शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोकण विद्यापीठासाठी विद्यार्थ्यांचा कल घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 03:41 IST

९० दिवसात विद्यार्थ्यांचा कल जाणून घेवून निर्णय घेण्यात येणार

मुंबई : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ तयार करण्याबाबत ९० दिवसात विद्यार्थ्यांचा कल जाणून घेवून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. याशिवाय, मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात दोन महिन्यात स्वतंत्र संचालक नेमण्याची घोषणाही मंत्री सामंत यांनी यावेळी केली.रत्नागिरी आणि सिंधुदुगार्साठी अंतरामुळे मुंबई विद्यापीठ गैरसोयीचे असल्याने कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ उभारण्याची मागणी भाजप सदस्य निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. तर शिक्षक आमदार कपिल पाटील, शेकापचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी मात्र कोकणातील जनतेची स्वतंत्र विद्यापीठाची मागणी नाही अशी भूमिका मांडली. स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय झाला तरी त्यात रायगडचा समावेश नसेल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.सिंधुदुर्गात विद्यापीठाचे उपकेंद्रयावेळी उपकेंद्र सक्षमीकरणाची मागणी सदस्यांनी केली. यावर, मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी आणि ठाणे उपकेंद्रांना सक्षम केले जाईल. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपकेंद्र स्थापन करून येत्या दोन महिन्यात सर्व उपकेंद्रांवर संचालक नेमण्याचे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले.बसस्थानकांच्या नूतनीकरणासाठी आराखडामुंबई : एस.टी. बसमुळे झालेल्या अपघातात मरण पावलेल्या खासगी वाहनातील मृतांच्या नातेवाईकांनाही आर्थिक मदत देण्याबाबतचे धोरण तयार करण्याच्या दृष्टीने खात्याअंतर्गत चर्चा करण्याचे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी दिले. तसेच राज्यातील सर्व बसस्थानकांच्या नुतनीकरणाचा आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. धुळ्यात एसटी बस आणि रिक्षाच्या विचित्र अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या एसटी प्रवाशांच्या कुटुंबियांना महामंडळाकडून दहा लाखांचा निधी देण्यात आला. तशाच पद्धतीने अन्य प्रवाशांनाही मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली.‘त्या’ सिंचन प्रकल्पांच्या सुप्रमांचा घेणार आढावामुंबई : फडणवीस सरकारच्या काळातील सिंचन प्रकल्पांचा मुद्दा पुन्हा पुढे ढकलण्यात आला. या प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतांवर (सुप्रमा) संशय व्यक्त करत अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधान परिषदेत दिले. मागील सरकारच्या काळात जलसंपदा विभागामार्फत मंत्रिमंडळाची तसेच व्यय अग्र समिती (ईपीसी)ची मान्यता न घेताच नियमबाह्य पद्धतीने सुमारे ६१४६ कोटी रुपये खर्चाच्या सिंचन प्रकल्पांना मान्यता दिल्याचा आरोप काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. या प्रकल्पांना सुप्रमा देताना खर्चाची मर्यादा वाढवून घेण्यात आल्याचा संशय सदस्यांनी व्यक्त केला.