शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

शासकीय धान्य वाहतुकीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2017 02:26 IST

वाहतूकदारांच्या दरात शासनाने दुपटीने वाढ केल्यामुळे अन्नधान्य महामंडळातून थेट रेशन दुकानदाराच्या दारापर्यंत धान्य वाहतुकीचा

नाशिक : वाहतूकदारांच्या दरात शासनाने दुपटीने वाढ केल्यामुळे अन्नधान्य महामंडळातून थेट रेशन दुकानदाराच्या दारापर्यंत धान्य वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला असून, यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा खात्याने घेतलेल्या निर्णयामुळे रेशनचा काळाबाजार रोखण्यास मदत होणार आहे.दोन वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील कोट्यवधी रुपये किमतीच्या धान्य घोटाळ्यानंतर शासनाने रेशनचे धान्य वाहतूकदारांच्या मुसक्या आवळल्याने राज्यात शासकीय धान्याची वाहतूक करणाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने धान्य वाहतूक करण्यास नकार देत काम बंद केले होते. अल्प वाहतूक दर मिळत असल्याचे सांगत शासकीय धान्याची वाहतूक करण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत धान्य वाटपात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावर उपाय म्हणून खासगी वाहतूकदारांकडून तर काही ठिकाणी थेट आरटीओमार्फत वाहने अधिग्रहित करून दर महिन्याच्या धान्याची वाहतूक सुरू करण्यात आली. शासकीय गोदाम अथवा अन्नधान्य महामंडळाच्या गोदामातून थेट रेशन दुकानापर्यंत अन्नधान्याची वाहतूक करण्यासाठी शासकीय पातळीवर वेळोवेळी निविदा मागविण्यात आल्या, परंतु अत्यंत अल्प दर व जाचक नियम, निकषांमुळे निविदा भरण्यास वाहतूकदारांनी अनुत्सुकता दर्शविल्याने एकाही जिल्ह्यात वाहतूकदार धान्य वाहतुकीसाठी पुढे आले नाहीत. त्यामुळे वाहतुकीचे दर वाढवून द्यावेत याबाबत शासकीय पातळीवर बऱ्याच महिन्यांपासून विचार केला जात होता. अखेर गेल्या आठवड्यात शासनाने निर्णय घेऊन वाहतूक दरात दुपटीने वाढ केली. वाहतूकदारांना काही नियम व निकषही लागू केले आहेत. (प्रतिनिधी)