शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी अनास्थेचा बळी; मोखाड्याच्या सागर वाघ याचा कुपोषणाने मृत्यु

By admin | Updated: August 30, 2016 16:41 IST

मोखाडा तालुक्यातील खोच ग्रामपंचायतीत असलेल्या कलमवाडी येथील कुपोषित बालक सागर शिवा वाघ या कुपोषित बालकाचा आज पहाटे मृत्यु झाला

- रविंद्र साळवे / ऑनलाइन लोकमत
मोखाडा, दि. 30 - तालुक्यातील खोच ग्रामपंचायतीत असलेल्या कलमवाडी येथील कुपोषित बालक सागर शिवा वाघ या कुपोषित बालकाचा आज पहाटे मृत्यु झाला.त्याला काल दुपारी नाशिक सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. गेले चार महिने तो मृत्यूशी झुंजत होता. सरकारने बाल ग्राम विकास केंद्र बंद केल्यानंतर कुपोषित बालकांसाठी कोणतीही योजना सुरु ठेवली नसल्याने सागरच्या उपचारासाठी कोणताही पर्याय त्याच्या कुटुंबीयांकडे शिल्लक नव्हता. सरकारच्या अनास्थेने सागर चा बळी घेतला आहे,याबाबत सर्वत्र तीव्र संतापाची लाट पसरली आहे. 
 
सरकारच्या निर्दयी आणि संवेदशील मानसिकतेने सागरची हत्याच केली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी दिली आहे.
 
१४ ऑगस्ट २०१५ रोजी केंद्र सरकार ने राज्याला पत्र पाठवून निधी अभावी ग्राम बाल विकास केंद्र (VCDC)  बंद करायचे निर्देश दिले होते. याच पात्राच्या आधारावर राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून हे केंद्र बंद करून कुपोषित बालकांची क्रूर थट्टाच केली होती. विशेष म्हणजे केंद्रचा निधी बंद झाला तर राज्याच्या आदिवासी विकास विभागाने या केंद्रांना निधी देऊन हि योजना पूर्ववत करणे अभिप्रेत होते मात्र तसे झाले नाही. यानंतर श्रमजीवी संघटनेने सतत आंदोलन करून सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले. 
 
सरकारची संवेदना जागृत होत नाही असे लक्षात आल्याने विवेक पंडित यांनी पुढाकार घेऊन श्रमजीवी, विधायक संसद आणि श्री.विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून १ जानेवरी २०१६ रोजी जव्हार येथे एका खाजगी फार्म मध्ये कुपोषित बालकांसासाठी " बाल संजीवन छावणी" सुरु करण्यात आली. याठिकाणी दानशूर दात्यांच्या मदतीने कुपोषित बालकांना दाखल करून उपचार दिले गेले. पहिल्याच महिन्यात याठिकाणी ३२ मुलांना कुपोषण श्रेणीतून बाहेर काढण्यात आले होते. सागर वाघ हा १ जानेवारी रोजी छावणीत दाखल झाला होता तेव्हा त्याचे वजन केवळ ४ कि. ६०० ग्रा होते. त्याला त्याच्या आईसह छावणीत दाखल करून उपचार दिले . त्यानंतर त्याचे 10 दिवसातच ६०० ग्राम वजन वाढले. त्यानंतर सतत उपचाराने तो सदृढ बनत चालला होता. याच दरम्यान सागरच्या आईला छावणीत असतानाच मुलगी झाली. सागर च्या आईलाही छावणीत पोषक आहार मिळाल्या कारणाने ती मुलगी सदृढ जन्माला आली. मार्च २०१६ मध्ये सरकारला उपरती सुचली आणि ग्राम बाल विकास केंद्रासाठी (VCDC) साठी जव्हार मोखाडा तालुक्याला निधी आल्याचे सांगत केंद्र सुरू केली. आता केंद्र सुरू झाली म्हणून केंद्रांना पर्याय म्हणून सुरु केलेली छावणी काही दिवसांनी बंद करण्यात आली. सरकारची केंद्र काही दिवस चालली आणि परत जैसे थे झाले. केंद्र बंद झाली आणि सागरच्या उपचाराचा ,पोषक आहाराचा पुन्हा प्रश्न पडला. राज्याच्या आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी मोठ्या समारंभात थाटात अमृत आहार योजना दोन वेळा उदघाटन करून सुरु केल्याचे भासवले. प्रत्यक्षात आजही ती योजना फक्त कागदावर आहे. विशेष म्हणजे गारोदर मतांसाठी असलेल्या या योजनेची आता कुपोषित असलेल्या बालकांसाठी काय तरतूद आहे हा प्रश्न आहे. 
 
घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने सागरच्या पालकांनाही त्यासाठी काही कारणे शक्य नव्हते. काल अत्यवस्थ झाल्यावर त्याला जव्हार कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती जास्त खालावली आणि जव्हार हुन नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याला नेण्यात आले. तिथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
 
कुपोषित बालकांसाठी प्रधान्याने सतत काम करणाऱ्या श्रमजीवी संघटनेचे सांस्थापक विवेक पंडित यांनी या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला. हे सरकार अत्यंत क्रूर असून आदिवासींच्या ,गरिबांच्या जीवाशी खेळणारे सरकार आहे. सागरचा मृत्यू नाही तर ती सरकारचे असंवेदनशील धोरण आणि निर्दयी मानसिकतेने केलेली हत्याच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया विवेक पंडित यांनी दिली.