शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

सत्तेवर आलेले सरकार घटनाबाह्य

By admin | Updated: November 23, 2014 01:10 IST

राज्यातील भाजपाचे सरकार घटनाबाह्य असून, या सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी शनिवारी व्यक्त केले.

मुंबई : केवळ आवाजी मतदानाने सत्तेत आलेले राज्यातील भाजपाचे सरकार घटनाबाह्य असून, या सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे  मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी शनिवारी व्यक्त केले. अल्पमतातील सरकार वाचविण्यासाठी नियम व कायदे पायदळी तुडवून लोकशाहीच्या पायाला या भाजपाने सुरुंग लावला, अशी टीकाही त्यांनी केली.
जस्टिस फॉर पीस या संस्थेच्या वतीने यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित चर्चासत्रत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर या वेळी उपस्थित होते. 
न्या. सावंत म्हणाले, विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम झाले. हा ठराव मान्य केल्यास इतर राज्यातही असाच प्रघात पडेल. ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्याची प्रक्रियाच मुळात चुकीची असून, सरकारच्या विरोधात किती जण आहेत हे यातून स्पष्ट झाले नाही. आवाजी मतदान होईल, याची पूर्वकल्पना सभागृहात देण्यात आली नाही. ठरावाला विरोध असणा:यांना विरोध दर्शविण्याची कुठलीही संधी देण्यात आली नाही.  विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी विधानसभेतील कामकाजाचा क्रम अध्यक्षांनी कोणालाही विश्वासात न घेता आणि विरोधकांना पूर्वकल्पना न देता बदलला. असा बदल करण्यासाठी सभागृहाची मान्यता घ्यायला हवी होती. विश्वासदर्शक ठराव आधी घेतल्याने अनेक सदस्य सभागृहाबाहेरच राहिले. त्यांना आपले मत नोंदविता आले नाही. त्यामुळे हा ठराव घटनाबाह्य ठरतो, असेही  सावंत म्हणाले.  (विशेष प्रतिनिधी)
 
15 काँग्रेस आमदारांच्या निलंबनाचा डाव - चव्हाण
अल्पमतातील सरकार वाचविण्यासाठी भाजपाची धडपड असून, डिसेंबरच्या अधिवेशनात जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करून काँग्रेसचे 15 आमदार निलंबित करण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी केला. विश्वासदर्शक ठराव घटनात्मक पद्धतीने जिंकला, असे भाजपाचे म्हणणो असेल तर या ठरावाच्या वेळी सभागृहात चाललेल्या कामकाजाचा व्हीडीओ जनतेसाठी खुला करावा, असेही चव्हाण या वेळी म्हणाले.