शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

आंदोलनांशिवाय सरकारला जाग नाही : पवार

By admin | Updated: May 4, 2017 02:08 IST

शासनाच्या धोरणाविरोधात अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलने केली आहेत. अजूनदेखील आंदोलने

डोर्लेवाडी : शासनाच्या धोरणाविरोधात अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलने केली आहेत. अजूनदेखील आंदोलने करावी लागतील, त्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही. शेतकऱ्यांच्या कुठल्याच पिकाला भाव मिळत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.डोर्लेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय, व्यायामशाळा, अंगणवाडी अशा विविध विकासकामांचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले की, आता आम्ही काढलेल्या संघर्ष यात्रेवरदेखील मुख्यमंत्री टीका करीत आहेत. पाण्याच्या बाबतीत आता शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. शेतकऱ्यांना शेततळी आणि ठिबकसिंचन केल्याशिवाय गत्यंतर नाही. नीरा देवघरचे काम चालू आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मिळणारे ६ टीएमसी पाणी बंद होणार आहे. आज आपण या पुढे पाण्याच्या वापर व्यवस्थित करणे आवश्यक आहे.या वेळी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, बांधकाम सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, बारामती पंचायत समिती सभापती संजय भोसले, जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे, पंचायत समिती सदस्य राहुल झारगड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश गोफणे, सरपंच राधाबाई जाधव, अशोक नवले, रमेश मोरे, प्रतिभा नेवसे, गौरी शिंदे, प्रियांका निलाखे, प्रभावती नाळे ,अश्विनी म्हेत्रे , विनोद नवले, शंभू भोपळे, कृष्णात जाधव, संतोष नेवसे, अविनाश काळकुटे, बापूराव गवळी, अतुल भोपळे, किरण तावरे, श्रीपती जाधव, कांतीलाल नाळे, ग्रामविकास अधिकारी संजय म्हेत्रे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाट्या लागण्यासाठी काम करीत नाहीएखाद्याने कामासाठी काही काम न करता हक्क दाखविणे सद्सदविवेक बुद्धीला न पटणारे आहे. बारामती तालुक्यात भूमिपूजन उद्घाटनाच्या पाट्या लागण्यासाठी पवार कुटुंबीयातील कोणीही काम करीत नाही. अनेक जणांनी पवार कुटुंबीयाची काम करण्याची पद्धत बघितली आहे. आपण आपल्या पक्षाचे नियम पाळूया, दुसऱ्यांनी पाळायचे का नाही तो त्यांचा प्रश्न आहे, असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

भाजपा-सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कापली रिबनराष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन करण्यापूर्वीच रविवारी (दि. ३०) पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, भाजपाचे नेते प्रशांत सातव, नगरसेवक बबलू देशमुख, विष्णू चौधर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र काळे आदी या ठिकाणी पोहोचले. यावेळी ग्रामपंचायतीच्या समोर या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या नावचा फलक लावण्यात आला. त्यानंतर कार्यालयाची रिबन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कापून उद्घाटन करण्यात आले. उपसरपंच काळकुटे यांचे नाव या फलकावर निमंत्रक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.