शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

सरकारी तिजोरीला कोट्यवधीचा चुना, उच्चस्तरीय चौकशीची मागणी सरकारने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 06:05 IST

जनावरांना देण्यात येणाºया एफएमडी लसीचा पुरवठा करणाºया केंद्र सरकारच्या इंडियन इम्युनॉलॉजिकल्स या अंगीकृत कंपनीवर ज्या कारणासाठी ठपका ठेवत दंड वसूल केला गेला, त्याच कारणासाठी बायोव्हेट या खासगी कंपनीला मात्र राज्य सरकारने मोकळे रान सोडले आहे.

- अतुल कुलकर्णीमुंबई - जनावरांना देण्यात येणाºया एफएमडी लसीचा पुरवठा करणाºया केंद्र सरकारच्या इंडियन इम्युनॉलॉजिकल्स या अंगीकृत कंपनीवर ज्या कारणासाठी ठपका ठेवत दंड वसूल केला गेला, त्याच कारणासाठी बायोव्हेट या खासगी कंपनीला मात्र राज्य सरकारने मोकळे रान सोडले आहे. या प्रकरणाशी मंत्री महादेव जानकर यांचा थेट संबंध असल्याने याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मात्र, पारदर्शकतेचा आव आणणा-या भाजपा शिवसेना सरकारने ती फेटाळून लावली आहे.एफएमडी लसीचे काम गेल्या वर्षी इंडियन इम्युनॉलॉजिकल्स या कंपनीला दिले होते. त्या कंपनीने महाराष्टÑासह १२ राज्यात ७ रु. १५ पैसे दराने लस दिली होती. मात्र ही लस तेलंगणा आणि गुजरात या दोन राज्यांना त्यांनी ६ रु. ८६ पैसे दराने दिली. त्यामुळे महाराष्टÑाची फसवणूक झाली, असा पवित्रा घेत मंत्री जानकर यांनी या कंपनीकडून फरकाची रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर, या कंपनीने ९९,४२,८७० रुपये फरकाची रक्कम १२ डिसेंबर २०१७ रोजी राज्य सरकारला भरली देखील.त्यानंतर, जानकर यांच्या खात्याने हे काम बायोव्हेट नावाच्या खासगी कंपनीला १ मार्च २०१८ रोजी दिले. त्या कंपनी ही लस महाराष्टÑ शासनाला ७ रु. ७६ पैसे दराने दिली. मात्र, हरयाणा सरकारला याच कंपनीने १५ फेब्रुवारी रोजी ६ रु. २५ पैसे आणि पश्चिम बंगाल सरकारला १३ फेब्रुवारी रोजी ६ रु. ३३ पैसे दराने ही लस दिली. बायोव्हेटने हरियाणापेक्षा १ रु. ५१ पैसे जास्त दराने महाराष्टÑाला लस दिली, पण जानकर यांनी या कंपनीकडून फरकाची ३ कोटी १५ लाख रुपये रक्कम वसूल करण्याची भूमिका घेतली नाही.एकच खाते, एकच मंत्री एकाच टेंडरमध्ये एका कंपनीला एक न्याय आणि दुसºया कंपनीला दुसरा न्याय कसा देऊ शकतो? कारण या कंपनीलाच लाभ मिळावा म्हणून हे केले गेले, असा आक्षेप चव्हाण व पवार यांनी घेतले आहेत.ज्या कारणासाठी पहिली निविदा बेकायदेशीर ठरविली गेली, तेच कारण दुसºया कंपनीच्या बाबतीत लागू होत असताना, त्यांची निविदा मात्र मान्य केली गेली. यावरूनच मंत्री जानकर यांना ठरावीक कंपनीला फायदा मिळवून द्यायचा होता, हे सिद्ध झाले आहे, असे सांगून विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत हा विषय आणणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा