शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

सरकार डरपोक!

By admin | Updated: April 10, 2015 05:00 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ६६ हजार अवैध बांधकामे पाडण्याच्या आधीच्या आदेशात बदल करून घेण्यासाठी सरकारला अर्ज करता आला असता

अमर मोहिते, मुंबईपिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ६६ हजार अवैध बांधकामे पाडण्याच्या आधीच्या आदेशात बदल करून घेण्यासाठी सरकारला अर्ज करता आला असता. पण राज्य सरकारमध्ये तसे धाडस नाही म्हणून सरकारने महापालिकेला पुढे करून त्यांच्यामार्फत तसा अर्ज केला, असे खडे बोल सुनावत मुंबई उच्च न्यायालयाने ही अवैध बांधकामे वाचविणे आता शक्य नसल्याचे स्पष्ट केले.या महापालिका हद्दीतील अवैध बांधकामे पाडण्याचे आदेश न्यायालयाने आॅक्टोबर २०१३मध्ये दिले. त्यानंतर महापालिकेने कारवाईचा कार्यक्रमही ठरविला. परंतु काही अवैध बांधकामवाले सर्वोच्च न्यायालयात गेले व तेथे तात्पुरती स्थगिती दिली गेल्याने ही प्रस्तावित कारवाई थांबविली गेली. आता ती स्थगिती उठली असल्याने कारवाई करण्यात काहीच अडचण नाही. आधीच्या आदेशानुसार कारवाई केली जावी यासाठी जयश्री डांगे यांनी केलेली ताजी जनहित याचिकाही न्यायालयापुढे आहे.परंतु राज्यभरातील महापालिका हद्दींमधील अवैध बांधकामांचे काय करावे याविषयी नेमलेल्या सिताराम कुंटे समितीने सरकारला अहवाल दिला. ही बांधकामे नियमाधीन करण्याची समितीची शिफारस तत्त्वत: स्वीकारण्याचे सरकारने ठरविले. या पार्श्वभूमवर सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेस असे पत्र लिहिले की, कुंटे समितीविषयी सरकारचा निर्णय होईपर्यंत निदान महिनाभर तरी महापालिकेने कारवाई करायचे थांबावे व तशी मुदत घेण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज करावा.त्यानुसार ज्या मूळ याचिकेत अवैध बांधकामे पाडण्याचे आदेश झाले होते त्यात एक सिव्हिल अ‍ॅप्लिकेशन करून महापालिकेने न्यायालयास स्थगितीची विनंती केली. महापालिकेने आपल्या अर्जासोबत सरकारने पाठविलेले पत्रही जोडले. ते पाहिल्यावर न्या. अभय ओक व न्या. अशोक भंगाळे यांचे खंडपीठ संतापले व न्यायमूर्तींनी सरकारला चांगलेच फैलावर घेतले. तुम्हाला धोरणात्मक निर्णय घ्यायला वेळ मिळावा यासाठी महापालिकेस अर्ज करण्यास सांगण्याची गरज काय? न्यायालयास अशी विनंती करण्याचे धाडस सरकारने दाखवायला हवे होते. खास करून मूळ याचिकेत सरकारही प्रतिवादी असल्याने सरकारला अर्ज करण्यात काहीच अडचण नव्हती. पण सरकारने तसे न करता महापालिकेस पुढे केले, असे न्यायमूर्तींनी सरकारी वकिलास ऐकविले. शिवाय कोणत्या कायद्यानुसार सरकारने असे पत्र पालिकेला लिहिले आहे, असा सवालही न्यायालयाने यावेळी केला.