शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

सरकार युध्दात जिंकले, तहात हरले!, अविश्वास ठराव मांडण्याची आली वेळ

By अतुल कुलकर्णी | Updated: March 28, 2018 05:11 IST

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच पुन्हा त्यांंनाच पदावरुन दूर करण्याचा ठराव

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच पुन्हा त्यांंनाच पदावरुन दूर करण्याचा ठराव कामकाजात नोंदविण्याची वेळ सरकारवर आली. विधिमंडळाच्या इतिहासात हे असे पहिल्यांदा घडले. त्यामुळे युध्दात जिंकलेले सरकार तहात मात्र हरले. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी हस्तक्षेप केल्यामुळे हा प्रस्ताव कामकाज पत्रिकेत आणावा लागल्याचे सुत्रांनी सांगितले.अध्यक्षांना पदावरुन हटविण्याचा ठराव विरोधकांनी आणला होता. रितसर १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर तो सभागृहात वाचून दाखवणे आवश्यक होते. पण तो वाचून दाखवला गेला नाही. अविश्वास ठराव आला की त्याला पर्याय म्हणून विश्वासदर्शक ठराव आणण्याची कृती योग्य नाही , असे कौल आणि शकधर यांच्या पुस्तकांमध्येही म्हटल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. शिवाय विरोधकांनी आग्रह केला, नियमांचे दाखले दिले पण अध्यक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर योग्यवेळी निर्णय देऊ एवढेच सांगितले.याचा अर्थ अविश्वास ठरावावरील निर्णय प्रलंबित होता. त्याआधीच अचानक विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी ‘अध्यक्षांवर हे सभागृह विश्वास दर्शवते’ असा प्रस्ताव सभागृहात आणला आणि तो आवाजी मतदानाने गदारोळात मंजूरही झाला. हा प्रस्ताव कामकाज पत्रिकेत दाखवलाही नव्हता.असे प्रस्ताव कामकाजात दाखवावे लागतात. पण तसे काहीच झाले नाही व विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला.मात्र विरोधकांनी त्याच दिवशी राज्यपालांना भेटून हा प्रकार सांगितला. त्यानंतर पडद्याआड बऱ्याच हालचाली झाल्या. जोपर्यंत विरोधकांच्या ठरावावर निर्णयच होत नाही तोपर्यंत तो कायम रहातो, शिवाय तो या अधिवेनात आला नाही तरी तो पुढच्या अधिवेशनातही येऊ शकतो, याआधी असे घडल्याची उदाहरणे राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी सभागृहात दिली.सोमवारी विरोधकांनी व्यूहरचना आखली. सभागृह तहकूब झाल्यानंतर अध्यक्षांच्या दालनात बैठका झाल्या. आमच्याकडे संख्याबळ नाही, त्यामुळे आम्ही हा ठराव जिंकणार नाहीच, तेव्हा तुम्ही तो कामकाजात दाखवा, आम्ही त्यावर बोलू आणि प्रस्ताव मागे घेऊ असे विरोधकांकडून सांगितले गेले. त्यानुसार मंगळवारी तो ठराव कामकाज पत्रिकेत छापला गेला आणि तो पुकारला गेल्यानंतर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आम्हाला त्यावर काहीही बोलायचे नाही, असे सांगून तो ठराव संपूष्टात आणला.त्यामुळे विश्वास दर्शक ठराव मंजूर करुन घेतल्यानंतर, अविश्वास ठरावावर काहीही न बोलता विरोधक जिंकल्याची प्रतिक्रिया विधिमंडळात उमटली.मुळात मुख्यमंत्री किंवा अध्यक्ष यांच्यावर विश्वासदर्शक ठराव असा उल्लेख नियमांमध्ये कुठेही नाही. जर विश्वासदर्शक ठराव आला आणि तो विषय संपला तर आज पुन्हा हा विषय का आला? कायद्याप्रमाणे जी कृती करणे आवश्यक होते ती आज केली गेली. विरोधकांनीही ठराव न मांडून अध्यक्षपदाचा सन्मान केला.- दिलीप वळसे पाटील,माजी अध्यक्ष, विधानसभाविरोधकांनी दिलेला ठराव नियमानुसार आला. त्यात आम्ही विश्वासदर्शक ठराव मांडला व तो मंजूर झाल्याने विरोधकांनीच त्यांचा प्रस्ताव पुढे रेटला नाही, त्यामुळे आमचीच सरशी झाली आहे.- गिरीश बापट, संसदीय कामकाज मंत्री