शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

सरकारने ईव्हीएमचा हट्ट सोडावा - अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 06:20 IST

पालघर आणि भंडारा-गोंदियातील लोकसभा पोटनिवडणुकीत इव्हीएम मशिन बंद पडण्याचे प्रकार घडले. ईव्हीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे अनेक ठिकाणी

मुंबई : पालघर आणि भंडारा-गोंदियातील लोकसभा पोटनिवडणुकीत इव्हीएम मशिन बंद पडण्याचे प्रकार घडले. ईव्हीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे अनेक ठिकाणी मतदानाचा खोळंबा झाला. लोकांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. या सर्व घटनांमुळे लोकांच्या मनात ईव्हीएम मशिनबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपा सरकारने ईव्हीएमचा हट्ट न धरता, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.राज्यात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुका आणि आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मंगळवारी मुंबईत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या वेळी अशोक चव्हाण यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, संजय निरुपम आदी नेते उपस्थित होते. पोटनिवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनमधील बिघाडाबाबत या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. भंडारा-गोंदियाप्रमाणेच पालघर लोकसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन बंद पडल्याने अनेक ठिकाणी मतदान खोळंबले. मात्र, अशा ठिकाणी फेरमतदान घेण्यात आले नाही. पालघरमध्ये मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशिन खासगी कारमधून नेण्यात आल्या. हा गंभीर प्रकार आहे. निवडणूक आयोगाची यंत्रणा काय करतेय, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. निवडणूक निष्पक्ष आणि निर्भीड वातावरणात झाली का, याविषयी शंका आहे. काँग्रेस पक्षाचे राज्यातील नेते लवकरच दिल्लीला जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदाचा वापर सगळीकडे केल्याचे सर्व घटनाक्रमांवरून दिसून येत आहे, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला.आगामी विधानपरिषद निवडणुकीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. बुधवारी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, तसेच शरद यादव यांच्या पक्षासमवेत चर्चा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून देण्याच्या जागेसाठी होणारी निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यापेक्षा राज्यसभेप्रमाणे खुल्या मतदान पद्धतीने घ्यावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच शिवसेना-भाजपा युती न झाल्यास काँग्रेसला फायदा होईल, असे विधान केले होते. याबाबत बोलताना, चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचा विचार करण्यापेक्षा सेना-भाजपाचेच नीट पहावे, असा टोला अशोक चव्हाण यांनी हाणला.