शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

शासकीय रुग्णालये अग्निशामक उपकरणाविना

By admin | Updated: July 7, 2014 23:38 IST

जिल्हाभरातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आग प्रतिबंधात्मक उपकरणे बसविण्यात आली नाही.

कारंजालाड: जिल्ह्यातील कारंजा,मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव ,रिसोड, कामरगाव , अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयांप्रमाणेच जिल्हाभरातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आग प्रतिबंधात्मक उपकरणे बसविण्यात आली नाही. काही ठिकाणी अशी उपकरणे बसविले होती.मात्र , ती उपकरणे अनेक वर्षापासून धुळखात पडून आहेत.राज्यात अनेक ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात अशीच स्थिती असल्याची माहिती आहे.त्यामुळे आरोग्य विभाग रुग्णांच्या सुरक्षेबाबत किती गंभीर आहे ते दिसून येते.ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक अरोग्य केंद्रांमध्ये मोठय़ा प्रमाणावर नागरिक उपचारासाठी येतात.त्यांना तेथे उपचार, शस्त्रक्रिया आदींसाठी भरती व्हावे लागते.त्यामुळे ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अग्निशामक उपकरणे सज्ज असणे रुग्ण व आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक ठरते.परंतु, याकडे आरोग्य यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.कारंजा ग्रामीण रुग्णालयात कारंजा, मानोरा, मंगरुळपीर तालुक्यातून बरेच रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. रुग्णालयात नेहमीकरीता ३0 रुग्ण भरती राहतात.तसेच दररोज ओ.पी.डी.मध्ये ३0 ते ४0 रुग्ण उपचार घेतात. रुग्णालयात शासकीय व निमशासकीय ६0 कर्मचारी कामावर असतात. यासोबतच रुग्णाचे नातेवाईक २0 पेक्षा जास्त उपस्थित असतात. येथे ७ जुलै रोजी पाहणी केली असता कारंजा ग्रामीण रुग्णालयात अग्निशामक उपकरणे नसल्याचे आढळून आले.रिसोड ,अनसिंग,मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात अग्निशामक उपकरणे नाहीत.कामरगाव व मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात अग्निशामक उपकरणे आहेत.परंतु, ती धुळ खात पडून आहेत. जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत.पण ,त्यापैकी कुठेही अग्निशामक उपकरणे बसविलेली नाहीत. या रुग्णालयांमध्ये व प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कसलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. कारंजा ग्रामीण रुग्णालयात एका वर्षापुर्वी शस्त्रक्रिया विभागात आग लागली होती. यामध्ये १५ ते २0 हजार रुपयाचे नुकसान झाले होते. मात्र ग्रामीण रुग्णालयात लागलेल्या आगीच्या ठिकाणी गॅस सिलेंडर व ऑक्सीजनचेही सिलेंडर ठेवलेले होते. मात्र, कर्मचार्‍यांच्या सतर्कमुळे मोठा अनर्थ टळला.तसे शासनाने सर्वच शासकीय कार्यालयांचे फायर ऑडीट करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे रुग्ण व आरोग्य कर्मचारी असुरक्षित आहेत.