शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

घरातला कमावता व्यक्ती गेला; सरकारी मदत मिळते, पण कधी अन् कसं? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 19:23 IST

राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना : अनुदान नसल्याने प्रकरणे पडून, प्रत्येक तालुक्यात ही योजना राबविली जात असून तहसीलदारांना योजना मंजुरीचे अधिकार देण्यात आलेले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधितांना तहसील कार्यालयात माहिती मिळू शकते.

नाशिक : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील प्रमुखाचा मृत्यू झाला तर लाभ अर्थसाहाय्य योजना? संबंधित कुटुंबीयांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतंर्गत २० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. जिल्ह्यात दरवर्षी साधारण ३० ते ४० प्रकरणे दाखल होतात. परंतु केंद्राकडून प्राप्त होणाऱ्या निधीवर त्यांची अर्थसाहाय्य योजना अवलंबून आहे. कोरोनामुळे दोन वर्ष या योजनेला अजूनही निधी प्राप्त झालेला नाही.

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयास एकरकमी २० हजाराचे अर्थसाहाय्य देण्यात येते. प्रत्येक तालुक्यात ही योजना राबविली जात असून तहसीलदारांना योजना मंजुरीचे अधिकार देण्यात आलेले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधितांना तहसील कार्यालयात माहिती मिळू शकते. अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडली तर पुरेसे कागदपत्रे जमा करून तहसील कार्यालयात सादर केल्यास कुटुंबीयांना मदत मिळणे सुलभ होणार आहे. राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेबाबत दाखल होणारे अर्ज निकषानुसार मंजूर केली जात असली तरी निधी उपलब्ध नसेल तर संबंधित कुटुंबीयांना आर्थिक मदतीसाठी वाट पाहावी लागते.काय आहे राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना?दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयास एकरकमी वीस हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येते. त्यासाठी तहसील प्रशासनाकडे अर्ज करावा लागतो. कुटुंबप्रमुखाचा मृत्यू नैसर्गिक वा अपघाती झा वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, तसेच जन्म-मृत्यू नोंदणीचा दाखला आवश्यक असतो.

पाच वर्षांत मिळाले लाखो रुपयेया योजनेत एका कमावत्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना २० हजार रुपये दिले जातात. साधारणपणे दरमहा सररासरी ४० प्रकरणे येत असल्याने गेल्या पाच वर्षातील आकडेवारी पाहता नाशिक जिल्ह्यातून दरवर्षी लाखो रुपयांचे अर्थसाहाय्य केले जात असल्याने दिसून येते. यंदा प्रकरणे प्रलंबित राहिल्याने संख्या वाढलेली दिसते.

कोणाला मिळतो लाभ?एखाद्या कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला असून, कुटुंब निराधार झाले असेल, तर राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेद्वारे या कुटुंबांना सरकारकडून निधी मिळतो. या पातळीवर संबंधित कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अत्यल्प (१५००० किंवा त्यापेक्षा कमी) असेल तरच या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयात अर्ज करता येणार आहे.

अर्ज कोठे करायचा?या योजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तालुका तहसीलदारांकडे अर्ज करता येणार आहे. अर्जासोबत कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक असते. कुटुंबप्रमुखाचा मृत्यू नैसर्गिक वा अपघाती झाला असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, तसेच जन्म-मृत्यू नोंदणीचा दाखला आवश्यक आहे. मृत व्यक्ती कुटुंबप्रमुख होती, त्या संदर्भातील तलाठ्यांकडून मिळणारा दाखलाही जोडणे आवश्यक आहे.

यावर्षी ४० अर्ज, मदत एकालाही नाहीया योजनेंतर्गत यावर्षी एकूण ४० प्रकरणे प्राप्त झाली आहेत. त्यामध्ये नाशिक तालुक्यातून १० तर शहरी भागातून ३० प्रकरणे मदतीसाठी दाखल झालेली आहेत. ही सर्व प्रकरणे मंजूर असून अद्याप अनुदान प्राप्त नसल्याने प्रकरणे प्रतीक्षेत आहेत. डिसेंबर पर्यंत अनुदान प्राप्त होण्याची शक्यता असल्याचे तहसीलकडून सांगण्यात आले.

लागलीच वितरणकेंद्र पुरस्कृत योजना असल्याने निधी प्राप्त झाल्यानंतर लागलीच पात्र लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य योजनेतून मदत केली जाते. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून योजनेचे अनुदान विस्कळीत झालेले आहे. अजूनही अनुदान प्राप्त झालेले नाही त्यामुळे यंदा प्रकरणे अधिक वेळ प्रतीक्षेत आहेत. साधारणपणे डिसेंबर पर्यंत अनुदान प्राप्त होण्याची शक्यता असून अनुदान मिळताच वितरण केले जाईल असे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले.