली आहे. 

७५ हजार नोकरभरतीची घोषणा होऊन २ वर्षे झाली. मात्र, मंत्रालयातील वेळकाढू अधिकारी व झारीतील शुक्राचार्यांनी घोषणेची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली. परिणामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात  आहे. नोकरभरतीबाबत ज्या विभागाने हलगर्जीपणा केला असेल, त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. सरकारने छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, नाशिक या विभागातून किती नोकरभरती झाली, याची माहिती विभागनिहाय मागविली आहे. 

मंत्रालय पातळीवरील सर्व विभागांना पत्रअपर मुख्य सचिव (सेवा) विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णी यांनी गुरुवारी सर्व सहसचिव, उपसचिव, मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत ७५ हजार रिक्त पदे भरण्यासाठी आपल्या विभागाने केलेल्या कार्यवाहीची सद्यस्थिती काय आहे, हे कळवावे. 

या माहितीचा मागविला अहवालऑगस्ट २०२३ ते मे २०२४ अखेरपर्यंत नियुक्ती आदेश दिलेल्या पदांची संख्या, परीक्षेचा निकाल लागला असून, नियुक्तीपूर्वी कागदपत्रे तपासणी सुरू असलेल्या पदांची संख्या, कंपनीबरोबर करारनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, पण अद्याप परीक्षेचा निकाल लागलेला नाही, अशा पदांची संख्या, या माहितीचा अहवाल प्रशासकीय विभागांकडून सरकारने मागविला आहे. 

बहुतांश नोकरभरती झालेली आहे. नोकरभरतीची माहिती मागविली आहे. सोमवारपर्यंत माहिती येईल.    - नितीन गद्रे, अपर मुख्य सचिव (सेवा) 

टॅग्स :jobनोकरीMaharashtraमहाराष्ट्र