शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

तुळजाभवानी मंदिराच्या कारभारावर सरकारचे नियंत्रण!

By admin | Updated: March 17, 2015 01:11 IST

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानची सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था म्हणून घोषणा करण्यात आल्याने या मंदिराचा संपूर्ण कारभार सरकारच्या नियंत्रणाखाली आला आहे.

उस्मानाबाद : अनागोंदी आणि गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानची सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था म्हणून घोषणा करण्यात आल्याने या मंदिराचा संपूर्ण कारभार सरकारच्या नियंत्रणाखाली आला आहे. राज्यातील पंढरपूर, शिर्डी, कोल्हापूर या मंदिरांप्रमाणे तुळजा भवानी मंदिराचाही कारभार आता राज्य सरकारच्या नियमावलीनुसार चालणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचा कारभार निजाम राजवटीने १९०९ पासून घालून दिलेल्या देऊळ-ए-कवायत या नियमावलीनुसार सुरू होता. त्यामुळे मंदिराच्या विश्वस्त मंडळाची नोंद धमार्दाय न्यासाकडे असली तरी मंदिरातील सर्व व्यवहार या कवायतीत नमूद केल्याप्रमाणेच सुरू होते. मंदिरातील पुजाऱ्यांचे हक्क, विविध विधी, भाविकांनी अर्पण केलेल्या देणगी आणि रोख रकमेत असलेले पारंपारिक हक्क तसेच त्याचा विनियोग आदींबाबतचे निर्णय या नियमावलीनुसार घेण्यात येत होते. तुळजाभवानी मंदिर संस्थान चॅरिटेबल अ‍ॅक्ट नुसार नोंदणीकृत संस्था असून, त्यावर जिल्हाधिकारी पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पूर्वीपासून काम पाहत आहेत. दरम्यानच्या काळात मंदिरात झालेली अनागोंदी आणि कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार पाहता तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी मंदिराचा कारभार पारदर्शक होण्यासाठी त्यावर राज्य शासनाचे नियंत्रण असण्याची गरज व्यक्त करीत २०१० मध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थानचा समावेश राजपत्रात करावा, असा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार फेब्रुवारी २०१४ मध्ये अनेक अडथळे पार करीत या संबंधी प्राथमिक अधिसूचना जारी करण्यात आली होती. अखेर मंदिर संस्थानची राज्य शासनाने नोंद घेत २० फेब्रुवारी २०१५ रोजी अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)पुजारी मंडळांकडूनही स्वागत : मंदिरात मागील २० वर्षांत झालेले आर्थिक गैरव्यवहार पाहता राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. यापुढील काळात भाविकांनी अर्पण केलेल्या देणगीचा सामाजिक उपक्रमांसाठी योग्य वापर होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी व्यक्त केली. सर्व संस्थांसाठी लवकरच नियमावली : राज्य शासनाने तुळजाभवानी मंदिरासंदर्भात घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारकडे नोंद असलेल्या सर्व मंदिर संस्थानसाठी लवकरच एकच नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसमोर झाले होते सादरीकरण : राज्य शासनाने अंतिम अधिसूचना जारी केल्याने मंदिर संस्थानचा कारभार अधिक पारदर्शक तसेच गतीशील करण्यास मदत मिळेल, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केली.