शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

सरकार डरपोक!

By admin | Updated: April 10, 2015 05:00 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ६६ हजार अवैध बांधकामे पाडण्याच्या आधीच्या आदेशात बदल करून घेण्यासाठी सरकारला अर्ज करता आला असता

अमर मोहिते, मुंबईपिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ६६ हजार अवैध बांधकामे पाडण्याच्या आधीच्या आदेशात बदल करून घेण्यासाठी सरकारला अर्ज करता आला असता. पण राज्य सरकारमध्ये तसे धाडस नाही म्हणून सरकारने महापालिकेला पुढे करून त्यांच्यामार्फत तसा अर्ज केला, असे खडे बोल सुनावत मुंबई उच्च न्यायालयाने ही अवैध बांधकामे वाचविणे आता शक्य नसल्याचे स्पष्ट केले.या महापालिका हद्दीतील अवैध बांधकामे पाडण्याचे आदेश न्यायालयाने आॅक्टोबर २०१३मध्ये दिले. त्यानंतर महापालिकेने कारवाईचा कार्यक्रमही ठरविला. परंतु काही अवैध बांधकामवाले सर्वोच्च न्यायालयात गेले व तेथे तात्पुरती स्थगिती दिली गेल्याने ही प्रस्तावित कारवाई थांबविली गेली. आता ती स्थगिती उठली असल्याने कारवाई करण्यात काहीच अडचण नाही. आधीच्या आदेशानुसार कारवाई केली जावी यासाठी जयश्री डांगे यांनी केलेली ताजी जनहित याचिकाही न्यायालयापुढे आहे.परंतु राज्यभरातील महापालिका हद्दींमधील अवैध बांधकामांचे काय करावे याविषयी नेमलेल्या सिताराम कुंटे समितीने सरकारला अहवाल दिला. ही बांधकामे नियमाधीन करण्याची समितीची शिफारस तत्त्वत: स्वीकारण्याचे सरकारने ठरविले. या पार्श्वभूमवर सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेस असे पत्र लिहिले की, कुंटे समितीविषयी सरकारचा निर्णय होईपर्यंत निदान महिनाभर तरी महापालिकेने कारवाई करायचे थांबावे व तशी मुदत घेण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज करावा.त्यानुसार ज्या मूळ याचिकेत अवैध बांधकामे पाडण्याचे आदेश झाले होते त्यात एक सिव्हिल अ‍ॅप्लिकेशन करून महापालिकेने न्यायालयास स्थगितीची विनंती केली. महापालिकेने आपल्या अर्जासोबत सरकारने पाठविलेले पत्रही जोडले. ते पाहिल्यावर न्या. अभय ओक व न्या. अशोक भंगाळे यांचे खंडपीठ संतापले व न्यायमूर्तींनी सरकारला चांगलेच फैलावर घेतले. तुम्हाला धोरणात्मक निर्णय घ्यायला वेळ मिळावा यासाठी महापालिकेस अर्ज करण्यास सांगण्याची गरज काय? न्यायालयास अशी विनंती करण्याचे धाडस सरकारने दाखवायला हवे होते. खास करून मूळ याचिकेत सरकारही प्रतिवादी असल्याने सरकारला अर्ज करण्यात काहीच अडचण नव्हती. पण सरकारने तसे न करता महापालिकेस पुढे केले, असे न्यायमूर्तींनी सरकारी वकिलास ऐकविले. शिवाय कोणत्या कायद्यानुसार सरकारने असे पत्र पालिकेला लिहिले आहे, असा सवालही न्यायालयाने यावेळी केला.