शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

विरोधकांपुढे सरकार सपशेल झुकले!

By admin | Updated: July 15, 2015 00:48 IST

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीने निर्माण केलेल्या प्रचंड दबावापुढे अखेर सरकारला माघार घ्यावी लागली. परिणामी याच विषयावर विधानसभेत

मुंबई : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीने निर्माण केलेल्या प्रचंड दबावापुढे अखेर सरकारला माघार घ्यावी लागली. परिणामी याच विषयावर विधानसभेत स्वत:च आणलेली चर्चा सत्ताधारी पक्षाला थांबवून सभागृह दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहापेक्षा सभागृहाबाहेर बऱ्याच घडामोडी घडल्या. अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली, पण त्यातही कोणताच तोडगा निघता नाही. कर्जमाफी देणार नाही असे आपण म्हटलेलेच नाही, असा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या बैठकीत केला. हा खुलासा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी माध्यमांना सांगावा असेही ठरले. कर्जमाफीवरुन दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत गोंधळ चालू असतानाच कामकाज रेटून नेण्याच्या सरकारच्या भूमिकेवर विरोधकांनी निषेध करत बहिष्कार टाकला आणि विधानभवनातच असलेल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ विरोधकांनी बैठक मांडली. विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा या जागेचा असा उपयोग झाला असेल. माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, छगन भूजबळ असे अनेक नेते विधानभवनात जमिनीवर बसल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि ते पाहण्यासाठी, त्यांचे फोटो काढून घेण्यासाठी तेथे गर्दी जमली. (विशेष प्रतिनिधी)अध्यक्षांच्या दालनातील बैठक निष्फळ !अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या दालनात बैठक झाली. त्यास मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सगळे नेते होते. कर्जमाफी देणार नाही असे का बोललात, असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला गेला. तेव्हा आपण असे बोललोच नाही, आपल्या तोंडी तसे विधान एका वृत्तपत्राने (लोकमत नव्हे) घातले, असा खुलासा फडणवीस यांनी केला. कोणताच निर्णय न होता ती बैठक संपली.