शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कोकण विद्यापीठासाठी विद्यार्थ्यांचा कल घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 03:41 IST

९० दिवसात विद्यार्थ्यांचा कल जाणून घेवून निर्णय घेण्यात येणार

मुंबई : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ तयार करण्याबाबत ९० दिवसात विद्यार्थ्यांचा कल जाणून घेवून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. याशिवाय, मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात दोन महिन्यात स्वतंत्र संचालक नेमण्याची घोषणाही मंत्री सामंत यांनी यावेळी केली.रत्नागिरी आणि सिंधुदुगार्साठी अंतरामुळे मुंबई विद्यापीठ गैरसोयीचे असल्याने कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ उभारण्याची मागणी भाजप सदस्य निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. तर शिक्षक आमदार कपिल पाटील, शेकापचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी मात्र कोकणातील जनतेची स्वतंत्र विद्यापीठाची मागणी नाही अशी भूमिका मांडली. स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय झाला तरी त्यात रायगडचा समावेश नसेल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.सिंधुदुर्गात विद्यापीठाचे उपकेंद्रयावेळी उपकेंद्र सक्षमीकरणाची मागणी सदस्यांनी केली. यावर, मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी आणि ठाणे उपकेंद्रांना सक्षम केले जाईल. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपकेंद्र स्थापन करून येत्या दोन महिन्यात सर्व उपकेंद्रांवर संचालक नेमण्याचे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले.बसस्थानकांच्या नूतनीकरणासाठी आराखडामुंबई : एस.टी. बसमुळे झालेल्या अपघातात मरण पावलेल्या खासगी वाहनातील मृतांच्या नातेवाईकांनाही आर्थिक मदत देण्याबाबतचे धोरण तयार करण्याच्या दृष्टीने खात्याअंतर्गत चर्चा करण्याचे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी दिले. तसेच राज्यातील सर्व बसस्थानकांच्या नुतनीकरणाचा आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. धुळ्यात एसटी बस आणि रिक्षाच्या विचित्र अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या एसटी प्रवाशांच्या कुटुंबियांना महामंडळाकडून दहा लाखांचा निधी देण्यात आला. तशाच पद्धतीने अन्य प्रवाशांनाही मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली.‘त्या’ सिंचन प्रकल्पांच्या सुप्रमांचा घेणार आढावामुंबई : फडणवीस सरकारच्या काळातील सिंचन प्रकल्पांचा मुद्दा पुन्हा पुढे ढकलण्यात आला. या प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतांवर (सुप्रमा) संशय व्यक्त करत अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधान परिषदेत दिले. मागील सरकारच्या काळात जलसंपदा विभागामार्फत मंत्रिमंडळाची तसेच व्यय अग्र समिती (ईपीसी)ची मान्यता न घेताच नियमबाह्य पद्धतीने सुमारे ६१४६ कोटी रुपये खर्चाच्या सिंचन प्रकल्पांना मान्यता दिल्याचा आरोप काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. या प्रकल्पांना सुप्रमा देताना खर्चाची मर्यादा वाढवून घेण्यात आल्याचा संशय सदस्यांनी व्यक्त केला.