शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीवरून सरकार धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 03:50 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या नियम, निकष आणि अटींवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात या विषयावर उपस्थित झालेल्या चर्चेत

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या नियम, निकष आणि अटींवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात या विषयावर उपस्थित झालेल्या चर्चेत, दहा हजारांचे अग्रिम कर्ज, कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज या मुद्यांवरून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली.एक रुपयाही कोणत्या शेतक-याला मिळालेला नाही. तरीही सत्ताधारी बाकांवरुन सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यातआला आहे. कर्जमाफीला विलंब केल्यामुळे आतापर्यंत १५ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या त्याचे पाप भाजपा-शिवसेना सरकारच्या डोक्यावर आहे. त्यामुळे स्वत:चे अभिनंदन करुन घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करण्यासाठी सत्ताधारी पक्षांनी नियम २६० अन्वये प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावरील चर्चेला सुरुवात करताना भाजपासदस्य सुजितसिंह ठाकूर यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले. हीसर्वात मोठी व ऐतिहासिक कर्जमाफी असून त्यामुळे शेतक-यांमध्ये आशादायी चित्र निर्माण झालेआहे. सरकार शेतक-यांच्यापाठिशी खंबीरपणे उभे आहे, हे या निर्णयातून सिद्ध झाल्याचे ठाकूर यावेळी म्हणाले.यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. कर्जमाफीचा अर्धवट निर्णय घेण्यात आला. अजून कर्जमाफी लागू झाली नाही पण यांना अभिनंदन हवे. ३६ लाख तर नुसत्या जाहिरातीवर खर्च करण्यात आले. नियम आणि जाचक अटी या कर्जमाफीत लादण्यात आल्या. कर्जमाफी होण्यापूर्वी शेतक-यांना दहा हजार रुपये दण्याची घोषणा सरकारने केली. ते पैसेही मिळाले नाहीत. पण, यावरही सरकारने राजकारण केले. विरोधी पक्षांच्या ताब्यात असणा-या जिल्हा बँकानी प्रस्तावच दिला नाही, असा दावा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला होता.प्रत्यक्षात सातारा, पुणे जिल्ह्यातील बँका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्या बँकांनी स्वखर्चाने कर्जमाफीबाबतच्या जाहिराती दिल्या. तर, सत्ताधारी पक्षांच्या ताब्यात असणा-या चंद्रपूर, नागपूर, बीड, जळगाव इथल्या जिल्हा बँकांनीच प्रस्ताव पाठविला नाही. या बँकावर कारवाई करण्याची हिंमत दाखविणार का, असा सवाल धनंजय मुंडेयांनी केला. कर्जमाफीबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पीपणाची असल्याची टीकाही मुंडे यांनीयावेळी केली.