शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

सरकार डरपोक!

By admin | Updated: April 10, 2015 05:00 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ६६ हजार अवैध बांधकामे पाडण्याच्या आधीच्या आदेशात बदल करून घेण्यासाठी सरकारला अर्ज करता आला असता

अमर मोहिते, मुंबईपिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ६६ हजार अवैध बांधकामे पाडण्याच्या आधीच्या आदेशात बदल करून घेण्यासाठी सरकारला अर्ज करता आला असता. पण राज्य सरकारमध्ये तसे धाडस नाही म्हणून सरकारने महापालिकेला पुढे करून त्यांच्यामार्फत तसा अर्ज केला, असे खडे बोल सुनावत मुंबई उच्च न्यायालयाने ही अवैध बांधकामे वाचविणे आता शक्य नसल्याचे स्पष्ट केले.या महापालिका हद्दीतील अवैध बांधकामे पाडण्याचे आदेश न्यायालयाने आॅक्टोबर २०१३मध्ये दिले. त्यानंतर महापालिकेने कारवाईचा कार्यक्रमही ठरविला. परंतु काही अवैध बांधकामवाले सर्वोच्च न्यायालयात गेले व तेथे तात्पुरती स्थगिती दिली गेल्याने ही प्रस्तावित कारवाई थांबविली गेली. आता ती स्थगिती उठली असल्याने कारवाई करण्यात काहीच अडचण नाही. आधीच्या आदेशानुसार कारवाई केली जावी यासाठी जयश्री डांगे यांनी केलेली ताजी जनहित याचिकाही न्यायालयापुढे आहे.परंतु राज्यभरातील महापालिका हद्दींमधील अवैध बांधकामांचे काय करावे याविषयी नेमलेल्या सिताराम कुंटे समितीने सरकारला अहवाल दिला. ही बांधकामे नियमाधीन करण्याची समितीची शिफारस तत्त्वत: स्वीकारण्याचे सरकारने ठरविले. या पार्श्वभूमवर सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेस असे पत्र लिहिले की, कुंटे समितीविषयी सरकारचा निर्णय होईपर्यंत निदान महिनाभर तरी महापालिकेने कारवाई करायचे थांबावे व तशी मुदत घेण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज करावा.त्यानुसार ज्या मूळ याचिकेत अवैध बांधकामे पाडण्याचे आदेश झाले होते त्यात एक सिव्हिल अ‍ॅप्लिकेशन करून महापालिकेने न्यायालयास स्थगितीची विनंती केली. महापालिकेने आपल्या अर्जासोबत सरकारने पाठविलेले पत्रही जोडले. ते पाहिल्यावर न्या. अभय ओक व न्या. अशोक भंगाळे यांचे खंडपीठ संतापले व न्यायमूर्तींनी सरकारला चांगलेच फैलावर घेतले. तुम्हाला धोरणात्मक निर्णय घ्यायला वेळ मिळावा यासाठी महापालिकेस अर्ज करण्यास सांगण्याची गरज काय? न्यायालयास अशी विनंती करण्याचे धाडस सरकारने दाखवायला हवे होते. खास करून मूळ याचिकेत सरकारही प्रतिवादी असल्याने सरकारला अर्ज करण्यात काहीच अडचण नव्हती. पण सरकारने तसे न करता महापालिकेस पुढे केले, असे न्यायमूर्तींनी सरकारी वकिलास ऐकविले. शिवाय कोणत्या कायद्यानुसार सरकारने असे पत्र पालिकेला लिहिले आहे, असा सवालही न्यायालयाने यावेळी केला.