शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

विरोधकांपुढे सरकार सपशेल झुकले!

By admin | Updated: July 15, 2015 00:48 IST

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीने निर्माण केलेल्या प्रचंड दबावापुढे अखेर सरकारला माघार घ्यावी लागली. परिणामी याच विषयावर विधानसभेत

मुंबई : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीने निर्माण केलेल्या प्रचंड दबावापुढे अखेर सरकारला माघार घ्यावी लागली. परिणामी याच विषयावर विधानसभेत स्वत:च आणलेली चर्चा सत्ताधारी पक्षाला थांबवून सभागृह दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहापेक्षा सभागृहाबाहेर बऱ्याच घडामोडी घडल्या. अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली, पण त्यातही कोणताच तोडगा निघता नाही. कर्जमाफी देणार नाही असे आपण म्हटलेलेच नाही, असा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या बैठकीत केला. हा खुलासा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी माध्यमांना सांगावा असेही ठरले. कर्जमाफीवरुन दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत गोंधळ चालू असतानाच कामकाज रेटून नेण्याच्या सरकारच्या भूमिकेवर विरोधकांनी निषेध करत बहिष्कार टाकला आणि विधानभवनातच असलेल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ विरोधकांनी बैठक मांडली. विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा या जागेचा असा उपयोग झाला असेल. माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, छगन भूजबळ असे अनेक नेते विधानभवनात जमिनीवर बसल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि ते पाहण्यासाठी, त्यांचे फोटो काढून घेण्यासाठी तेथे गर्दी जमली. (विशेष प्रतिनिधी)अध्यक्षांच्या दालनातील बैठक निष्फळ !अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या दालनात बैठक झाली. त्यास मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सगळे नेते होते. कर्जमाफी देणार नाही असे का बोललात, असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला गेला. तेव्हा आपण असे बोललोच नाही, आपल्या तोंडी तसे विधान एका वृत्तपत्राने (लोकमत नव्हे) घातले, असा खुलासा फडणवीस यांनी केला. कोणताच निर्णय न होता ती बैठक संपली.