शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

आंदोलनांशिवाय सरकारला जाग नाही : पवार

By admin | Updated: May 4, 2017 02:08 IST

शासनाच्या धोरणाविरोधात अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलने केली आहेत. अजूनदेखील आंदोलने

डोर्लेवाडी : शासनाच्या धोरणाविरोधात अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलने केली आहेत. अजूनदेखील आंदोलने करावी लागतील, त्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही. शेतकऱ्यांच्या कुठल्याच पिकाला भाव मिळत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.डोर्लेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय, व्यायामशाळा, अंगणवाडी अशा विविध विकासकामांचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले की, आता आम्ही काढलेल्या संघर्ष यात्रेवरदेखील मुख्यमंत्री टीका करीत आहेत. पाण्याच्या बाबतीत आता शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. शेतकऱ्यांना शेततळी आणि ठिबकसिंचन केल्याशिवाय गत्यंतर नाही. नीरा देवघरचे काम चालू आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मिळणारे ६ टीएमसी पाणी बंद होणार आहे. आज आपण या पुढे पाण्याच्या वापर व्यवस्थित करणे आवश्यक आहे.या वेळी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, बांधकाम सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, बारामती पंचायत समिती सभापती संजय भोसले, जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे, पंचायत समिती सदस्य राहुल झारगड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश गोफणे, सरपंच राधाबाई जाधव, अशोक नवले, रमेश मोरे, प्रतिभा नेवसे, गौरी शिंदे, प्रियांका निलाखे, प्रभावती नाळे ,अश्विनी म्हेत्रे , विनोद नवले, शंभू भोपळे, कृष्णात जाधव, संतोष नेवसे, अविनाश काळकुटे, बापूराव गवळी, अतुल भोपळे, किरण तावरे, श्रीपती जाधव, कांतीलाल नाळे, ग्रामविकास अधिकारी संजय म्हेत्रे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाट्या लागण्यासाठी काम करीत नाहीएखाद्याने कामासाठी काही काम न करता हक्क दाखविणे सद्सदविवेक बुद्धीला न पटणारे आहे. बारामती तालुक्यात भूमिपूजन उद्घाटनाच्या पाट्या लागण्यासाठी पवार कुटुंबीयातील कोणीही काम करीत नाही. अनेक जणांनी पवार कुटुंबीयाची काम करण्याची पद्धत बघितली आहे. आपण आपल्या पक्षाचे नियम पाळूया, दुसऱ्यांनी पाळायचे का नाही तो त्यांचा प्रश्न आहे, असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

भाजपा-सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कापली रिबनराष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन करण्यापूर्वीच रविवारी (दि. ३०) पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, भाजपाचे नेते प्रशांत सातव, नगरसेवक बबलू देशमुख, विष्णू चौधर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र काळे आदी या ठिकाणी पोहोचले. यावेळी ग्रामपंचायतीच्या समोर या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या नावचा फलक लावण्यात आला. त्यानंतर कार्यालयाची रिबन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कापून उद्घाटन करण्यात आले. उपसरपंच काळकुटे यांचे नाव या फलकावर निमंत्रक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.