शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

सरकारची कर्जमाफी फसवी, शेतक-यांमध्ये भेद निर्माण करणारी: राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 04:59 IST

महाराष्ट्रातील सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी असून, शेतक-यांमध्ये भेद निर्माण करणारी आहे. सरसकट कर्जमाफीसाठी आम्ही सरकारला भाग पाडू

परभणी : महाराष्ट्रातील सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी असून, शेतक-यांमध्ये भेद निर्माण करणारी आहे. सरसकट कर्जमाफीसाठी आम्ही सरकारला भाग पाडू, अशी ग्वाही काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी शेतक-यांना दिली.पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय आणि शेतक-यांशी खा. गांधी यांनी आस्थेवाईक संवाद साधला.या कार्यक्रमासाठी छोटेखानी मंच उभारला होता. सुरुवातीला १३ शेतक-यांनी खा. गांधी यांचा सत्कार केला. त्यानंतर एरंडेश्वर येथील शेतकरी बालासाहेब काळे यांनी शेतकºयांच्या अडचणी मांडण्यास सुरुवात केली. राज्य शासनाने दिलेली कर्जमाफी फसवी आहे, कर्जमाफीच्या अर्जांसाठी अनेक अडचणी येत आहेत. दररोज नवा जी.आर. निघत असून, नवीन कर्ज मिळत नाही. जुन्या कर्जांची माफी होत नाही, या परिस्थितीमुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत, असे सांगितले.शेतकरी आपल्या समस्या मांडत असतानाच खा. गांधी अचानक मंचावरून उठले, सुरक्षेच्या दृष्टीने तयार केलेल्या लाकडी कठड्यामधून थेट समस्या मांडणाºया शेतकºयांमध्ये येऊन मांडी घालून बसले. त्यानंतर शेतकºयांचा उत्साह आणखीच वाढला. एक-एक करीत शेतकरी गाºहाणे मांडत होते. प्रा. व्यंकटराव काळे, अण्णासाहेब काळे, राजू काळे आदींनी राज्य शासनाकडून अडवणूक होत असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी खा. राहुल गांधी यांनी शेतकºयांना अनेक प्रश्न विचारले. त्यात तातडीचे १० हजार रुपये मिळाले का, गावाची लोकसंख्या किती आहे आणि किती जणांना कर्जमाफी झाली, असे प्रश्न करताच गावक-यांनी एकालाही कर्जमाफी मिळाली नसल्याचे सांगितले. त्यानंतर खा. राहुल गांधी यांनी राज्य सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असून, संपूर्ण कर्जमाफी देण्यास शासनाला भाग पाडू, असे अभिवचन दिले. शेतक-यांशी संवाद साधल्यानंतर राहुल गांधी यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांशीही संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmerशेतकरी