शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

सरकारी वकिलांच्या कार्यपद्धतीचे मूल्यमापन होणार!

By admin | Updated: March 14, 2015 04:33 IST

फौजदारी खटल्यातील गुन्हे सिद्धतेचा दर वाढविण्यासाठी नेमलेल्या समितीच्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या असून, यापुढे सरकारी वकिलांच्या कार्यपद्धतीचे मूल्यमापन केले जाणार आहे.

मुंबई : फौजदारी खटल्यातील गुन्हे सिद्धतेचा दर वाढविण्यासाठी नेमलेल्या समितीच्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या असून, यापुढे सरकारी वकिलांच्या कार्यपद्धतीचे मूल्यमापन केले जाणार आहे.न्यायालयात दाखल होणाऱ्या फौजदारी खटल्यांमध्ये गुन्हे सिद्धतेचा दर तुलनेने अत्यंत कमी आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. समितीच्या सगळ्या शिफारशी शासनाने मान्य केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले. या शिफारशींमध्ये प्रलंबित खटल्यांचे पुनर्विलोकन, सरकारी वकिलांवर अभियोग संचालनालयाचे नियंत्रण यांचा समावेश आहे. उत्कृष्ट तपास कामाला प्रोत्साहन देण्यासाठी एका सर्वश्रेष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्याला मुख्यमंत्री पदक देणे, पीसीपी एनडीटी कायद्यातील गुन्ह्यात गुन्हे सिद्धतेचे प्रमाण अधिक असलेल्या सहायक सरकारी वकिलालाही मुख्यमंत्री पदक देणे, पोलीस अधिकाऱ्यांनी पार पाडलेल्या कर्तव्याबाबत वेगळा गोपनीय अहवाल नमूनादेखील गृहविभाग तयार करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.सरकारी वकील नेमण्याचे अधिकारशिवाय पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात वकिलांचे पॅनल तयार करण्याचे अधिकार दिले गेले आहेत. या पॅनेलमधून विशेष सरकारी वकील नेमण्याचे अधिकार पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. न्यायालयात गुन्हे सिद्धतेचा दर वाढण्याच्या दृष्टीने अभियोक्त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण, विशेष सहायक सरकारी वकिलांच्या निवड प्रक्रियेत बदल केला जाणार आहे.