शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
2
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
3
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
4
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
5
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
6
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
7
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
8
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
9
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
10
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
12
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
13
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
14
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
15
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
16
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
17
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
18
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
20
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला

समन्यायी पाण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा

By admin | Updated: August 15, 2016 04:29 IST

गोदावरी नदीला काही भागात पूर आला म्हणून जायकवाडी धरण ६० टक्क्यांवर भरले.

नांदेड : यंदा तुलनेने चांगला पाऊस झाला, त्याचे समाधान आहे. गोदावरी नदीला काही भागात पूर आला म्हणून जायकवाडी धरण ६० टक्क्यांवर भरले. तरीही मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांवर असलेले पाणी टंचाईचे संकट कायमचे दूर करण्यासाठी समन्यायी पाणी वाटप झाले पाहिजे. त्याकरिता राज्य सरकारने विधायक हस्तक्षेप करावा, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे मांडली.‘लोकमत’आयोजित नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ५० प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्यात ते म्हणाले, जायकवाडीच्या वरच्या भागात पूर आला. त्यानंतर मराठवाड्याकडे पाणी आले. एकीकडे वरच्या भागात पाणी अडविले जाते तर मराठवाड्यातून पुढे जाणारे पाणी बाभळीसारख्या बंधाऱ्यातही थांबविता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे २९ आॅक्टोबरपर्यंत दरवाजे बंद करता येत नाहीत. परिणामी आलेले पाणी वाहून जाते. याच बंधाऱ्यासाठी महाराष्ट्र व आंध्र प्रदेशमध्ये तंटा झाला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. आता पुन्हा मराठवाड्याच्या न्याय्य हक्कासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले पाहिजे. एकूणच सरकारने समन्यायी पाणी वाटपासाठी योग्यवेळी हस्तक्षेप करावा अन्यथा पाणीप्रश्न पेटेल, असा इशाराही त्यांनी दिला.मराठवाड्यातील काही मोठे प्रकल्प अद्यापही भरलेले नाहीत. विष्णूपुरीत पाणी आले असले तरी लोकसंख्येच्या प्रमाणात दीर्घकाळ पूर्तता होणार नाही. त्यामुळे जिल्हा- शहरांसाठी पर्यायी पाणी पुरवठ्याच्या योजना आखल्या तरच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.सध्या देशात स्टार्टअप इंडिया, स्टॅन्डअप इंडिया सुरू आहे, परंतु हे सर्व काही मोजक्या व मोठ्या शहरांपुरतेच मर्यादित आहे. दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारला सवडच नाही. बँका जवळ उभे करीत नाहीत. कर्जाचे पुनर्गठन होत नाही, असेही ते म्हणाले़ (प्रतिनिधी)>लोकांची नाडी जाणणारे ‘लोकमत’मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या वेदना पाहिल्या. विवंचनेला वैतागून ज्यांनी आत्महत्येसारखा शेवटचा मार्ग पत्करला. त्यांची व त्यांच्या कुटंबीयांची निश्चितच आठवण होते, असे नमूद करीत खा. चव्हाण म्हणाले, दुष्काळाचे दुष्टचक्र भेदून ज्या शेतकऱ्यांनी नावीन्यपूर्ण प्रयोग केले त्यांचा ‘लोकमत’ने सन्मान केला.त्यामुळे मनोबल उंचावेल. प्रेरणा मिळेल, इतर शेतकऱ्यांना दिशा मिळेल. समाजाची नाडी जाणणारे ‘लोकमत’च हे करु शकते, असेही चव्हाण म्हणाले.