शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने ईव्हीएमचा हट्ट सोडावा - अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 06:20 IST

पालघर आणि भंडारा-गोंदियातील लोकसभा पोटनिवडणुकीत इव्हीएम मशिन बंद पडण्याचे प्रकार घडले. ईव्हीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे अनेक ठिकाणी

मुंबई : पालघर आणि भंडारा-गोंदियातील लोकसभा पोटनिवडणुकीत इव्हीएम मशिन बंद पडण्याचे प्रकार घडले. ईव्हीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे अनेक ठिकाणी मतदानाचा खोळंबा झाला. लोकांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. या सर्व घटनांमुळे लोकांच्या मनात ईव्हीएम मशिनबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपा सरकारने ईव्हीएमचा हट्ट न धरता, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.राज्यात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुका आणि आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मंगळवारी मुंबईत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या वेळी अशोक चव्हाण यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, संजय निरुपम आदी नेते उपस्थित होते. पोटनिवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनमधील बिघाडाबाबत या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. भंडारा-गोंदियाप्रमाणेच पालघर लोकसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन बंद पडल्याने अनेक ठिकाणी मतदान खोळंबले. मात्र, अशा ठिकाणी फेरमतदान घेण्यात आले नाही. पालघरमध्ये मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशिन खासगी कारमधून नेण्यात आल्या. हा गंभीर प्रकार आहे. निवडणूक आयोगाची यंत्रणा काय करतेय, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. निवडणूक निष्पक्ष आणि निर्भीड वातावरणात झाली का, याविषयी शंका आहे. काँग्रेस पक्षाचे राज्यातील नेते लवकरच दिल्लीला जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदाचा वापर सगळीकडे केल्याचे सर्व घटनाक्रमांवरून दिसून येत आहे, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला.आगामी विधानपरिषद निवडणुकीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. बुधवारी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, तसेच शरद यादव यांच्या पक्षासमवेत चर्चा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून देण्याच्या जागेसाठी होणारी निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यापेक्षा राज्यसभेप्रमाणे खुल्या मतदान पद्धतीने घ्यावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच शिवसेना-भाजपा युती न झाल्यास काँग्रेसला फायदा होईल, असे विधान केले होते. याबाबत बोलताना, चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचा विचार करण्यापेक्षा सेना-भाजपाचेच नीट पहावे, असा टोला अशोक चव्हाण यांनी हाणला.