शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सत्तेवर आलेले सरकार घटनाबाह्य

By admin | Updated: November 23, 2014 01:10 IST

राज्यातील भाजपाचे सरकार घटनाबाह्य असून, या सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी शनिवारी व्यक्त केले.

मुंबई : केवळ आवाजी मतदानाने सत्तेत आलेले राज्यातील भाजपाचे सरकार घटनाबाह्य असून, या सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे  मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी शनिवारी व्यक्त केले. अल्पमतातील सरकार वाचविण्यासाठी नियम व कायदे पायदळी तुडवून लोकशाहीच्या पायाला या भाजपाने सुरुंग लावला, अशी टीकाही त्यांनी केली.
जस्टिस फॉर पीस या संस्थेच्या वतीने यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित चर्चासत्रत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर या वेळी उपस्थित होते. 
न्या. सावंत म्हणाले, विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम झाले. हा ठराव मान्य केल्यास इतर राज्यातही असाच प्रघात पडेल. ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्याची प्रक्रियाच मुळात चुकीची असून, सरकारच्या विरोधात किती जण आहेत हे यातून स्पष्ट झाले नाही. आवाजी मतदान होईल, याची पूर्वकल्पना सभागृहात देण्यात आली नाही. ठरावाला विरोध असणा:यांना विरोध दर्शविण्याची कुठलीही संधी देण्यात आली नाही.  विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी विधानसभेतील कामकाजाचा क्रम अध्यक्षांनी कोणालाही विश्वासात न घेता आणि विरोधकांना पूर्वकल्पना न देता बदलला. असा बदल करण्यासाठी सभागृहाची मान्यता घ्यायला हवी होती. विश्वासदर्शक ठराव आधी घेतल्याने अनेक सदस्य सभागृहाबाहेरच राहिले. त्यांना आपले मत नोंदविता आले नाही. त्यामुळे हा ठराव घटनाबाह्य ठरतो, असेही  सावंत म्हणाले.  (विशेष प्रतिनिधी)
 
15 काँग्रेस आमदारांच्या निलंबनाचा डाव - चव्हाण
अल्पमतातील सरकार वाचविण्यासाठी भाजपाची धडपड असून, डिसेंबरच्या अधिवेशनात जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करून काँग्रेसचे 15 आमदार निलंबित करण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी केला. विश्वासदर्शक ठराव घटनात्मक पद्धतीने जिंकला, असे भाजपाचे म्हणणो असेल तर या ठरावाच्या वेळी सभागृहात चाललेल्या कामकाजाचा व्हीडीओ जनतेसाठी खुला करावा, असेही चव्हाण या वेळी म्हणाले.